शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

पर्रीकरांच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दलच्या खुलाश्यावर उमर अब्दुल्ला यांची टीका

By admin | Updated: July 1, 2017 16:21 IST

पर्रीकरांनी केलेल्या या खुलाशावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 1-  पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक हे एका न्यूज चॅनेलच्या अँकरने विचारलेल्या अपमानजक प्रश्नाचं उत्तर होतं, असा खुलासा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला. पर्रीकरांनी केलेल्या या खुलाशावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी टीका केली आहे. 
 
"न्यूज चॅनेलच्या अँकरने अपमानजनक प्रश्न विचारला म्हणून सर्जिकल स्ट्राईकची आखणी करण्यात आली, याला काय म्हणायचं ! न्यूज अँकरच्या याच प्रश्नामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान अधिक मोठा संघर्ष पेटला असता. तरीही असले निर्णय करणाऱ्यांच्या हाती आपण सुरक्षित असल्याची भावना आपण जोपासणं अपेक्षित आहे!, असं ट्विट जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केलं आहे.  
 
"अशा प्रकारच्या निर्णया घेण्याच्या प्रक्रियेमुळे आपण सुरक्षित आहोत का?, असा सवालही उमर अब्दुला यांनी विचारला आहे. 
 
"भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर एका टीव्ही अँकरने केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांना अपमानजनक सवाल विचारला होता. हा माझ्यासाठी एक अपमान होता. यामुळेच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची योजना आखली", असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत. 
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यवसायिकांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, "मी नोव्हेंबर 2014 मध्ये जेव्हा संरक्षणमंत्री म्हणून पदभार स्विकारला तेव्हा संरक्षण मंत्रालय पुर्णपणे ढासळलेलं होतं. पुर्णपणे गोंधळाचं वातावरण होतं. याचवेळी मनोहर पर्रीकरांनी भारत-म्यानमार सीमारेषा आणि भारत-पाकिस्तान सीमेवर करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसंबंधी माहिती दिली. कशाप्रकारे या सर्जिंकल स्ट्राईकचं प्लानिंग करण्यात आलं हेदेखील त्यांनी सांगितलं. पर्रीकर यांनी सांगितलं की, "जेव्हा मला मणिपूरमध्ये 6 डोग्रा रेजिमेंटवर हल्ला झाल्याची आणि त्यात 18 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली तेव्हा ते मला खूप अपमानजक वाटलं. माझ्यासाठी तो वैयक्तिक अपमान होता". "नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँडसारख्या छोट्या दहशतवादी संघटनेकडून इतक्या भारतीय जवानांचा मृत्यू होणं हा माझ्यासाठी अपमानच होता", असं पर्रीकर यांनी सांगितलं.  यानंतर 8 जून रोजी भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून आपल्या जवानांच्या हत्येचा बदला घेत अतिरेक्यांचा खात्मा केला होता. 
 
आणखी वाचा :
 

 

सर्जिकल स्ट्राईक एका न्यूज अँकरच्या अपमानाचं उत्तर होतं - मनोहर पर्रीकर

 
 
 
"आम्ही कोणतीही माहिती दिली नसताना ही बातमी लीक झाली होती. मात्र एका प्रश्नाने माझा अपमान झाला. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड एका कार्यक्रमात कशाप्रकारे सर्जिकल स्ट्राईक करण्यात येतो याची माहिती सांगत होते. यावेळी न्यूज अॅकरने त्यांनी तुम्ही हिच हिंमत वेस्टर्न फ्रंटवर दाखवणार का ? असा सवाल विचारला. एक यशस्वी सर्जिंकल स्ट्राईक केल्यानंतर हा माझ्यासाठी अजून एक अपमान होता. मात्र मी ते शांतपणे ऐकून घेतलं, आणि वेळ आल्यावर याचं उत्तर द्यायचं ठरवलं", असं मनोहर पर्रीकरांनी सांगितलं. 
 
पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसाठी 15 महिन्यांपासून तयारी सुरु होती. 29 सप्टेंबर 2016 रोजी करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसाठी 9 जूनपासून म्हणजे 15 महिने आधीच तयारी सुरु झाली होती असा खुलासा मनोहर पर्रीकरांनी केला आहे.