शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

आता नेताजींनीच पक्षाची धुरा सांभाळावी - शिवपाल यादव

By admin | Updated: October 24, 2016 11:58 IST

मुलायम सिंह यादव यांच्यामुळे समाजवादी पक्ष आज या उंचीवर पोहोचला असून त्यांनी पुन्हा पक्षाची धुरा सांभाळावी, असे शिवपाल यादव यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २४ - समाजवादी पक्ष मोठा करण्यासाठी मी नेताजींसोबत काम केले आहे, आता नेताजींनीच पक्षाची धुरा पुन्हा सांभाळावी, असे मत व्यक्त करत समाजावादी पक्षाच प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी अखिलेश यादव यांना पुन्हा विरोध दर्शवला आहे.  समाजवादी पक्षात सुरू असलेला कौटुंबिक सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला असून या संघर्षाचे केंद्रबिंदू असलेले  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी  काका शिवपाल यादव यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला. यावरूनच उत्तर प्रदेशातील वातावरण तापले असून हा गृहकलह अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये समाजवादी पक्षाच्या मुख्यालयातील बैठक आयोजित करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी अखिलेशविरोधातील नाराजी स्पष्टपणे दर्शवली. 
(समाजवादी पक्षातंर्गत 'यादवी', अखिलेश-शिवपाल समर्थक भिडले)
(उत्तर प्रदेशमध्ये 'यादवी' : रामगोपाल यादवांची सपामधून हकालपट्टी)
(मुलायम यांच्याकडे जाणार मुख्यमंत्रिपद ?)
(अखिलेश यांनी शिवपालना मंत्रिपदावरून हटवले, अन्य तीन मंत्र्यांनाही घरचा रस्ता)
 
' मुलायमसिंह यादव यांच्यामुळेच पक्ष आज या उंचीवर पोहोचला आहे, पक्षात बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही' अशा शब्दांत त्यांनी अखिलेशना फटकारले. ' तसेच अखिलेश यांनीच नवा पक्ष काढून निवडणूक लढवण्याची भाषा केली होती' असा आरोपही त्यांनी केला. तसेच ' पक्षात खोटारड्यांना बिलकूल जागा नाही' असे सांगत शिवपाल यांनी अखिलेश यांच्यावर टीका केली.
 
 काय म्हणाले शिवपाल यादव : 
१) समाजवादी पक्षाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेताजींसोबत काम केले आहे, खूप संघर्ष केला. गावागावात जाऊन आम्ही नेताजींची पत्र पोहोचवली, खूप मेहनत केली आम्ही. 
२) नेताजीं आणि मुख्यमंत्र्यांच्या सर्व आदेशांचे मी  पालन केले. कोणती आज्ञा आम्ही मानली नाही ते तुम्हीच सांगा. 
३) माझ्याकडून सर्व विभाग काढून घेण्यात आले.  सरकारमध्ये माझं काहीच योगदान नाही का? 
४) मी नेताजींच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष बनलो होतो,  पण माझ्याकडे पद आल्यावर माझ्यासोबत काय झाले? मी मुख्यमंत्र्यापेक्षा कमी काम केलं का?
5) अखिलेशनेच दुसरा पक्ष स्थापून निवडणूक लढवण्याची भाषा केली होती. मी शपथ घेऊन सांगतो, त्यांनीच दुसरा पक्ष काढण्याचा उच्चार केला होता. 
६) जमीनीवर कोणाचा कब्जा नसेल, भ्रष्टाचार संपेल तेव्हाच आपण २०१७ साली सरकार स्थापन करू शकू. 
७) रामगोपालची दलाली चालू देणार नाही.