शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

आजकाल 'भारत माता की जय' बोलता की नाही यावरुन देशभक्ती ठरवली जाते - शशी थरुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 13:02 IST

'आजकाल तुम्ही भारत माता की जय बोलता की नाही यावरुन तुमची देशभक्ती ठरवली जाते. मला बोलायला आवडेल पण मी प्रत्येकाला हे बोलायला भाग पाडलं पाहिजे का ?', असा सवाल काँग्रेस नेते शशी थरुर यांनी विचारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २१ - 'आजकाल तुम्ही भारत माता की जय बोलता की नाही यावरुन तुमची देशभक्ती ठरवली जाते. मला बोलायला आवडेल पण मी प्रत्येकाला हे बोलायला भाग पाडलं पाहिजे का ?', असा सवाल काँग्रेस नेते शशी थरुर यांनी विचारला आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना जेएनयू प्रकरणावरुन त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजपा) जोरदार टीका केली. 
 
'जे योग्य वाटतं आहे ते निवडण्याचा लोकांना हक्क असला पाहिजे. तसंच लोकशाहीत लोकांच्या कल्पनेबद्दल सहिष्णू असलं पाहिजे' असं शशी थरुर बोलले आहेत. 'आपल्या संविधानाने आपल्याला ज्याप्रकारे हवं ते बोलण्याचा अधिकार दिला आहे त्याचप्रमाणे न बोलण्याचाही अधिकार दिला आहे. कधी बोलायचं हे मी ठरवेन आणि हीच लोकशाही आहे. आपला देश फक्त हिंदी, हिंदू किंवा हिंदुस्तान नाही आहे, तर भारत आहे', असं शशी थरुर यांनी म्हंटलं आहे. 
 
कृष्णा आणि कन्हैय्यासोबत आम्हाला हा भारत हवा आहे. अनेक महत्वाच्या विषयांवर देशात चर्चा सुरु केल्याबद्दल शशी थरुर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. 'तुम्ही येथे शिकण्यासाठी आला असाल मात्र तुम्ही देशाला शिकवतदेखील आहात. जेएनयूमध्ये जे काही झालं त्यामुळे देशाला देशद्रोह, स्वातंत्र्य, लोकशाहीसारख्या विषयांबद्दल देशाला माहिती मिळाली असल्यांच शशी थरुर बोलले आहेत.