शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आता गुजरातमधील गावात मुलींच्या मोबाईल वापरावर बंदी!

By admin | Updated: February 23, 2016 01:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाचे स्वप्न बघत असताना त्यांच्याच राज्यात गुजरातमधील मेहसणा जिल्ह्याच्या एका गावात अल्पवयीन मुलींना मोबाईल फोन बाळगणे

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाचे स्वप्न बघत असताना त्यांच्याच राज्यात गुजरातमधील मेहसणा जिल्ह्याच्या एका गावात अल्पवयीन मुलींना मोबाईल फोन बाळगणे आणि त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मोबाईलमुळे मुलींचे अभ्यासातून लक्ष विचलित होते, असा दावा ही बंदी घालणाऱ्यांनी केला आहे. ही बंदी केवळ शाळकरी विद्यार्थिनींपुरतीच मर्यादित असून महाविद्यालयीन विद्यार्थीनींना यातून सवलत देण्यात आली आहे. अलीकडेच उत्तरप्रदेशातील एका गावातही अशीच बंदी घालण्यात आली आहे. काडी तालुक्यातील सूरज गावच्या पंचायतीने हे निर्बंध लादले आहेत. अल्पवयीन मुलींजवळ मोबाईल दिसल्यास त्यांना २१०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या आई-वडिलाच्या मोबाईल फोनचा वापर करता येणार आहे पण फक्त घरात व तो त्यांच्याच देखरेखीखाली. त्यांना मोबाईल घेऊन गावात फिरता येणार नाही. गावाचे सरपंच देवशी वांकर यांच्या म्हणण्यानुसार मोबाईल फोन मुली आणि त्यांच्या आईवडिलांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे बहुतांश गावकऱ्यांचे मत असल्याने सर्व सहमतीने हा निर्णय घेण्यात आला. तरुण प्रेमीयुगुल घरातून पळून जाण्यासाठीही सेलफोनचा वापर करीत असल्याचा निष्कर्ष पंचायतीने काढला आहे. दलित, पटेल, ठाकूर, रबाडी अशा सर्व समुदायाच्या लोकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना चांगल्या वाईटाची समज असते. शिवाय गावात कॉलेज नसल्याने त्यांना जवळच्या शहरांमध्ये जावे लागते. अशा परिस्थितीत आईवडिलांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांना मोबाईलची गरज असते. त्यामुळे त्यांना या बंदीतून वगळण्यात आले असल्याचे वांकर यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)मोबाईल फोनमुळे मुलींचे अभ्यासातून मन विचलित होते. त्या तासन्तास गेम खेळत बसतात आणि अभ्यासात लक्ष घालत नाहीत.मोबाईलच्या वापरामुळे त्यांच्या गरीब आईवडिलांवर विनाकारण आर्थिक बोजा पडतो. अलीकडील काळात अल्पवयीन मुलींचे मुलांसोबत पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून यालाही मोबाईलच जबाबदार आहे.नुकत्याच झालेल्या पंचायतीच्या बैठकीत मुले मोबाईलच्या माध्यमाने मुलींच्या संपर्कात राहात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. या सोईचा गैरवापर ते पळून जाण्यासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. - रामजी ठाकूर, माजी सरपंच