शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आता गुजरातमधील गावात मुलींच्या मोबाईल वापरावर बंदी!

By admin | Updated: February 23, 2016 01:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाचे स्वप्न बघत असताना त्यांच्याच राज्यात गुजरातमधील मेहसणा जिल्ह्याच्या एका गावात अल्पवयीन मुलींना मोबाईल फोन बाळगणे

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाचे स्वप्न बघत असताना त्यांच्याच राज्यात गुजरातमधील मेहसणा जिल्ह्याच्या एका गावात अल्पवयीन मुलींना मोबाईल फोन बाळगणे आणि त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मोबाईलमुळे मुलींचे अभ्यासातून लक्ष विचलित होते, असा दावा ही बंदी घालणाऱ्यांनी केला आहे. ही बंदी केवळ शाळकरी विद्यार्थिनींपुरतीच मर्यादित असून महाविद्यालयीन विद्यार्थीनींना यातून सवलत देण्यात आली आहे. अलीकडेच उत्तरप्रदेशातील एका गावातही अशीच बंदी घालण्यात आली आहे. काडी तालुक्यातील सूरज गावच्या पंचायतीने हे निर्बंध लादले आहेत. अल्पवयीन मुलींजवळ मोबाईल दिसल्यास त्यांना २१०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या आई-वडिलाच्या मोबाईल फोनचा वापर करता येणार आहे पण फक्त घरात व तो त्यांच्याच देखरेखीखाली. त्यांना मोबाईल घेऊन गावात फिरता येणार नाही. गावाचे सरपंच देवशी वांकर यांच्या म्हणण्यानुसार मोबाईल फोन मुली आणि त्यांच्या आईवडिलांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे बहुतांश गावकऱ्यांचे मत असल्याने सर्व सहमतीने हा निर्णय घेण्यात आला. तरुण प्रेमीयुगुल घरातून पळून जाण्यासाठीही सेलफोनचा वापर करीत असल्याचा निष्कर्ष पंचायतीने काढला आहे. दलित, पटेल, ठाकूर, रबाडी अशा सर्व समुदायाच्या लोकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना चांगल्या वाईटाची समज असते. शिवाय गावात कॉलेज नसल्याने त्यांना जवळच्या शहरांमध्ये जावे लागते. अशा परिस्थितीत आईवडिलांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांना मोबाईलची गरज असते. त्यामुळे त्यांना या बंदीतून वगळण्यात आले असल्याचे वांकर यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)मोबाईल फोनमुळे मुलींचे अभ्यासातून मन विचलित होते. त्या तासन्तास गेम खेळत बसतात आणि अभ्यासात लक्ष घालत नाहीत.मोबाईलच्या वापरामुळे त्यांच्या गरीब आईवडिलांवर विनाकारण आर्थिक बोजा पडतो. अलीकडील काळात अल्पवयीन मुलींचे मुलांसोबत पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून यालाही मोबाईलच जबाबदार आहे.नुकत्याच झालेल्या पंचायतीच्या बैठकीत मुले मोबाईलच्या माध्यमाने मुलींच्या संपर्कात राहात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. या सोईचा गैरवापर ते पळून जाण्यासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. - रामजी ठाकूर, माजी सरपंच