शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

या 5 प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलं मौन

By admin | Updated: July 23, 2016 14:13 IST

याआधी अशा पाच घटना घडल्या ज्यावेळी मोदींनी मौन बाळगल्याची टिका विरोधकांनी केली. या घटना पुढीलप्रमाणे:

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - काश्मिरमधल्या गंभीर स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगलं असून काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेत जोरदार टीका केली. पण महत्त्वाची घटना घडल्यावर त्याबाबत मौन पाळणं हे मोदींनी याआधीही अनेकवेळा केलं आहे. त्यादृष्टीने ही पहिली घटना नाही. भाजपाच्या नेत्यांनी योग्य त्या वेळी महत्त्वाच्या मुद्यांवर मोदी बोलले असल्याचा दावा केला आहे. भाजपाने नेहमीच मनमोहन सिंग यांना मौनावरून लक्ष्य केलं होतं, आता विरोधक तीच टिका मोदींवर करत आहेत. याआधी अशा पाच घटना घडल्या ज्यावेळी मोदींनी मौन बाळगल्याची टिका विरोधकांनी केली. या घटना पुढीलप्रमाणे:
 
1 - जुलै 2016 - हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बु-हान वनी याला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारल्यानंतर काश्मिरमध्ये जनता व सुरक्षा रक्षक यांच्या तुंबळ धुमश्चक्री झाली. आत्तापर्यंत 45 जणांनी जीव गमावला असून तिथली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मात्र, पंतप्रधानांनी याबद्दल अद्याप संसदेच्या अधिवेशनात सहभाग घेतलेला नाही.
 
2 - फेब्रुवारी 2016 - रोहित वेमुलाची आत्महत्या आणि जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारची अटक या प्रकरणी प्रचंड राजकीय वाक्युद्ध रंगलं. देशभर हे चर्चेचे विषय होते, परंतु मोदींनी यासंदर्भातही भाष्य करणं टाळलं.
 
3 - जून 2015 - क्रिकेटच्या विश्वातली बडी असामी ललित मोदी संदर्भात प्रचंड वादळ उठलं. मोदीला इंग्लंडला जाण्यासाठी भाजपा नेत्यांनी मदत केली तसेच यात प्रचंड घोटाळा असल्याचे आरोप झाले. याप्रकरणीही नरेंद्र मोदींनी भाष्य करणं टाळलं.
 
4 - ऑक्टोबर 2015 - मोहम्मद इखलाखची बीफ बाळगल्याचा संशय घेत जमावानं हत्या केली. यावरून देशभर गदारोळ झाला, चर्चासत्रे झडली. पंतप्रधानांनी अशा घटनांच्या विरोधात भूमिका मांडली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली, परंतु मोदींनी मौन बाळगणं पसंत केलं.
 
5 - धर्मांतरविरोधी विधेयकाला सगळ्या राजकीय पक्षांनी सहमती द्यायला हवी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केली यावरून राजकीय गदारोळ झाला. सरकारची यासंदर्भात काय भूमिका आहे ते स्पष्ट करावं अशी मागणी विरोधकांनी केली, परंतु पंतप्रधानांनी यासंदर्भातही मौन पाळणं स्वीकारलं.