शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

आता स्पेक्ट्रमचा होणार महालिलाव

By admin | Updated: June 23, 2016 05:15 IST

मोबाइल आणि इंटरनेट सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध बॅण्डमधील लघुलहरी मार्गिकांचा (स्पेक्ट्रम)च्या आगामी महालिलावासाठी राखीव किमतीसह अन्य प्रक्रियात्मक

नवी दिल्ली : मोबाइल आणि इंटरनेट सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध बॅण्डमधील लघुलहरी मार्गिकांचा (स्पेक्ट्रम)च्या आगामी महालिलावासाठी राखीव किमतीसह अन्य प्रक्रियात्मक बाबींना केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्र परिषदेत या निर्णयाची औपचारिक माहिती देण्यात आली नाही. मात्र स्पेक्ट्रम लिलावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.विक्रीला काढला जाणारा सर्व स्पेक्ट्रम विकला गेला, तर त्यातून सरकारला ५.६६ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळेल, अशी अपेक्षा आहे. देशातील टेलीकॉम सेवा उद्योगाची वर्ष २०१४-१५मधील एकूण उलाढाल २.५४ लाख कोटी रुपयांची होती. म्हणजेच या महालिलावातून सरकारला याहून दुप्पट महसूल मिळू शकेल.सूत्रांनुसार सध्या ठरलेल्या ढोबळ वेळापत्रकानुसार येत्या १ सप्टेंबरपासून स्पेक्ट्रमसाठी बोली सुरू होतील. त्याआधी इच्छुकांकडून अर्ज मागविणारी जाहिरात १ जुलैला प्रसिद्ध करून अर्जदारांची बोलीपूर्वीची बैठक ६ जुलै रोजी घेतली जाणे अपेक्षित आहे.आंतरमंत्रालयीन समितीने मंजूर केलेल्या नियमांनुसार या लिलावात सर्वात प्रीमियम मानल्या जाणाऱ्या ७०० मेगाहटर््झ बॅण्डमधील स्पेक्ट्रमचाही समावेश असेल. यासाठी प्रती मेगाहटर््झ ११,४८५ कोटी रुपये एवढी राखीव किंमत ठरविण्यात आली आहे. बोलीदाराने देशव्यापी पातळीवर या बॅण्डच्या स्पेक्ट्रमचा किमान ५ मेगाहटर््झचा ब्लॉक घेण्याची अट असल्याने बोलीदारास किमान ५७,४२५ कोटी रुपये मोजावे लागतील. या एकाच बॅण्डच्या स्पेक्ट्रमच्या बोलींमधून सरकारला चार लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळू शकेल. सध्या मोबाइल कंपन्या ३ जी सेवा पुरविण्यासाठी २,१०० मेगाहटर््झ बॅण्डच्या स्पेक्ट्रमचा वापर करतात. त्याऐवजी त्यांनी ७०० मेगाहटर््झ बॅण्डचा स्पेक्ट्रम वापरला तर सेवा पुरविण्याचा खर्च ७० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञांना वाटते.मात्र या बॅण्डमधून सेवा पुरविण्यासाठी आवश्यक तांत्रिक यंत्रणा अद्याप उभारलेली नाही. त्यामुळे स्पेक्ट्रम घेतला तरी त्याचा पुरेपूर वापर होणार नाही व त्यासाठी गुंतविलेले पैसे अडकून पडतील. त्यामुळे आताच्या फेरीत या बॅण्डमधील स्पेक्ट्रमचा लिलाव करू नये, अशी विनंती आघाडीच्या मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांनी केली होती. (विशेष प्रतिनिधी)एक गिगाहर्ट्झहून जास्त क्षमतेच्या बॅण्डमधील कंपन्यांना एकूण किमतीपैकी ५० टक्के रक्कम सुरुवातीला व त्यानंतर दोन वर्षांच्या सुटीनंतर पुढील १० वर्षांत उर्वरित रक्कम चुकती करण्याची अट घालावी, असेही आंतरमंत्रालयीन गटाने सुचविले होते.प्रत्यक्ष लिलावाच्या निविदांमध्ये काय अटी घातल्या जातात, याकडे टेलीकॉम उद्योगाचे लक्ष आहे. पूर्वी अशा बॅण्डमधील स्पेक्ट्रमसाठी कंपन्यांना ३३ टक्के रक्कम आधी द्यावी लागत होती.