शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

केंद्राकडून कृषी खात्यास 1 कोटीचा पुरस्कार फोटो माहिती खात्याकडून येणार

By admin | Updated: January 30, 2016 00:17 IST

केंद्राकडून कृषी खात्यास

केंद्राकडून कृषी खात्यास
1 कोटीचा पुरस्कार

पणजी : राज्यातील कृषी क्षेत्रात ‘अन्नधान्य उत्पादनात वाढ’ झाल्याबाबत केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे गोवा राज्य कृषी खात्याला 1 कोटी रुपयाचा ‘कृषी कर्मण्य’पुरकार प्रप्त झाला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोवा राज्यात कृषी उत्पादनात वाढ झाल्याने 2014-15 सालच्या पुरस्कारासाठी राज्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या तीन ते चार वर्षापासून कृषी क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. कृषी खाते आणि फलोत्पादन महामंडळ एकत्रिपणे राज्यातील शेतकर्‍यांसाठी विविध योजना अंमलात आणत आहे. या योजना तळागाळील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी अधिकारीही शेतात, बागायतीत उतरत आहे. काजू, आंबे इत्यादीच्या लागवडीसाठी मार्गदर्शन करण्यास कृषी अधिकारी डोंगराळ भागातही शेतकर्‍यांबरोबर मैलाचे अंतर तुडवतात. शेतकर्‍यांचे कष्ट आणि अधिकार्‍यांची सेवा यामुळे कृषी क्षेत्रात साकारात्मक प्रगती होउ लागली असल्याचे तवडकर म्हणाले.
राज्यात 2010-11 सालात अन्नधान्य उत्पादनाचे प्रमाण कमी होते. मात्र 2014-15 सालात त्यात चांगली वाढ झाली. केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्याला पुरस्कार जाहिर करतानाच कृषी खाते व खात्याला संबंधित सर्व घटकांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुरस्काराचे स्थळ आणि वेळ यापुढे कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले असल्याचे तवडकर म्हणाले.
गोवा बनू शकतो ‘ऑर्चिड हब’
गोव्यात ऑर्चिड फुले उत्पादनासाठी चांगले वातावरण आहे. आतापर्यंत साधारण 105 पॉलीहाउस बांधण्यात आली आहेत. ऑर्चिडच्या फुलांसाठी चांगली बाजारपेठे असून हा एक उत्कृष्ट व्यवहाय होउ शकतो. फुलोत्पादनाच्या व्यावसायिक शेतीकडे गोव्यातील तरुण वर्ग वळू लागला असून कृषी क्षेत्राच्या उत्कर्षासाठी ही सकारात्मक बाब आहे. ऑर्चिड फुलांचे उत्पादन वाढल्यास गोवा ऑर्चिड हब बनू शकतो असे प्रतिपादन तवडकर यांनी केले.
कृषी महोत्सवांचे योगदान
कृषी खात्यातर्फे साधारण दोन वर्षापासून प्रत्येक तालुक्यात कृषी मेळाव्यांचे आयोजन घडवून आणण्यात आले. या मेळाव्यांमुळे शेतकर्‍यांमधे जागृती झाली. अधिकार्‍यांच्या संवाद साधणे, योजनांची माहिती, समस्यांचे निवारण, तज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी माहिती मिळू लागली. अशा कृषी मेळाव्यांमुळे शेतकर्‍यांमध्ये शेतीत वैविध्यता आणून पाहण्याचा उत्साह आला. यामुळे सामुहिक शेती, सिझनल शेती, फुलोत्पादन, फळोत्पादन इत्यादी क्षेत्रात वाढ होउ लागली. राज्यात यापुढे कृषी क्षेत्र अधिक चांगली कामगिरी बजावले असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
..चौकट..
कृषी खात्याचे उपक्रम
खात्याने यंदाच्या वर्षात 2015-16 साठी उस उत्पादकांसाठी दर वाढविला आहे. सदर दर 2400 वरुन 2500 करण्यात आला आहे. राज्यात 7 हेक्टर जमिनीत ऑर्चिड आणि जरबेरा उत्पादन काढण्यात येते. पॉलीहाउससाठी 18 हेक्टर जमिनीचा वापर करण्यात आला आहे. राज्यातील शेतकर्‍यांकडून साधारण 20 लाख रुपयांची भाजी 385 टन फलोत्पादन महामंडळाने खरेदी केली आहे. मिरचीच्या हायब्रीड बियाणांचेही शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले आहे. गोव्यातील मिरची आता बेळगाव, महाराष्ट्राच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होउ लागली आहे. कृषी उत्कर्षासाठी असे अनेक उपक्रम खात्यातर्फे राबविण्यात येत असल्याची माहिती तवडकर यांनी दिली.