शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
2
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
3
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
4
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
5
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
6
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
7
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
8
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
9
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
10
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
11
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
12
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
13
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
14
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
15
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
16
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
17
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
18
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
19
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
20
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

...यामुळे भारतात दर ९६ मिनिटाला होतो एक मृत्यू

By admin | Updated: May 27, 2016 13:49 IST

देशातील अनेक भागात दारुबंदीची मागणी वाढत चालली आहे. दारुमुळे व्यक्ती आणि समाजावर होणा-या विपरीत परिणामांची एक नवी धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - देशातील अनेक भागात दारुबंदीची मागणी वाढत चालली आहे. दारुमुळे व्यक्ती आणि समाजावर होणा-या विपरीत परिणामांची एक नवी धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. दारुमुळे दरदिवशी पंधरा भारतीयांचा मृत्यू होतो किंवा दर ९६ मिनिटाला एक भारतीय दारुच्या व्यसनामुळे मृत्यूमुखी पडतो. 
 
राष्ट्रीय गुन्हे नोंद केंद्राच्या इंडिया स्पेंड २०१३ च्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतात दारु पिण्याचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले आहे. २००३-०५ मध्ये जे प्रमाण १.६ टक्के होते ते आता २.२ टक्के झाले आहे. दारुबंदीला राजकीय पाठिंबा वाढत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
 
जे. जयललिया यांनी २३ मे रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यादिवशीच त्यांनी ५०० मद्याची दुकाने बंद करण्याची घोषणा केली. एक एप्रिलपासून संपूर्ण बिहारमध्ये दारुबंदी लागू झाली. ऑगस्ट २०१४ मध्ये केरळ सरकारनेही सर्रास चालणा-या दारुविक्रीवर काही निर्बंध आणले. 
 
एनसीआरबीच्या अहवालानुसार मद्यपानामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यानंतर मध्यप्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. अति मद्यपानाचा गुन्हेगारीशी संबंध जोडला जातो असे तज्ञांनी सांगितले. मद्यपानामुळे गुन्हे, अपघात, लैंगिक जबरदस्ती यासारखे गुन्हे वाढतात. 
 
केरळमध्ये ६९ टक्के गुन्हे मद्यपानामुळे झाले आहेत. २०१५ मध्ये मुंबईत मालवणीमध्ये विषारी दारु प्याल्यामुळे १०० हून अधिक मृत्यू झाले होते. २०१४ मध्ये १६९९ जणांचा विषारी दारु प्याल्यामुळे मृत्यू झाला. २०१३ मध्ये ३८७ जण विषारी दारुपिऊन मृत्यूमुखी पडले होते.