शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

आयुष्यमान भारत योजनेस डॉक्टर संघटनेचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 04:33 IST

देशभरातील १० कोटी कुटुंबांना माफक दरात आरोग्यविम्याचे संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘आयुष्यमान भारत’ या योजनेत अनेक ‘संकल्पनात्क त्रुटी व परिचालन दोष’ असल्याचा आक्षेप ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) घेतला असून सरकारने या योजनेच्या रचनेचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे.

नवी दिल्ली : देशभरातील १० कोटी कुटुंबांना माफक दरात आरोग्यविम्याचे संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘आयुष्यमान भारत’ या योजनेत अनेक ‘संकल्पनात्क त्रुटी व परिचालन दोष’ असल्याचा आक्षेप ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) घेतला असून सरकारने या योजनेच्या रचनेचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे.‘आयएमए’ ही देशभरातील दीड लाखांहून अधिक डॉक्टरांची संघटना आहे. या योजनेत विविध औषधोपचार व शल्यक्रियांसाठी ठरविलेले दर अगदीच अपुरे व अव्यवहार्य आहेत व त्याने प्रत्यक्षात होणाऱ्या खर्चाची ३० टक्केही भरपाई होऊ शकणार नाही, असे संघटनेचे मत आहे. हे दर कशाच्या आधारे ठरविले याची माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणाले की, रुग्णाच्या सुरक्षिततेशी तडजोड केल्याशिवाय, सरकारने ठरविलेल्या या दरात कोणत्याही इस्पितळास उपचार करणे अशक्य आहे. खर्च कमी करण्याच्या नावाखाली सरकार लोकांना धोेकादायक उपचारांच्या खाईत लोटत आहे. प्रसूतीसाठी होणाºया सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी या योजनेत ९,००० रुपयांचा दर ठरला आहे. एवढया शुल्कात बाळ-बाळंतीणीच्या सुरक्षेची खात्री होईल, असे सिझेरियन करणे अशक्य आहे.आयएमचे म्हणणे आहे की, योजनेवर एवढा खर्च करण्याऐवजी दोन कोटी रुपये खर्च करून प्रत्येक जिल्हा रुग्णालय सुसज्ज केले तर त्या पैशाचा अधिक चांगला विनियोग होईल. ही योजना भपकेबाज असली तरी त्यातून कोणताही नवी राष्ट्रीय संपत्ती उभी राहणार नाही. तोच पैसा सार्वजनिक इसिपतळांवर खर्च केला तर दर्जेदार आरोग्यसेवा गोरगरिबांच्या आवाक्यात येण्यास मदत होईल. याखेरीज या योजनेतील ४०० कोटी रुपये खासगी आरोग्य विमा कंपन्यांच्या घशात जाणार आहेत, याकडे लक्ष वेधून डॉ. वानखेडकर म्हणाले की, विम्यावर आधारित आरोग्यसेवा हा प्रयोग जगभर अपयशी ठरला आहे.>सुचविला पर्यायअशा प्रकारच्या योजनेत ४० टक्के रक्कम विमा कंपन्या आणि त्रयस्थ व्यवस्थापक यांच्या खिशात जाते. त्यातून भ्रष्टाचार व अनेक गैरप्रकार बोकाळतात.त्याऐवजी या मध्यस्थांना फाटा देऊन थेट इस्पितळांकडून सेवा घेण्याची रचना असलेली योजना सरकारने आखावी, असा पर्याय ‘आयएमए’ने सुचविला आहे.