शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आजकाल 'भारत माता की जय' बोलता की नाही यावरुन देशभक्ती ठरवली जाते - शशी थरुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 13:02 IST

'आजकाल तुम्ही भारत माता की जय बोलता की नाही यावरुन तुमची देशभक्ती ठरवली जाते. मला बोलायला आवडेल पण मी प्रत्येकाला हे बोलायला भाग पाडलं पाहिजे का ?', असा सवाल काँग्रेस नेते शशी थरुर यांनी विचारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २१ - 'आजकाल तुम्ही भारत माता की जय बोलता की नाही यावरुन तुमची देशभक्ती ठरवली जाते. मला बोलायला आवडेल पण मी प्रत्येकाला हे बोलायला भाग पाडलं पाहिजे का ?', असा सवाल काँग्रेस नेते शशी थरुर यांनी विचारला आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना जेएनयू प्रकरणावरुन त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजपा) जोरदार टीका केली. 
 
'जे योग्य वाटतं आहे ते निवडण्याचा लोकांना हक्क असला पाहिजे. तसंच लोकशाहीत लोकांच्या कल्पनेबद्दल सहिष्णू असलं पाहिजे' असं शशी थरुर बोलले आहेत. 'आपल्या संविधानाने आपल्याला ज्याप्रकारे हवं ते बोलण्याचा अधिकार दिला आहे त्याचप्रमाणे न बोलण्याचाही अधिकार दिला आहे. कधी बोलायचं हे मी ठरवेन आणि हीच लोकशाही आहे. आपला देश फक्त हिंदी, हिंदू किंवा हिंदुस्तान नाही आहे, तर भारत आहे', असं शशी थरुर यांनी म्हंटलं आहे. 
 
कृष्णा आणि कन्हैय्यासोबत आम्हाला हा भारत हवा आहे. अनेक महत्वाच्या विषयांवर देशात चर्चा सुरु केल्याबद्दल शशी थरुर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. 'तुम्ही येथे शिकण्यासाठी आला असाल मात्र तुम्ही देशाला शिकवतदेखील आहात. जेएनयूमध्ये जे काही झालं त्यामुळे देशाला देशद्रोह, स्वातंत्र्य, लोकशाहीसारख्या विषयांबद्दल देशाला माहिती मिळाली असल्यांच शशी थरुर बोलले आहेत.