शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

महात्मा गांधींहून एनटीआर महान

By admin | Updated: January 19, 2017 04:57 IST

महात्मा गांधी यांच्यापेक्षा एन.टी. रामाराव (एनटीआर) यांनी तेलुगू लोकांसाठी अधिक काम केले

विजयवाडा : महात्मा गांधी यांच्यापेक्षा एन.टी. रामाराव (एनटीआर) यांनी तेलुगू लोकांसाठी अधिक काम केले, असे विधान करून तेलुगू देसम पक्षाच्या खासदाराने नव्या वादाला तोंड फोडले आहे. मचावरम गावातील एसआरआर अ‍ॅण्ड सीव्हीआर कॉलेजमध्ये तेलुगू देसमचे संस्थापक एन.टी. रामाराव यांचा पुतळा उभारण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना विजयवाडाचे खासदार केसिनेनी श्रीनिवास यांनी हे वादग्रस्त विधान केले. एनटीआर हे काही महात्मा गांधी नाहीत, असे सांगून काही लोकांनी त्यांचा पुतळा उभारण्यास विरोध केला होता. त्याला उत्तर देताना श्रीनिवास म्हणाले की, एनटीआर गांधींपेक्षा कमी नव्हते. किंबहुना त्यांनी तेलुगू जनतेसाठी गांधींहून अधिक काम केले. विरोधी पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते निदर्शने करीत असूनही एनटीआर यांच्या २१ व्या पुण्यतिथीनिमित्त कॉलेजच्या आवारात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. घोषणाबाजीद्वारे सोहळ्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही निदर्शकांना पोलिसांनी अटक केली, तर इतरांना कॉलेजच्या परिसरातून बाहेर काढले. >अडथळा नाहीपुतळा उभारण्यास एसएफआय, एआयएसएफ, एनएसयूआय आणि इतर विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला होता. तथापि, एनटीआर या कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याच्या आधारे तेलुगू देसमच्या नेत्यांनी पुतळा उभारण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. कॉलेज व्यवस्थापन आणि माजी विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले होते. एनटीआर यांचा पुतळा रस्त्यावर उभारला नसून, त्यामुळे वाहतुकीला अडथळाही होत नाही. त्यामुळे कोणाला आक्षेप घ्यायचे काही कारण नाही, असे श्रीनिवास म्हणाले.