शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२३ नोव्हेंबरपासून अधिवेशन?

By admin | Updated: November 6, 2015 00:57 IST

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच संसदेतल्या विविध पक्षांशी चर्चा करून हिवाळी अधिवेशनाची तारीख व कालावधी ठरवला जाईल, अशी माहिती संसदीय कामकाज

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच संसदेतल्या विविध पक्षांशी चर्चा करून हिवाळी अधिवेशनाची तारीख व कालावधी ठरवला जाईल, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडूंनी पत्रकारांना दिली. बिहारचा निकाल रविवारी आहे. संभवत: २३ नोव्हेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होईल व डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ते चालेल, अशी शक्यता सरकारी सूत्रांनी वर्तवली आहे.वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हे सरकारच्या दृष्टिने सर्वाधिक महत्वाचे विधेयक हिवाळी अधिवेशनात आहे. कोणत्याही स्थितीत ते मंजूर व्हावे, अशी सरकारची अपेक्षा आहे. विविध पक्षांमधे या विधेयकाबाबत व्यापक सहमती आहे. काँग्रेसचा मात्र या विधेयकाला सशर्त पाठिंबा आहे. काही आक्षेप काँग्रेसने सरकारला कळवले आहेत. सरकारतर्फे त्याचे निराकरण झाल्यास हे बहुचर्चित विधेयक मंजूर होण्यास अडचण येणार नाही, असे जयराम रमेश म्हणाले.बिहार विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर सरकार तत्परतेने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला लागेल. संसदेत अनेक विधेयके प्रलंबित आहेत. त्यांच्या मंजुरीचा मार्ग प्रशस्त व्हावा, यासाठी विरोधी पक्षांशी विचारविनिमय करण्यास सरकार सर्वप्रथम प्राधान्य देईल. प्रलंबित विधेयकांच्या दृष्टिने हे अधिवेशन अत्यंत महत्वाचे आहे. अनेक महत्वाच्या विधेयकांबाबत सरकारला तसेच विरोधकांनाही आपली भूमिका याच अधिवेशनात स्पष्ट करावी लागणार आहे. बिहारचा प्रचार दौरा आटोपल्यानंतर बुधवारपासून दिल्लीच्या सरकारी कार्यालयात वेगाने कामकाज सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळाले. पंतप्रधानांच्या निर्देशानुसार तमाम केंद्रीय मंत्री व विविध खात्यांचे सचिव दिल्लीत उपस्थित होते. जन धन योजना, रेल्वेचे विविध प्रकल्प, भारत बांगलादेश सीमेवर तारांचे कुंपण घालण्याचे कामकाज, याखेरीज जम्मू काश्मीर, आसाम, अरूणाचल प्रदेश, झारखंड व गोव्यात ज्या केंद्रीय प्रकल्पांचे काम सुरू आहे, अशा कामकाजाची समीक्षा बुधवारी करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी मुख्यत्वे पायाभूत सुविधांच्या योजनांचा आढावा घेतला. विकास दर ७.३ टक्क्यांवर पोहोचूनही पायाभूत विकासाशी संबंधित उद्योग व उत्पादन उद्योगात फारशी प्रगती नाही. याबाबत सरकार चिंतेत असून या क्षेत्राला विशेष प्रोत्साहन देणाऱ्या नव्या योजना सरकार जाहीर करण्याची शक्यता आहे, असे सरकारी सूत्रांकडून समजले.