शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आता सर्व जिल्ह्यांत मिळणार पासपोर्ट

By admin | Updated: June 13, 2017 21:30 IST

येत्या दोन वर्षांत सर्व 800 जिल्ह्यांमध्ये पासपोर्ट बनवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - येत्या दोन वर्षांत सर्व 800 जिल्ह्यांमध्ये पासपोर्ट बनवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्र सरकारची सर्व जिल्ह्यांतील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह म्हणाले, या वर्षी 150 पोस्ट ऑफिस सेवा केंद्र उघडण्यात येणार आहेत. तसेच दोन वर्षांच्या आत 800 मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनीही या योजनेची अर्थसंकल्पात घोषणा केली होती. सेवा केंद्राची सुविधा सर्व जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच पासपोर्ट बनल्यानंतर तो घरपोच पोहोचवण्याचं काम पोस्ट ऑफिस करणार आहेत.(भारतात विमान प्रवासासाठी आता लागणार पासपोर्ट)

गेल्या काही दिवसांपूर्वी देशांतर्गत प्रवासासाठी सरकार लवकरच आधार कार्ड किंवा पासपोर्ट आवश्यक करणार असल्याची चर्चा आहे. विमानातून प्रवास करण्यास बंदी असलेल्या प्रवाशांची सरकार यादी बनवणार असून, त्याच धर्तीवर प्रवाशांची पूर्ण ओळख पटण्यासाठी आधार किंवा पासपोर्ट बंधनकारक करण्याचा विचार आहे.
 
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याकडून नुकतीच एअर इंडियाच्या विमानात एअर इंडियाच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकार सुरक्षित प्रवास आणि दांडगाई करणाऱ्या प्रवाशांना विमानात प्रवेश रोखण्यासाठी उपाय करीत आहे. विमान प्रवासाचे जे आंतरराष्ट्रीय नियम आहेत त्यानुसारच प्रवाशाच्या ओळखीची प्रक्रिया असेल. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी तिकीट बुक करताना प्रवाशाला पासपोर्ट किंवा आधारकार्डचा तपशील द्यावा लागतो.
 
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, मंत्रालय लवकरच "नो फ्लाय" यादी जारी करणार आहे. ज्यात चार प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई निश्चित होणार आहे. या चार प्रकारचे गुन्हे केल्यास तुमच्या हवाई प्रवासावर प्रतिबंध असेल. मात्र ही व्यवस्था लागू करण्याआधी प्रवाशांची ओळख होणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रवाशांना विमान तिकीट बुकिंगच्या वेळी पासपोर्ट किंवा आधार कार्ड दाखवावं लागणार आहे. या दोन्हीमधील कोणतंही एक दस्तावेज ग्राह्य धरलं जाणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय पुढच्याच आठवड्यात हा नियमांचा एक ड्राफ्ट बनवून जनतेसमोर ठेवणार आहे. जनतेलाही या ड्राफ्टवर अभिप्राय देण्यासाठी 30 दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे.