शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

या 5 प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळगलं मौन

By admin | Updated: July 23, 2016 14:13 IST

याआधी अशा पाच घटना घडल्या ज्यावेळी मोदींनी मौन बाळगल्याची टिका विरोधकांनी केली. या घटना पुढीलप्रमाणे:

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - काश्मिरमधल्या गंभीर स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगलं असून काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेत जोरदार टीका केली. पण महत्त्वाची घटना घडल्यावर त्याबाबत मौन पाळणं हे मोदींनी याआधीही अनेकवेळा केलं आहे. त्यादृष्टीने ही पहिली घटना नाही. भाजपाच्या नेत्यांनी योग्य त्या वेळी महत्त्वाच्या मुद्यांवर मोदी बोलले असल्याचा दावा केला आहे. भाजपाने नेहमीच मनमोहन सिंग यांना मौनावरून लक्ष्य केलं होतं, आता विरोधक तीच टिका मोदींवर करत आहेत. याआधी अशा पाच घटना घडल्या ज्यावेळी मोदींनी मौन बाळगल्याची टिका विरोधकांनी केली. या घटना पुढीलप्रमाणे:
 
1 - जुलै 2016 - हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बु-हान वनी याला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारल्यानंतर काश्मिरमध्ये जनता व सुरक्षा रक्षक यांच्या तुंबळ धुमश्चक्री झाली. आत्तापर्यंत 45 जणांनी जीव गमावला असून तिथली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मात्र, पंतप्रधानांनी याबद्दल अद्याप संसदेच्या अधिवेशनात सहभाग घेतलेला नाही.
 
2 - फेब्रुवारी 2016 - रोहित वेमुलाची आत्महत्या आणि जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारची अटक या प्रकरणी प्रचंड राजकीय वाक्युद्ध रंगलं. देशभर हे चर्चेचे विषय होते, परंतु मोदींनी यासंदर्भातही भाष्य करणं टाळलं.
 
3 - जून 2015 - क्रिकेटच्या विश्वातली बडी असामी ललित मोदी संदर्भात प्रचंड वादळ उठलं. मोदीला इंग्लंडला जाण्यासाठी भाजपा नेत्यांनी मदत केली तसेच यात प्रचंड घोटाळा असल्याचे आरोप झाले. याप्रकरणीही नरेंद्र मोदींनी भाष्य करणं टाळलं.
 
4 - ऑक्टोबर 2015 - मोहम्मद इखलाखची बीफ बाळगल्याचा संशय घेत जमावानं हत्या केली. यावरून देशभर गदारोळ झाला, चर्चासत्रे झडली. पंतप्रधानांनी अशा घटनांच्या विरोधात भूमिका मांडली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली, परंतु मोदींनी मौन बाळगणं पसंत केलं.
 
5 - धर्मांतरविरोधी विधेयकाला सगळ्या राजकीय पक्षांनी सहमती द्यायला हवी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केली यावरून राजकीय गदारोळ झाला. सरकारची यासंदर्भात काय भूमिका आहे ते स्पष्ट करावं अशी मागणी विरोधकांनी केली, परंतु पंतप्रधानांनी यासंदर्भातही मौन पाळणं स्वीकारलं.