शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

आता नेताजींनीच पक्षाची धुरा सांभाळावी - शिवपाल यादव

By admin | Updated: October 24, 2016 11:58 IST

मुलायम सिंह यादव यांच्यामुळे समाजवादी पक्ष आज या उंचीवर पोहोचला असून त्यांनी पुन्हा पक्षाची धुरा सांभाळावी, असे शिवपाल यादव यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २४ - समाजवादी पक्ष मोठा करण्यासाठी मी नेताजींसोबत काम केले आहे, आता नेताजींनीच पक्षाची धुरा पुन्हा सांभाळावी, असे मत व्यक्त करत समाजावादी पक्षाच प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी अखिलेश यादव यांना पुन्हा विरोध दर्शवला आहे.  समाजवादी पक्षात सुरू असलेला कौटुंबिक सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला असून या संघर्षाचे केंद्रबिंदू असलेले  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी  काका शिवपाल यादव यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला. यावरूनच उत्तर प्रदेशातील वातावरण तापले असून हा गृहकलह अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये समाजवादी पक्षाच्या मुख्यालयातील बैठक आयोजित करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी अखिलेशविरोधातील नाराजी स्पष्टपणे दर्शवली. 
(समाजवादी पक्षातंर्गत 'यादवी', अखिलेश-शिवपाल समर्थक भिडले)
(उत्तर प्रदेशमध्ये 'यादवी' : रामगोपाल यादवांची सपामधून हकालपट्टी)
(मुलायम यांच्याकडे जाणार मुख्यमंत्रिपद ?)
(अखिलेश यांनी शिवपालना मंत्रिपदावरून हटवले, अन्य तीन मंत्र्यांनाही घरचा रस्ता)
 
' मुलायमसिंह यादव यांच्यामुळेच पक्ष आज या उंचीवर पोहोचला आहे, पक्षात बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही' अशा शब्दांत त्यांनी अखिलेशना फटकारले. ' तसेच अखिलेश यांनीच नवा पक्ष काढून निवडणूक लढवण्याची भाषा केली होती' असा आरोपही त्यांनी केला. तसेच ' पक्षात खोटारड्यांना बिलकूल जागा नाही' असे सांगत शिवपाल यांनी अखिलेश यांच्यावर टीका केली.
 
 काय म्हणाले शिवपाल यादव : 
१) समाजवादी पक्षाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेताजींसोबत काम केले आहे, खूप संघर्ष केला. गावागावात जाऊन आम्ही नेताजींची पत्र पोहोचवली, खूप मेहनत केली आम्ही. 
२) नेताजीं आणि मुख्यमंत्र्यांच्या सर्व आदेशांचे मी  पालन केले. कोणती आज्ञा आम्ही मानली नाही ते तुम्हीच सांगा. 
३) माझ्याकडून सर्व विभाग काढून घेण्यात आले.  सरकारमध्ये माझं काहीच योगदान नाही का? 
४) मी नेताजींच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष बनलो होतो,  पण माझ्याकडे पद आल्यावर माझ्यासोबत काय झाले? मी मुख्यमंत्र्यापेक्षा कमी काम केलं का?
5) अखिलेशनेच दुसरा पक्ष स्थापून निवडणूक लढवण्याची भाषा केली होती. मी शपथ घेऊन सांगतो, त्यांनीच दुसरा पक्ष काढण्याचा उच्चार केला होता. 
६) जमीनीवर कोणाचा कब्जा नसेल, भ्रष्टाचार संपेल तेव्हाच आपण २०१७ साली सरकार स्थापन करू शकू. 
७) रामगोपालची दलाली चालू देणार नाही.