शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

...यामुळे भारतात दर ९६ मिनिटाला होतो एक मृत्यू

By admin | Updated: May 27, 2016 13:49 IST

देशातील अनेक भागात दारुबंदीची मागणी वाढत चालली आहे. दारुमुळे व्यक्ती आणि समाजावर होणा-या विपरीत परिणामांची एक नवी धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - देशातील अनेक भागात दारुबंदीची मागणी वाढत चालली आहे. दारुमुळे व्यक्ती आणि समाजावर होणा-या विपरीत परिणामांची एक नवी धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. दारुमुळे दरदिवशी पंधरा भारतीयांचा मृत्यू होतो किंवा दर ९६ मिनिटाला एक भारतीय दारुच्या व्यसनामुळे मृत्यूमुखी पडतो. 
 
राष्ट्रीय गुन्हे नोंद केंद्राच्या इंडिया स्पेंड २०१३ च्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतात दारु पिण्याचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले आहे. २००३-०५ मध्ये जे प्रमाण १.६ टक्के होते ते आता २.२ टक्के झाले आहे. दारुबंदीला राजकीय पाठिंबा वाढत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
 
जे. जयललिया यांनी २३ मे रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यादिवशीच त्यांनी ५०० मद्याची दुकाने बंद करण्याची घोषणा केली. एक एप्रिलपासून संपूर्ण बिहारमध्ये दारुबंदी लागू झाली. ऑगस्ट २०१४ मध्ये केरळ सरकारनेही सर्रास चालणा-या दारुविक्रीवर काही निर्बंध आणले. 
 
एनसीआरबीच्या अहवालानुसार मद्यपानामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यानंतर मध्यप्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. अति मद्यपानाचा गुन्हेगारीशी संबंध जोडला जातो असे तज्ञांनी सांगितले. मद्यपानामुळे गुन्हे, अपघात, लैंगिक जबरदस्ती यासारखे गुन्हे वाढतात. 
 
केरळमध्ये ६९ टक्के गुन्हे मद्यपानामुळे झाले आहेत. २०१५ मध्ये मुंबईत मालवणीमध्ये विषारी दारु प्याल्यामुळे १०० हून अधिक मृत्यू झाले होते. २०१४ मध्ये १६९९ जणांचा विषारी दारु प्याल्यामुळे मृत्यू झाला. २०१३ मध्ये ३८७ जण विषारी दारुपिऊन मृत्यूमुखी पडले होते.