शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अनिवासी भारतीय 500 गावांना घेणार दत्तक

By admin | Updated: June 6, 2017 13:04 IST

भारतातील जवळपास 500 गावे अमेरिकेत राहणारे अनिवासी भारतीय दत्तक घेणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
 
वाशिंग्टन, दि. 06 - भारतातील ग्रामीण भागांचा विकास करण्याच्या दृष्टीने सरकार आणि काही सामाजिक संस्था सर्वच स्तरातून काम करत आहेत. तसेच, आता या ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी अनिवासी भारतीय पुढाकार घेणार आहेत. भारतातील जवळपास 500 गावे अमेरिकेत राहणारे अनिवासी भारतीय दत्तक घेणार आहेत.
 
यासंदर्भात अधिकृत घोषणा सिलिकॉन व्हॅलीमध्ये होणा-या "बिग आयडियाज् फॉर बेटर इंडिया" या कार्यक्रमादरम्यान करण्यात येणार आहे. "बिग आयडियाज् फॉर बेटर इंडिया" या कार्यक्रमाचे एक निवेदन जारी करण्यात आले असून हा कार्यक्रम येत्या एक जुलैला होणार आहे. तसेच, या कार्यक्रमात आधात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचे प्रवचन होणार असून या कार्यक्रमाला एक हजारहून अधिक अनिवासी भारतीय उपस्थित होतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. 
 
"बिग आयडियाज् फॉर बेटर इंडिया" कार्यक्रमाचे अध्यक्ष सतेज चौधरी म्हणाले की, शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी वाढण्याचे प्रमाण यामुळे भारतातील ग्रामीण विकासासाठी 500 गावे निवडण्यात आली असून ती दत्तक घेण्यात येणार आहेत. येत्या 2022 पर्यंत भारतातील शेतक-यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ करण्यासाठी आम्ही  भू-वैज्ञानिक, कृषीतज्ज्ञ आणि उद्योगपतींना सोबत घेऊन काम करणार आहेत. या कार्यक्रमात भारतीय शेती, सरकार अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचेही सतेज चौधरी म्हणाले.