शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग केला नाही

By admin | Updated: May 27, 2015 23:49 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार गैरमुद्यांकडे लोकांचे लक्ष वळविण्यासाठी भ्रष्टाचाराचा राग आळवत आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार गैरमुद्यांकडे लोकांचे लक्ष वळविण्यासाठी भ्रष्टाचाराचा राग आळवत आहे. आपण कधीही स्वत:च्या, कुटुंबाच्या किंवा मित्र परिवाराच्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग केलेला नाही, अशा शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारी मोदी सरकारवर तोफ डागली.मोदी सरकारच्या काळात लोकशाही संस्था धोक्यात आहे आणि जलद आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याच्या नावावर आता कल्याणकारी राज्याची संकल्पनाच पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात येत आहे, असा स्पष्ट आरोप मनमोहनसिंग यांनी केला. ते नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलत होते. २ जी लायसेन्सप्रकरणी सहकार्य न केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी मनमोहनसिंग यांनी आपल्याला दिली होती, असा आरोप ‘ट्राय’चे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. या पार्श्वभूमीवर मनमोहनसिंग यांनी हे वक्तव्य केले.संपुआच्या कार्यक्रमांना नव्या रूपात सादर केले जात आहे आणि हा भाजप सरकारने घेतलेला पुढाकार असल्याचे मार्केटिंग करण्यात येत आहे, असा स्पष्ट आरोप मनमोहनसिंग यांनी केला. दरम्यान, डॉ. मनमोहनसिंग हे कळसूत्री बाहुले आहेत आणि ते उजळ माथ्याने खोटे बोलत आहेत, अशी बोचरी टीका भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)४संपुआ सरकारवर लावण्यात आलेला ‘धोरण लकव्या’चा आरोप फेटाळताना मनमोहनसिंग पुढे म्हणाले, माझ्या सरकारने सत्ता सोडली त्यावेळी भारत जगात सर्वाधिक वेगाने विकास पावणारी अर्थव्यवस्था होती. परंतु विद्यमान सरकारअंतर्गत अर्थव्यवस्था खिळखिळी होत चालली आहे. ४अतिशय पक्षपाती आणि सांप्रदायिक विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी भूतकाळाचे सातत्याने पुनर्लेखन केले जात आहे. असंतोष दडपला जात आहे.