शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

पर्रीकरांच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दलच्या खुलाश्यावर उमर अब्दुल्ला यांची टीका

By admin | Updated: July 1, 2017 16:21 IST

पर्रीकरांनी केलेल्या या खुलाशावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 1-  पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक हे एका न्यूज चॅनेलच्या अँकरने विचारलेल्या अपमानजक प्रश्नाचं उत्तर होतं, असा खुलासा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला. पर्रीकरांनी केलेल्या या खुलाशावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी टीका केली आहे. 
 
"न्यूज चॅनेलच्या अँकरने अपमानजनक प्रश्न विचारला म्हणून सर्जिकल स्ट्राईकची आखणी करण्यात आली, याला काय म्हणायचं ! न्यूज अँकरच्या याच प्रश्नामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान अधिक मोठा संघर्ष पेटला असता. तरीही असले निर्णय करणाऱ्यांच्या हाती आपण सुरक्षित असल्याची भावना आपण जोपासणं अपेक्षित आहे!, असं ट्विट जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केलं आहे.  
 
"अशा प्रकारच्या निर्णया घेण्याच्या प्रक्रियेमुळे आपण सुरक्षित आहोत का?, असा सवालही उमर अब्दुला यांनी विचारला आहे. 
 
"भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर एका टीव्ही अँकरने केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांना अपमानजनक सवाल विचारला होता. हा माझ्यासाठी एक अपमान होता. यामुळेच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची योजना आखली", असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत. 
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यवसायिकांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, "मी नोव्हेंबर 2014 मध्ये जेव्हा संरक्षणमंत्री म्हणून पदभार स्विकारला तेव्हा संरक्षण मंत्रालय पुर्णपणे ढासळलेलं होतं. पुर्णपणे गोंधळाचं वातावरण होतं. याचवेळी मनोहर पर्रीकरांनी भारत-म्यानमार सीमारेषा आणि भारत-पाकिस्तान सीमेवर करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसंबंधी माहिती दिली. कशाप्रकारे या सर्जिंकल स्ट्राईकचं प्लानिंग करण्यात आलं हेदेखील त्यांनी सांगितलं. पर्रीकर यांनी सांगितलं की, "जेव्हा मला मणिपूरमध्ये 6 डोग्रा रेजिमेंटवर हल्ला झाल्याची आणि त्यात 18 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली तेव्हा ते मला खूप अपमानजक वाटलं. माझ्यासाठी तो वैयक्तिक अपमान होता". "नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँडसारख्या छोट्या दहशतवादी संघटनेकडून इतक्या भारतीय जवानांचा मृत्यू होणं हा माझ्यासाठी अपमानच होता", असं पर्रीकर यांनी सांगितलं.  यानंतर 8 जून रोजी भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून आपल्या जवानांच्या हत्येचा बदला घेत अतिरेक्यांचा खात्मा केला होता. 
 
आणखी वाचा :
 

 

सर्जिकल स्ट्राईक एका न्यूज अँकरच्या अपमानाचं उत्तर होतं - मनोहर पर्रीकर

 
 
 
"आम्ही कोणतीही माहिती दिली नसताना ही बातमी लीक झाली होती. मात्र एका प्रश्नाने माझा अपमान झाला. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड एका कार्यक्रमात कशाप्रकारे सर्जिकल स्ट्राईक करण्यात येतो याची माहिती सांगत होते. यावेळी न्यूज अॅकरने त्यांनी तुम्ही हिच हिंमत वेस्टर्न फ्रंटवर दाखवणार का ? असा सवाल विचारला. एक यशस्वी सर्जिंकल स्ट्राईक केल्यानंतर हा माझ्यासाठी अजून एक अपमान होता. मात्र मी ते शांतपणे ऐकून घेतलं, आणि वेळ आल्यावर याचं उत्तर द्यायचं ठरवलं", असं मनोहर पर्रीकरांनी सांगितलं. 
 
पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसाठी 15 महिन्यांपासून तयारी सुरु होती. 29 सप्टेंबर 2016 रोजी करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसाठी 9 जूनपासून म्हणजे 15 महिने आधीच तयारी सुरु झाली होती असा खुलासा मनोहर पर्रीकरांनी केला आहे.