शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

आता गुजरातमधील गावात मुलींच्या मोबाईल वापरावर बंदी!

By admin | Updated: February 23, 2016 01:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाचे स्वप्न बघत असताना त्यांच्याच राज्यात गुजरातमधील मेहसणा जिल्ह्याच्या एका गावात अल्पवयीन मुलींना मोबाईल फोन बाळगणे

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाचे स्वप्न बघत असताना त्यांच्याच राज्यात गुजरातमधील मेहसणा जिल्ह्याच्या एका गावात अल्पवयीन मुलींना मोबाईल फोन बाळगणे आणि त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मोबाईलमुळे मुलींचे अभ्यासातून लक्ष विचलित होते, असा दावा ही बंदी घालणाऱ्यांनी केला आहे. ही बंदी केवळ शाळकरी विद्यार्थिनींपुरतीच मर्यादित असून महाविद्यालयीन विद्यार्थीनींना यातून सवलत देण्यात आली आहे. अलीकडेच उत्तरप्रदेशातील एका गावातही अशीच बंदी घालण्यात आली आहे. काडी तालुक्यातील सूरज गावच्या पंचायतीने हे निर्बंध लादले आहेत. अल्पवयीन मुलींजवळ मोबाईल दिसल्यास त्यांना २१०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या आई-वडिलाच्या मोबाईल फोनचा वापर करता येणार आहे पण फक्त घरात व तो त्यांच्याच देखरेखीखाली. त्यांना मोबाईल घेऊन गावात फिरता येणार नाही. गावाचे सरपंच देवशी वांकर यांच्या म्हणण्यानुसार मोबाईल फोन मुली आणि त्यांच्या आईवडिलांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे बहुतांश गावकऱ्यांचे मत असल्याने सर्व सहमतीने हा निर्णय घेण्यात आला. तरुण प्रेमीयुगुल घरातून पळून जाण्यासाठीही सेलफोनचा वापर करीत असल्याचा निष्कर्ष पंचायतीने काढला आहे. दलित, पटेल, ठाकूर, रबाडी अशा सर्व समुदायाच्या लोकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना चांगल्या वाईटाची समज असते. शिवाय गावात कॉलेज नसल्याने त्यांना जवळच्या शहरांमध्ये जावे लागते. अशा परिस्थितीत आईवडिलांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांना मोबाईलची गरज असते. त्यामुळे त्यांना या बंदीतून वगळण्यात आले असल्याचे वांकर यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)मोबाईल फोनमुळे मुलींचे अभ्यासातून मन विचलित होते. त्या तासन्तास गेम खेळत बसतात आणि अभ्यासात लक्ष घालत नाहीत.मोबाईलच्या वापरामुळे त्यांच्या गरीब आईवडिलांवर विनाकारण आर्थिक बोजा पडतो. अलीकडील काळात अल्पवयीन मुलींचे मुलांसोबत पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून यालाही मोबाईलच जबाबदार आहे.नुकत्याच झालेल्या पंचायतीच्या बैठकीत मुले मोबाईलच्या माध्यमाने मुलींच्या संपर्कात राहात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. या सोईचा गैरवापर ते पळून जाण्यासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. - रामजी ठाकूर, माजी सरपंच