शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

आता १९६२ सारखी परिस्थिती राहिली नाही - अरुण जेटली

By admin | Updated: July 1, 2017 02:55 IST

भारतीय लष्कर चीन व पाकिस्तान या दोन्ही युद्ध आघाड्यांवर लढण्यास तयार आहे, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या वक्तव्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय लष्कर चीन व पाकिस्तान या दोन्ही युद्ध आघाड्यांवर लढण्यास तयार आहे, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या वक्तव्यानंतर १९६२च्या युद्धापासून धडा घ्यावा, असे भारताला सांगणाऱ्या चीनला संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पुन्हा कडक उत्तर दिले आहे. अरुण जेटली म्हणाले की, १९६२ आणि २0१७ या काळात भारत बदलला आहे, हे चीननेही लक्षात ठेवावे. ते म्हणाले की, चीन विस्तारवादी भूमिकेतून अन्य देशांच्या भूमीवर कब्जा करू पाहत आहे. भारत व भुतान यांच्यात संरक्षणविषयक करार आहे. त्यामुळे भारताला चीनच्या या विस्तारवादाची चिंता वाटत आहे. दोन देशांमध्ये वाढता तणाव पाहून भारताने सिक्किममध्ये सीमेवर ३000 अधिक र्सैनिक तैनात केले आहेत. दोन दिवसांपूर्वी चिनी सैनिकांनी तिथे घुसखोरी केली होती. त्यावेळी दोन्ही देशांच्या लष्करी सैनिकांमध्ये धक्काबुक्की व बाचाबाची झाली होती. त्यानंतर लष्करप्रमुख रावत यांनी गुरुवारी त्या भागाचा दौरा केला. त्यानंतर तिथे जादा सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सिक्कीमच्या जवळ वादग्रस्त डोक ला भागात चीनकडून रस्त्याचे काम सुरू असल्याबद्दल भारताने पुन्हा शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली, चीनने मात्र, भारताने सिक्किममधील भारतीय जवानांना परत बोलवावे, अशी अट त्यांनी घातली आहे. चीनच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, संबंधित पक्षांनी संयम राखण्याची गरज आहे.