शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

विषारी दारूच्या बळींची संख्या ८५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 05:57 IST

१२ जणांना घेतले ताब्यात। आसाममध्ये ३०० हून अधिक जणांवर उपचार सुरू

जोरहाट : आसामच्या गोलाघाट आणि जोरहाटमध्ये चहाच्या बागांमधील कामगारांनी विषारी दारू प्यायल्यानंतर ३४० जणांवर उपचार सुरू आहेत. यातील मृतांची संख्या ८५ वर पोहोचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी शनिवारी ही माहिती दिली.जोरहाट मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचा दौरा केल्यानंतर मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, मृत्यूचा आकडा दर मिनिटाला वाढत आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जेएमसीएचमध्ये ४६, गोलाघाटमध्ये ३५ आणि टिटाबोरमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जेएमसीएचमध्ये २२१ जणांवर, गोलाघाटमध्ये १११ जणांवर उपचार सुरु आहेत.

मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, मी येथे आल्यानंतरही आणखी काही जणांना येथे दाखल करण्यात आले आहे.वैद्यकीय शिक्षणाचे संचालक अनुप बर्मन या रुग्णांवर देखरेख करणार आहेत. गोलघाट आणि जोरहाट जिल्ह्यात ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांनी ही दारू प्यायली होती. काही वेळातच चार महिलांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कुलधर सैकिया यांनी सांगितले की, गोलाघाटमध्ये या प्रकरणी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयेमुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जोरहाटच्या मेडिकल कॉलेज- हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेत असलेल्या नागरिकांची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी दोन लाख तर आजारी पडलेल्या नागरिकांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री सोनोवाल यांनी सांगितले की, यातील दोषींना सोडणार नाही. तर, विरोधी पक्ष काँग्रेसने असा आरोप केला आहे की, अवैध दारुची विक्री रोखण्यासाठी राज्य सरकारने योग्य ती पावले उचलली नाहीत. राज्याच्या अबकारी खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणीही पक्षाने केली आहे.