शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

आॅक्टोबर हीट, त्यात पायपीट

By admin | Updated: October 10, 2014 03:04 IST

मतदानाचा दिवस जवळ येऊन ठेपलेला असताना निवडणुकीचा रंगही चढलेला दिसून येत आहे. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास उमेदवार अनेक शक्कल लढवत आहेत.

मनीषा म्हात्रे, मुंबईमतदानाचा दिवस जवळ येऊन ठेपलेला असताना निवडणुकीचा रंगही चढलेला दिसून येत आहे. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास उमेदवार अनेक शक्कल लढवत आहेत. मात्र आॅक्टोबर हीटमुळे उमेदवारांपुढे डोंगराळ भागातील पायपीट त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. त्यातही बहुतांश डोंगराळ भाग असलेल्या उत्तर पूर्व मुंबईमधील मतदारसंघातील उमेदवारांना याची जास्त झळ बसत आहे. उत्तर पूर्व मुंबईमध्ये मुलुंड ते घाटकोपर या भागातील ४० टक्के मतदार हा डोंगराळ परिसरात राहतो. हा मतदार विकासापासून मोठ्या प्रमाणात वंचित आहे. उदाहणार्थ मुलुंडमधील न्यू राहुल नगर, हनुमान पाडा, शंकर टेकडी, उदय नगर, पंंचशील नगर, भांडुप टेभीपाडा, रमाबाई नगर, विक्रोळी पार्कसाइट, फुले नगर-घाटकोपर, असल्फा व्हिलेज अशा अनेक भागांमध्ये अनेक निवडणुका आल्या आणि गेल्याही, परंतु विकासाची गंगा मात्र काही पोहोचलीच नाही. इथला मतदार अजूनही दुर्लक्षितच आहे. वीज- पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासूनही अनेक कुटुंबे वंचित आहेत. यंदाच्या पंचरंगी लढतीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मतविभागणीमुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. एरवी डोंगराळ भागाच्या उंचवट्यावर राहणाऱ्या मतदारांकडे ढुंकूनही न बघणारे राजकीय नेते सध्या या भागात धापा टाकत पायपीट करताना दिसत आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी उन्हाच्या उकाड्यात डोंगराळ भागातील प्रचार सर्वात जास्त त्रासदायक ठरत आहे. त्यातच त्यांचा जास्त वेळ जात असल्याचे दिसते. बहुतेक उमेदवार सायंकाळच्या वेळेत या ठिकाणी प्रचार करण्यावर भर देताना दिसत आहे. मात्र, उमेदवाराने कितीही पायपीट केली, तरी जो आमच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिल त्यालाच आम्ही मतदान करणार असल्याचे डोंगराळ भागात राहणाऱ्या मतदारांचे म्हणणे आहे.