शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

आता ‘तसे’ वागणार नाही

By admin | Updated: February 2, 2015 01:38 IST

दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून ४९ दिवसांतच कार्यकाळ संपुष्टात आणण्याचा निर्णय घेऊन मी चूक केली; पण पुन्हा तसा वागणार नाही,

नवी दिल्ली : दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून ४९ दिवसांतच कार्यकाळ संपुष्टात आणण्याचा निर्णय घेऊन मी चूक केली; पण पुन्हा तसा वागणार नाही, अशा शब्दांत आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा दिल्लीकरांची माफी मागितली आहे़एका वृत्तवाहिनी संकेतस्थळाच्या माध्यमातून केजरीवाल यांनी रविवारी आपली ही भूमिका मांडली़ केजरीवाल यांनी गतवर्षी १४ फेब्रुवारीला राजीनामा दिला होता. पंतप्रधान बनण्यासाठी मी मुख्यमंत्रिपद सोडल्याचा आरोप माझ्यावर केला गेला; पण असे नव्हते़ मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच मी दिल्लीत निवडणुका घेण्याची मागणी केली होती; पण दिल्लीत निवडणुका झाल्या नाहीत़ कदाचित आम्ही अतिविश्वास बाळगून होतो आणि ती एक प्रामाणिक चूक होती, असेही केजरीवाल यांनी म्हटले.जनता मोठी म्हणून क्षमायाचना!आपच्या एका निर्णयाने मनोधैर्य खचल्याचे अनेक दिल्लीकरांना जाणवते आहे़ गत मे महिन्यात यामुळे आम्ही जनतेची क्षमा मागितली होती़ मी पुन्हा एकदा क्षमायाचना करू इच्छितो़ आम्ही खोटे बोलत नाही़ आमच्या निर्णयामुळे लोक अजूनही दुखावलेले आहेत़ मी यासाठी क्षमा मागतो़ कारण आम्ही ज्यांचे प्रतिनिधित्व करतो, ती जनता आमच्यापेक्षाही मोठी आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)