शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

या 5 प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलं मौन

By admin | Updated: July 23, 2016 14:13 IST

याआधी अशा पाच घटना घडल्या ज्यावेळी मोदींनी मौन बाळगल्याची टिका विरोधकांनी केली. या घटना पुढीलप्रमाणे:

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - काश्मिरमधल्या गंभीर स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगलं असून काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेत जोरदार टीका केली. पण महत्त्वाची घटना घडल्यावर त्याबाबत मौन पाळणं हे मोदींनी याआधीही अनेकवेळा केलं आहे. त्यादृष्टीने ही पहिली घटना नाही. भाजपाच्या नेत्यांनी योग्य त्या वेळी महत्त्वाच्या मुद्यांवर मोदी बोलले असल्याचा दावा केला आहे. भाजपाने नेहमीच मनमोहन सिंग यांना मौनावरून लक्ष्य केलं होतं, आता विरोधक तीच टिका मोदींवर करत आहेत. याआधी अशा पाच घटना घडल्या ज्यावेळी मोदींनी मौन बाळगल्याची टिका विरोधकांनी केली. या घटना पुढीलप्रमाणे:
 
1 - जुलै 2016 - हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बु-हान वनी याला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारल्यानंतर काश्मिरमध्ये जनता व सुरक्षा रक्षक यांच्या तुंबळ धुमश्चक्री झाली. आत्तापर्यंत 45 जणांनी जीव गमावला असून तिथली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मात्र, पंतप्रधानांनी याबद्दल अद्याप संसदेच्या अधिवेशनात सहभाग घेतलेला नाही.
 
2 - फेब्रुवारी 2016 - रोहित वेमुलाची आत्महत्या आणि जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारची अटक या प्रकरणी प्रचंड राजकीय वाक्युद्ध रंगलं. देशभर हे चर्चेचे विषय होते, परंतु मोदींनी यासंदर्भातही भाष्य करणं टाळलं.
 
3 - जून 2015 - क्रिकेटच्या विश्वातली बडी असामी ललित मोदी संदर्भात प्रचंड वादळ उठलं. मोदीला इंग्लंडला जाण्यासाठी भाजपा नेत्यांनी मदत केली तसेच यात प्रचंड घोटाळा असल्याचे आरोप झाले. याप्रकरणीही नरेंद्र मोदींनी भाष्य करणं टाळलं.
 
4 - ऑक्टोबर 2015 - मोहम्मद इखलाखची बीफ बाळगल्याचा संशय घेत जमावानं हत्या केली. यावरून देशभर गदारोळ झाला, चर्चासत्रे झडली. पंतप्रधानांनी अशा घटनांच्या विरोधात भूमिका मांडली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली, परंतु मोदींनी मौन बाळगणं पसंत केलं.
 
5 - धर्मांतरविरोधी विधेयकाला सगळ्या राजकीय पक्षांनी सहमती द्यायला हवी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केली यावरून राजकीय गदारोळ झाला. सरकारची यासंदर्भात काय भूमिका आहे ते स्पष्ट करावं अशी मागणी विरोधकांनी केली, परंतु पंतप्रधानांनी यासंदर्भातही मौन पाळणं स्वीकारलं.