शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

आयुष्यमान भारत योजनेस डॉक्टर संघटनेचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 04:33 IST

देशभरातील १० कोटी कुटुंबांना माफक दरात आरोग्यविम्याचे संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘आयुष्यमान भारत’ या योजनेत अनेक ‘संकल्पनात्क त्रुटी व परिचालन दोष’ असल्याचा आक्षेप ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) घेतला असून सरकारने या योजनेच्या रचनेचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे.

नवी दिल्ली : देशभरातील १० कोटी कुटुंबांना माफक दरात आरोग्यविम्याचे संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘आयुष्यमान भारत’ या योजनेत अनेक ‘संकल्पनात्क त्रुटी व परिचालन दोष’ असल्याचा आक्षेप ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) घेतला असून सरकारने या योजनेच्या रचनेचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे.‘आयएमए’ ही देशभरातील दीड लाखांहून अधिक डॉक्टरांची संघटना आहे. या योजनेत विविध औषधोपचार व शल्यक्रियांसाठी ठरविलेले दर अगदीच अपुरे व अव्यवहार्य आहेत व त्याने प्रत्यक्षात होणाऱ्या खर्चाची ३० टक्केही भरपाई होऊ शकणार नाही, असे संघटनेचे मत आहे. हे दर कशाच्या आधारे ठरविले याची माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणाले की, रुग्णाच्या सुरक्षिततेशी तडजोड केल्याशिवाय, सरकारने ठरविलेल्या या दरात कोणत्याही इस्पितळास उपचार करणे अशक्य आहे. खर्च कमी करण्याच्या नावाखाली सरकार लोकांना धोेकादायक उपचारांच्या खाईत लोटत आहे. प्रसूतीसाठी होणाºया सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी या योजनेत ९,००० रुपयांचा दर ठरला आहे. एवढया शुल्कात बाळ-बाळंतीणीच्या सुरक्षेची खात्री होईल, असे सिझेरियन करणे अशक्य आहे.आयएमचे म्हणणे आहे की, योजनेवर एवढा खर्च करण्याऐवजी दोन कोटी रुपये खर्च करून प्रत्येक जिल्हा रुग्णालय सुसज्ज केले तर त्या पैशाचा अधिक चांगला विनियोग होईल. ही योजना भपकेबाज असली तरी त्यातून कोणताही नवी राष्ट्रीय संपत्ती उभी राहणार नाही. तोच पैसा सार्वजनिक इसिपतळांवर खर्च केला तर दर्जेदार आरोग्यसेवा गोरगरिबांच्या आवाक्यात येण्यास मदत होईल. याखेरीज या योजनेतील ४०० कोटी रुपये खासगी आरोग्य विमा कंपन्यांच्या घशात जाणार आहेत, याकडे लक्ष वेधून डॉ. वानखेडकर म्हणाले की, विम्यावर आधारित आरोग्यसेवा हा प्रयोग जगभर अपयशी ठरला आहे.>सुचविला पर्यायअशा प्रकारच्या योजनेत ४० टक्के रक्कम विमा कंपन्या आणि त्रयस्थ व्यवस्थापक यांच्या खिशात जाते. त्यातून भ्रष्टाचार व अनेक गैरप्रकार बोकाळतात.त्याऐवजी या मध्यस्थांना फाटा देऊन थेट इस्पितळांकडून सेवा घेण्याची रचना असलेली योजना सरकारने आखावी, असा पर्याय ‘आयएमए’ने सुचविला आहे.