शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

ओबामा प्रभावाने पाकचे चिनी अध्यक्षांना लष्करी परेडचे आमंत्रण

By admin | Updated: February 4, 2015 03:02 IST

भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा येऊन गेल्यानंतर पाकिस्तानची पोटदुखी उसळली आहे.

२३ मार्चला कार्यक्रम : सात वर्षांनंतर होणार लष्करी संचलनइस्लामाबाद : भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा येऊन गेल्यानंतर पाकिस्तानची पोटदुखी उसळली आहे. पाकने आपल्या राष्ट्रीय दिनाचा कार्यक्रम ठरविला असून, त्याअंतर्गत सात वर्षांच्या खंडांनंतर होणाऱ्या लष्करी संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना निमंत्रित केले आहे. २३ मार्च रोजी पाकिस्तानमध्ये हा कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम कोठे आयोजित केला जाईल हे अद्याप निश्चित नाही; पण इस्लामाबाद शहराजवळच कोठेतरी त्याचे आयोजन केले जाईल असे पाकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले, तसेच जिनपिंग यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे किंवा नाही हेही स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तानी लष्करातील तिन्ही दलांचे संचलन गेल्या सात वर्षांपूर्वी बंद करण्यात आले होते. देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. पाकिस्तानच्या या लष्करी संचलनात संरक्षण क्षमतेचे प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम केले जात असत. याआधी २३ मार्च २००८ रोजी अखेरचे लष्करी संचलन झाले होते. त्यावेळी परवेझ मुशर्रफ अध्यक्षपदी होते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा लष्करी संचलन सुरू करण्याची घोषणा केली आहे? ओबामा यांच्या भारत भेटीमुळे आशिया-पॅसिफिक भागात चीन विरोधात नवी आघाडी उभी राहील असे चीनला वाटत असून, त्यामुळे चीनमध्ये विरोधाचे वातावरण होते.या आठवड्यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा चीन दौरा चीनला चुचकारण्यासाठी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीही २६ मे च्या आधी म्हणजेच पंतप्रधानपदी येऊन वर्ष पूर्ण करण्याआधी चीनला भेट देणार आहेत. (वृत्तसंस्था)पाकविरोधी प्रस्तावाला चीन व रशियाचा पाठिंबाच्बीजिंग : दहशतवादासंदर्भात संयुक्त राष्ट्रात भारताकडून मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावाला चीन व रशियाने पाठिंबा दिला असून, हा ठराव पाकिस्तानच्या विरोधात असल्याने पाकला हा जबर धक्का मानला जात आहे. च्पाकिस्तानकडून भारतावर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होणाऱ्या अतिरेक्यांना आश्रय दिला जातो. त्यामुळे दहशतवादाला आश्रय देणाऱ्या, तसेच मदत करणाऱ्या देशांविरोधात संयुक्त राष्ट्रात ठराव मांडण्याचा भारताचा प्रयत्न आहे.च्सोमवारी भारताच्या या भूमिकेला चीन व रशिया यांनीही पाठिंबा जाहीर केला. हे फार मोठे यश असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. चीन व रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. च्चीनने पाकविरोधी भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताला आपल्या दृष्टीने महत्त्व असल्याचे दाखविणे, तसेच स्वत: चीनलाही दहशतवादाचा त्रास होत असल्याची कबुली देणे, असे या भूमिकेमागील कारण असावे असे मानले जाते.