शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आता आधार कार्ड खिशात नाही मोबाईलमध्ये घेऊन फिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 16:15 IST

एखाद्या महत्वाच्या कामासाठी गेला असाल आणि आधार कार्ड घरीच राहिलं असेल तर...

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - एखाद्या महत्वाच्या कामासाठी गेला असाल आणि आधार कार्ड घरीच राहिलं असेल तर...अशी परिस्थिती निर्माण झाली तर यापुढे घाबरायची गरज नाही. पण यासाठी तुमचा मोबाईल फोन सोबत असणं गरजेचं आहे. कारण आता तुमचं आधार कार्ड मोबाईल फोनमध्ये ठेवणं शक्य असणार आहे. यामुळे नेहमी आधार कार्ड खिशात घेऊन फिरण्याची गरज राहणार नाही. आधार कार्ड जारी करणा-या यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) mAadhaar नावाचं एक अॅप लॉन्च केलं आहे. यामुळे आधार कार्ड नेहमी आपल्या मोबाईलमध्ये ठेवणं शक्य होणार आहे.
  
संबंधित बातम्या
व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन? आधार कार्ड प्रकरण 9 सदस्यीय घटनापीठाकडे
आधार नाही, तर आहार नाही!
 
‘जिव्हाळा’ला हवाय आधार 
 
सध्या हे अॅप फक्त अॅड्रॉईडसाठी उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर्स आपलं आधार प्रोफाईल ओळखपत्राप्रमाणे फोनमध्ये ठेवू शकतात. इतकंच नाही तर आधार कार्डशी संबंधित किती बायोमेट्रिक माहिती अॅपसोबत शेअर करायची हेदेखील आपल्याच हातात असणार आहे.   
 
याशिवाय अॅपच्या माध्यमातून क्यूआर कोडच्या सहाय्याने आधार प्रोफाईल पाहता येऊ शकतो, तसंच ईकेवायसी डिटेल्सही शेअर करु शकणार आहोत. mAadhaar अॅप गुगल प्लेस्टोअरमधून डाऊनलोड केलं जाऊ शकतं. मात्र यासाठी आधारशी संबंधित नंबर असणं गरजेचं आहे.
 
यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) हे अॅप बीटा व्हर्जन असल्याचं सांगितलं आहे. म्हणजे हे अॅप अद्यापही विकसित केलं जात असून सध्या त्याचा वापर करण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. अॅपमध्ये सध्या काही त्रुटी असून प्लेस्टोअरवर युजर्सनी देखील तक्रारींची नोंद केली आहे. 
 
आधार कार्ड प्रकरण 9 सदस्यीय घटनापीठाकडे
सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड प्रकरणी सुनावणी करताना नऊ सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवलं आहे. आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणं हे व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे का हे जाणून घेण्यासाठी 9 सदस्यांचं घटनापीठ दोन दिवस सर्व बाजू जाणून घेण्याचा प्रय़त्न करणार आहे.  यापुर्वी पाच न्यायाधीशांचं खंडपीठ या प्रकरणी सुनावणी करणार होतं. मात्र, न्यायालयाने  हे प्रकरण 9 सदस्यीय घटनापीठाकडे सुपूर्द केलं. 
 
इन्कम टॅक्स रिटर्न नियमांच्या बदलासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना जारी करत आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणं अनिवार्य केलं होतं. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावरील सुनावणी दरम्यान, ‘आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक केल्यास कुणाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन होईल का? असा सवाल सुप्रीम कोर्टानं सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे खरंच आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणं हे व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे का हेच जाणून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टानं नऊ सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण सुपूर्द केलं आहे.