शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून कृषी खात्यास 1 कोटीचा पुरस्कार फोटो माहिती खात्याकडून येणार

By admin | Updated: January 30, 2016 00:17 IST

केंद्राकडून कृषी खात्यास

केंद्राकडून कृषी खात्यास
1 कोटीचा पुरस्कार

पणजी : राज्यातील कृषी क्षेत्रात ‘अन्नधान्य उत्पादनात वाढ’ झाल्याबाबत केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे गोवा राज्य कृषी खात्याला 1 कोटी रुपयाचा ‘कृषी कर्मण्य’पुरकार प्रप्त झाला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोवा राज्यात कृषी उत्पादनात वाढ झाल्याने 2014-15 सालच्या पुरस्कारासाठी राज्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या तीन ते चार वर्षापासून कृषी क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. कृषी खाते आणि फलोत्पादन महामंडळ एकत्रिपणे राज्यातील शेतकर्‍यांसाठी विविध योजना अंमलात आणत आहे. या योजना तळागाळील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी अधिकारीही शेतात, बागायतीत उतरत आहे. काजू, आंबे इत्यादीच्या लागवडीसाठी मार्गदर्शन करण्यास कृषी अधिकारी डोंगराळ भागातही शेतकर्‍यांबरोबर मैलाचे अंतर तुडवतात. शेतकर्‍यांचे कष्ट आणि अधिकार्‍यांची सेवा यामुळे कृषी क्षेत्रात साकारात्मक प्रगती होउ लागली असल्याचे तवडकर म्हणाले.
राज्यात 2010-11 सालात अन्नधान्य उत्पादनाचे प्रमाण कमी होते. मात्र 2014-15 सालात त्यात चांगली वाढ झाली. केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्याला पुरस्कार जाहिर करतानाच कृषी खाते व खात्याला संबंधित सर्व घटकांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुरस्काराचे स्थळ आणि वेळ यापुढे कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले असल्याचे तवडकर म्हणाले.
गोवा बनू शकतो ‘ऑर्चिड हब’
गोव्यात ऑर्चिड फुले उत्पादनासाठी चांगले वातावरण आहे. आतापर्यंत साधारण 105 पॉलीहाउस बांधण्यात आली आहेत. ऑर्चिडच्या फुलांसाठी चांगली बाजारपेठे असून हा एक उत्कृष्ट व्यवहाय होउ शकतो. फुलोत्पादनाच्या व्यावसायिक शेतीकडे गोव्यातील तरुण वर्ग वळू लागला असून कृषी क्षेत्राच्या उत्कर्षासाठी ही सकारात्मक बाब आहे. ऑर्चिड फुलांचे उत्पादन वाढल्यास गोवा ऑर्चिड हब बनू शकतो असे प्रतिपादन तवडकर यांनी केले.
कृषी महोत्सवांचे योगदान
कृषी खात्यातर्फे साधारण दोन वर्षापासून प्रत्येक तालुक्यात कृषी मेळाव्यांचे आयोजन घडवून आणण्यात आले. या मेळाव्यांमुळे शेतकर्‍यांमधे जागृती झाली. अधिकार्‍यांच्या संवाद साधणे, योजनांची माहिती, समस्यांचे निवारण, तज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी माहिती मिळू लागली. अशा कृषी मेळाव्यांमुळे शेतकर्‍यांमध्ये शेतीत वैविध्यता आणून पाहण्याचा उत्साह आला. यामुळे सामुहिक शेती, सिझनल शेती, फुलोत्पादन, फळोत्पादन इत्यादी क्षेत्रात वाढ होउ लागली. राज्यात यापुढे कृषी क्षेत्र अधिक चांगली कामगिरी बजावले असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
..चौकट..
कृषी खात्याचे उपक्रम
खात्याने यंदाच्या वर्षात 2015-16 साठी उस उत्पादकांसाठी दर वाढविला आहे. सदर दर 2400 वरुन 2500 करण्यात आला आहे. राज्यात 7 हेक्टर जमिनीत ऑर्चिड आणि जरबेरा उत्पादन काढण्यात येते. पॉलीहाउससाठी 18 हेक्टर जमिनीचा वापर करण्यात आला आहे. राज्यातील शेतकर्‍यांकडून साधारण 20 लाख रुपयांची भाजी 385 टन फलोत्पादन महामंडळाने खरेदी केली आहे. मिरचीच्या हायब्रीड बियाणांचेही शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले आहे. गोव्यातील मिरची आता बेळगाव, महाराष्ट्राच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होउ लागली आहे. कृषी उत्कर्षासाठी असे अनेक उपक्रम खात्यातर्फे राबविण्यात येत असल्याची माहिती तवडकर यांनी दिली.