शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

यापुढे ‘नीट’ परीक्षेचे सर्व भाषांमधील पेपर एकसारखेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:57 IST

देशभरातील वैद्यकीय प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पुढील वर्षापासून सर्व भाषांमध्ये एकसारख्याच

कोलकाता : देशभरातील वैद्यकीय प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पुढील वर्षापासून सर्व भाषांमध्ये एकसारख्याच असतील व त्यात भाषेगणिक वेगवेगळे प्रश्न असणार नाहीत.केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांना सांगितले की, सन २०१८ पासून ‘नीट’ परीक्षेच्या इंग्रजीखेरीज इतर भाषांमधील प्रश्नपत्रिका वेगळ््या असणार नाहीत तर त्या मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिकेचे फक्त साधे, सरळ भाषांतर असेल. त्यामुळे वेगवेगळ््या भाषेतील प्रश्नपत्रिकांमध्ये निरनिराळे प्रश्न असणार नाहीत.यंदाच्या ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदीमध्ये एकसारखी होती. मात्र, इतर भाषांमधील प्रश्नपत्रिकांमध्ये त्याहून वेगळे आणि काही ठिकाणी अधिक कठीण प्रश्न होते. यावरून वाद झाला होता व मद्रास उच्च न्यायालयाने यावरून निकालास अंतिम स्थगिती दिली होती. नंतर सर्वोच्च न्यायालायने ही स्थगिती उठविली खरी, पण निकाल ठरल्या तारखेला लागू शकला नव्हता.‘नीट’ परीक्षा देणाऱ्यांची संख्या कित्येक लाखांत आहे. शिवाय प्रश्नपत्रिकाही अनेक भाषांमधून काढाव्या लागतात. त्यामुळे मूळ प्रश्नपत्रिका इंग्रजीमध्ये तयार करून त्याचे इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतर करायचे म्हटले तर त्यातून कदाचित प्रश्नपत्रिका परिक्षेआधीच फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे निव्वळ भाषांतर न करता ढोबळ मानाने तेच प्रश्न कायम ठेवून भाषावार स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार केल्या गेल्या होत्या, असे समर्थन ही परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केले होते. जावडेकर यांचे आताचे उत्तर पाहता मंडळाची ही सबब मंत्रालयाने हाणून पाडल्याचे दिसते.वैद्यकीयच्या धर्तीवर ‘एक देश, एक प्रवेश परीक्षा’ या सूत्रानुसार अभियांत्रिकी प्रवेशांसाठीही देशपातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार नाही, असेही जावडेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.ते म्हणाले की, वैद्यकीय प्रवेशंसाठीच्या ‘नीट’ परिक्षेचे यंदा पहिलेच वर्ष होते. त्याचे निकालोत्तर फलित काय होते ते पाहावे लागेल. त्यामुळे अभियांत्रिकीसाठीही अशी परीक्षा घेण्याचा विषय सध्या फक्त चर्चेच्या पातळीवर आहे. (वृत्तसंस्था)५ वी, ८वीची होणार परीक्षाइयत्ता पहिली ते आठवीपर्यंत कोणाचीही परीक्षा घ्यायची नाही व कोणालाही त्याच इयत्तेत ठेवायचे नाही, या धोरणामुळे विद्यार्थ्यांचेच नुकसान होत असल्याचे दिसून आल्याने यात सुधारणा करण्यासाठी संसदेत लवकरच एक दुरुस्ती विधेयक मांडले जाईल, असेही जावडेकर यांनी सांगितले.त्यानुसार, इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची मार्चमध्ये परीक्षा घेतली जाईल. त्यात जे अनुत्तीर्ण होतील त्यांना मे महिन्यात पुन्हा एक परीक्षा घेऊन उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाईल. मात्र, मेमधील परीक्षेतही उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच इयत्तेत ठेवले जाईल. हा बदल स्वीकारणे राज्यांना ऐच्छिक असेल व २५ राज्यांनी त्यास संमती दिली आहे, असेही जावडेकर म्हणाले.