शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

प्रचार संपला आता लक्ष मतपरीक्षेकडे

By admin | Updated: February 5, 2015 18:51 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचारतोफा आता थंडावल्या असून शेवटच्या तृणमूल काँग्रेसने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ -  दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा संध्याकाळी थंडावल्या असून शेवटच्या दिवशी तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया इमाम असोसिएशनने 'आप'ला पाठिंबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे डेरा सच्चा सौदानेही भाजपाला पाठिंबा जाहीर करत निवडणुकीतील रंगत वाढवली आहे. आता सर्वांचे लक्ष ७ फेब्रुवारीरोजी होणा-या मतदानाकडे लागले आहे. 
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत रोड शो काढून काँग्रेसचा प्रचार केला. 
किरण बेदी यांनी प्रचारसभा घेत मतदारांशी संवाद साधला. अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नाही अशी घणाघाती टीका किरण बेदी यांनी केली. तर भाजपा मतदारांना विकत घेत असून काही ठिकाणी मतदारांना धमकीही दिली जात आहे असा गंभीर आरोप आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला. आता देशासाठी काम करायचे असून देव आमच्यासोबत आहे अशी भावनिक सादही केजरीवाल यांनी घातली. 
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी डेरा सच्चा सौदाने दिल्लीसाठी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. दिल्लीतील डेरा सच्चा सौदाचे सुमारे २० लाख समर्थक असल्याचा दावा डेरा सच्चा सौदाने केला असून याचा भाजपाला कितपत फायदा होईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल. डेरा सच्चा सौदाने साथ दिल्याने भाजपाला थोडा दिलासा मिळाला असला तरी आपला पाठिंबा देणा-यांची संख्या वाढली आहे. डावे पक्ष व जदयूपाठोपाठ तृणमूल काँग्रेस आणि ऑल इंडिया इमाम असोसिएशननेही शेवटच्या क्षणी आपला पाठिंबा जाहीर करत आपचे पारडे जड केले. दिवसभर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिले होते. संध्याकाळी सहा वाजता प्रचारतोफा थंडावल्या. आता सर्वांचे लक्ष ७ फेब्रुवारीला होणा-या मतदानाकडे लागले आहे.
 
विजय किंवा पराभवही मोदींचाच - शत्रुघ्न सिन्हा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्णधार असल्याने दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजय किंवा पराभव हा त्यांचाच असेल असे सांगत भाजपा नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची ताकद दिसत आहे अशा शब्दांत त्यांनी केजरीवाल यांचे कौतुक केले. शत्रुघ्न सिन्हा यांच्या या विधानामुळे भाजपाची चांगलीच कोंडी झाली होती.