शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

२३ नोव्हेंबरपासून अधिवेशन?

By admin | Updated: November 6, 2015 00:57 IST

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच संसदेतल्या विविध पक्षांशी चर्चा करून हिवाळी अधिवेशनाची तारीख व कालावधी ठरवला जाईल, अशी माहिती संसदीय कामकाज

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच संसदेतल्या विविध पक्षांशी चर्चा करून हिवाळी अधिवेशनाची तारीख व कालावधी ठरवला जाईल, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडूंनी पत्रकारांना दिली. बिहारचा निकाल रविवारी आहे. संभवत: २३ नोव्हेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होईल व डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ते चालेल, अशी शक्यता सरकारी सूत्रांनी वर्तवली आहे.वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हे सरकारच्या दृष्टिने सर्वाधिक महत्वाचे विधेयक हिवाळी अधिवेशनात आहे. कोणत्याही स्थितीत ते मंजूर व्हावे, अशी सरकारची अपेक्षा आहे. विविध पक्षांमधे या विधेयकाबाबत व्यापक सहमती आहे. काँग्रेसचा मात्र या विधेयकाला सशर्त पाठिंबा आहे. काही आक्षेप काँग्रेसने सरकारला कळवले आहेत. सरकारतर्फे त्याचे निराकरण झाल्यास हे बहुचर्चित विधेयक मंजूर होण्यास अडचण येणार नाही, असे जयराम रमेश म्हणाले.बिहार विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर सरकार तत्परतेने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला लागेल. संसदेत अनेक विधेयके प्रलंबित आहेत. त्यांच्या मंजुरीचा मार्ग प्रशस्त व्हावा, यासाठी विरोधी पक्षांशी विचारविनिमय करण्यास सरकार सर्वप्रथम प्राधान्य देईल. प्रलंबित विधेयकांच्या दृष्टिने हे अधिवेशन अत्यंत महत्वाचे आहे. अनेक महत्वाच्या विधेयकांबाबत सरकारला तसेच विरोधकांनाही आपली भूमिका याच अधिवेशनात स्पष्ट करावी लागणार आहे. बिहारचा प्रचार दौरा आटोपल्यानंतर बुधवारपासून दिल्लीच्या सरकारी कार्यालयात वेगाने कामकाज सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळाले. पंतप्रधानांच्या निर्देशानुसार तमाम केंद्रीय मंत्री व विविध खात्यांचे सचिव दिल्लीत उपस्थित होते. जन धन योजना, रेल्वेचे विविध प्रकल्प, भारत बांगलादेश सीमेवर तारांचे कुंपण घालण्याचे कामकाज, याखेरीज जम्मू काश्मीर, आसाम, अरूणाचल प्रदेश, झारखंड व गोव्यात ज्या केंद्रीय प्रकल्पांचे काम सुरू आहे, अशा कामकाजाची समीक्षा बुधवारी करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी मुख्यत्वे पायाभूत सुविधांच्या योजनांचा आढावा घेतला. विकास दर ७.३ टक्क्यांवर पोहोचूनही पायाभूत विकासाशी संबंधित उद्योग व उत्पादन उद्योगात फारशी प्रगती नाही. याबाबत सरकार चिंतेत असून या क्षेत्राला विशेष प्रोत्साहन देणाऱ्या नव्या योजना सरकार जाहीर करण्याची शक्यता आहे, असे सरकारी सूत्रांकडून समजले.