शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

...यामुळे भारतात दर ९६ मिनिटाला होतो एक मृत्यू

By admin | Updated: May 27, 2016 13:49 IST

देशातील अनेक भागात दारुबंदीची मागणी वाढत चालली आहे. दारुमुळे व्यक्ती आणि समाजावर होणा-या विपरीत परिणामांची एक नवी धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - देशातील अनेक भागात दारुबंदीची मागणी वाढत चालली आहे. दारुमुळे व्यक्ती आणि समाजावर होणा-या विपरीत परिणामांची एक नवी धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. दारुमुळे दरदिवशी पंधरा भारतीयांचा मृत्यू होतो किंवा दर ९६ मिनिटाला एक भारतीय दारुच्या व्यसनामुळे मृत्यूमुखी पडतो. 
 
राष्ट्रीय गुन्हे नोंद केंद्राच्या इंडिया स्पेंड २०१३ च्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतात दारु पिण्याचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले आहे. २००३-०५ मध्ये जे प्रमाण १.६ टक्के होते ते आता २.२ टक्के झाले आहे. दारुबंदीला राजकीय पाठिंबा वाढत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
 
जे. जयललिया यांनी २३ मे रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यादिवशीच त्यांनी ५०० मद्याची दुकाने बंद करण्याची घोषणा केली. एक एप्रिलपासून संपूर्ण बिहारमध्ये दारुबंदी लागू झाली. ऑगस्ट २०१४ मध्ये केरळ सरकारनेही सर्रास चालणा-या दारुविक्रीवर काही निर्बंध आणले. 
 
एनसीआरबीच्या अहवालानुसार मद्यपानामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यानंतर मध्यप्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. अति मद्यपानाचा गुन्हेगारीशी संबंध जोडला जातो असे तज्ञांनी सांगितले. मद्यपानामुळे गुन्हे, अपघात, लैंगिक जबरदस्ती यासारखे गुन्हे वाढतात. 
 
केरळमध्ये ६९ टक्के गुन्हे मद्यपानामुळे झाले आहेत. २०१५ मध्ये मुंबईत मालवणीमध्ये विषारी दारु प्याल्यामुळे १०० हून अधिक मृत्यू झाले होते. २०१४ मध्ये १६९९ जणांचा विषारी दारु प्याल्यामुळे मृत्यू झाला. २०१३ मध्ये ३८७ जण विषारी दारुपिऊन मृत्यूमुखी पडले होते.