शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

भाजपा आणि एमआयएम यांच्यात ‘नुरा कुस्ती’

By admin | Updated: March 17, 2016 00:38 IST

भाजपा आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष राजकीय फायदा उकळण्यासाठी आपसात नुरा कुस्ती करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही पक्षांचे आपसात साटेलोटे आहे, अशा शब्दांत

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीभाजपा आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष राजकीय फायदा उकळण्यासाठी आपसात नुरा कुस्ती करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही पक्षांचे आपसात साटेलोटे आहे, अशा शब्दांत काँग्रेसने बुधवारी ‘वंदेमातरम्’ आणि ‘भारत माता की जय’वरून या दोन्ही पक्षांवर शरसंधान केले.‘वंदेमातरम्’ किंवा ‘भारत माता की जय’ म्हटले पाहिजे असे भारतीय राज्यघटना किंवा अन्य कोणत्याही नियमावलीत लिहिलेले नाही. परंतु हा नारा स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मनाच्या अभिव्यक्तीच्या रूपात पुढे आला होता. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात देशाप्रति सन्मान आणि समर्पण भाव व्यक्त करण्यासाठी ‘वंदेमातरम्’ किंवा ‘भारत माता की जय’ हे नारे बुलंद करण्यात आले, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे. ‘कुणी माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही’, असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी एका सभेत म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून निर्माण झालेले वादळ शमताना दिसत नाही. लेखक आणि खासदार जावेद अख्तर यांनी मंगळवारी ‘भारत माता की जय’ म्हणत ओवैसी यांना प्र त्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. ‘कुणाच्या सांगण्यावरून नारा देऊन मला माझी देशभक्ती सिद्ध करावी लागेल काय? असे केलेच पाहिजे हे कोणत्या कायद्यात लिहिले आहे? मी खासदार आहे, मी संविधानाची शपथ घेतलेली आहे आणि मी संसदेत हजर राहतो. मी संविधानाच्या व्यवस्थेशी बांधील आहे. तरी आमच्या देशभक्तीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे,’ असे ओवैसी म्हणाले होते.पं. जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ या पुस्तकाचा उल्लेख करताना सिंघवी म्हणाले, या देशाचे लोक, वृक्ष, जंगल, पर्वत, नद्या हे सर्वच भारत माता आहेत. कारण याच धरतीवर हे सर्वकाही विद्यमान आहे. हा देशासाठी समर्पित नारा आहे आणि त्याचा उच्चार करण्यात वाईट काही नाही. उलट हा नारा बुलंद करताना आम्हाला अभिमान वाटतो. परंतु ओवैसी, गिरिराज सिंग, साक्षी महाराज, आजम खान आणि शफिक-उ-रहमान यांच्यासारखे लोक मात्र केवळ ध्रुवीकरणासाठी आणि राजकीय फायदा उकळण्यासाठी एकमेकांच्या हातात हात घालून द्वेष पसरविण्याचे काम करीत आले आहेत.समाज विभाजन करण्याचा प्रयत्ननिवडणुका जवळ आल्या की हे लोक समाज तोडण्याच्या आपल्या कारवायांना गती देतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत याचा अनुभव आला आहे आणि आता पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुका पाहूनच भाजपा आणि एमआयएमने एकत्र येऊन ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप सिंघवी यांनी केला.