शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

आता केजरीवालांसमोर उरले "हे" चार पर्याय

By admin | Published: April 26, 2017 5:58 PM

पंजाब, गोव्यापाठोपाठ दिल्लीमध्येही आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाल्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी पुढची राजकीय वाटचाल अतिशय खडतर बनली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 26 - पंजाब, गोव्यापाठोपाठ दिल्लीमध्येही आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाल्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी पुढची राजकीय वाटचाल अतिशय खडतर बनली आहे. त्यांना पक्षांतर्गत असंतोषाचा सामना करावा लागणार असून, पक्षफुटीचा धोकाही त्यांच्यासमोर आहे. पाचवर्ष पूर्ण होण्याआधीच जनतेचे नायक बनलेले केजरीवाल थट्टेचा विषय बनले आहेत. केजरीवाल स्वत:च या सर्व परिस्थितीला जबाबदार आहेत. त्यांच्या पराभवाला चार प्रमुख कारणे आहेत. 
 
1) अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात एखादी गोष्ट जाते तेव्हा ते स्वत:चे आत्मपरिक्षण करायला कधीही तयार नसतात. पराभव खिलाडूवृत्तीने मान्य करण्याऐवजी दुस-यावर बोट दाखवतात. यावेळी आपने पराभवासाठी ईव्हीएममशीनला जबाबदार धरले आहे. 
 
2) दिल्ली महापालिकांचे निकाल विरोधात गेले तर, आपण पुन्हा आंदोलनाचे जुने राजकारण सुरु करु असा इशारा केजरीवालांनी दिला आहे. ईव्हीएममशीन्स विरोधात आंदोलन करण्याचे आपने ठरवले आहे. ईव्हीएममुळेच आपला पराभव झाला असा आपचा दावा आहे. पण केजरीवालांना या आंदोलनात लोकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यताच नाही. कारण त्यांना जनतेनेच मतपेटीतून जागा दाखवली आहे आणि यापूर्वी जेव्हा दिल्लीमध्ये ते सत्तेत आले तेव्हा ईव्हीएममध्ये घोटाळा नव्हता का ? या प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यावी लागतील. 
 
3) केजरीवाल भाजपा विरोधी महाआघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात. ज्यामुळे काही काळापुरता का होईना त्यांचे राजकीय महत्व टिकून राहिल. या महाआघाडीमध्ये सहभागी होण्याचा आपला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. 
 
4) सद्य परिस्थितीत केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होऊन मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. पक्षबांधणीवर लक्ष द्यावे. ज्यांना पक्षातून बाहेर काढलेय त्यांना पुन्हा पक्षात स्थान द्यावे. नवे चेहरे लोकांसमोर आणावेत. जेणेकरुन लोकांमध्ये आपबद्दल विश्वास निर्माण होईल.