शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

आता ब्रिटनमध्ये जाणं होणार अवघड

By admin | Updated: November 5, 2016 00:04 IST

देशात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्थलांतराला चाप लावण्यासाठी ब्रिटनने व्हिसा धोरणात बदल केला असून, युरोपियन समुदायाबाहेरील नागरिकांसाठी व्हिसासंबंधीचे नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 4 -  ब्रिटनमध्ये भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. शिक्षण, रोजगाराच्या संधी यामुळे दरवर्षी हजारो भारतीय ब्रिटनमध्ये जात असतात. पण आता ही संख्या रोडावण्याची शक्यता आहे. देशात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्थलांतराला चाप लावण्यासाठी ब्रिटनने व्हिसा धोरणात बदल केला असून, युरोपियन समुदायाबाहेरील नागरिकांसाठी व्हिसासंबंधीचे नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या नियमाचा सर्वाधिक फटका भारतीय आणि भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.  
या बदललेल्या नियमांबाबतची घोषणा ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने केला आहे. या नियमावलीनुसार 24 नोव्हेंबरनंतर एकाच कंपनीअंतर्गत बदलीसाठी आयसीटी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या उत्पन्नाची मर्यादा 20 हजार 800 पौंडावरून 30 हजार पौंड करण्यात आली आहे.  आयसीटी व्हिसाचा वापर करून ब्रिटनमध्ये जाणाऱ्यांमध्ये 90 टक्के भारतीय असतात. त्यामुळे या नियमातील बदलाचा फटक सर्वाधिक प्रमाणात भारतीयांनाच बसणार आहे.  ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भारत दौऱ्यापूर्वीच काही दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला आहे. 
त्याबरोबरच  ब्रिटनचे नागरिकत्व मिळवण्यासाठीही आता कडक परीक्षा द्यावी लागणार आहे. नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या  युरोपियन देशांबाहेरील  नागरिकांची इंग्रजीची अधिक आव्हानात्मक परीक्षा घेण्यात येणार आहे.