शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

४ हजार व्यावसायिकांना करनिर्धारणाच्या नोटिसा मनपाचा एलबीटी विभाग : आर्थिक उत्पन्नात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 00:05 IST

जळगाव : मनपाच्या एलबीटी विभागातर्फे २०१३-२०१४ व तसेच २०१४-२०१५ सालात शहरातील सुमारे चार हजार व्यावसायिकांनी अद्याप विवरण पत्र सादर केलेले नाहीत. त्यापार्श्वभूमीवर संबंधितांना स्मरण देण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे त्यांना करनिर्धारणाच्या नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत.

जळगाव : मनपाच्या एलबीटी विभागातर्फे २०१३-२०१४ व तसेच २०१४-२०१५ सालात शहरातील सुमारे चार हजार व्यावसायिकांनी अद्याप विवरण पत्र सादर केलेले नाहीत. त्यापार्श्वभूमीवर संबंधितांना स्मरण देण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे त्यांना करनिर्धारणाच्या नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत.
जळगाव शहरात एकूण एकूण ८ हजार व्यावसायिक आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना दरवर्षी विवरण पत्र सादर करणे अनिवार्य आहे. परंतु, गेल्या दोन वर्षात अनेक व्यावसायिकांनी त्या नियमाकडे दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे.
३१ मार्चपर्यंत मुदत
ज्या व्यावसायिकांनी विवरण पत्र सादर केलेले नाही. त्यांनी तत्काळ सादर करण्याचे मनपातर्फे सूचित करण्यात आले आहेत. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. व्यावसायिकांना सुरुवातीला इन्कमटॅक्स विभागाकडे विवरण पत्र द्यावे लागते. त्याची पडताळणी झाल्यानंतर हे पत्र मनपाच्या एलबीटी विभागाकडे प्राप्त होते. परंतु, अद्याप इन्कमटॅक्स विभागाकडेही व्यावसायिकांचे विवरण पत्र प्राप्त झालेले नाहीत.
मनपाच्या आर्थिक उत्पन्नात घट
शासनाने दरवर्षी ५० कोटी उलाढाल असलेल्या कंपनी व व्यावसायिकांना स्थानिक संस्था कर भरावा लागेल, असे सूचित केले आहे. त्यानुषंगाने विचार केला तर जळगाव शहरात २८ व्यावसायिक येत होते. कालांतराने शासनाने पेट्रोल व डिझेलवरची एलबीटीही रद्द केल्याने जळगाव शहरातील ३ व्यावसायिकांकडून प्राप्त होणारे उत्पन्नही मनपाला मिळणे बंद झाले आहे. सद्य:स्थितीत आता ५० कोटी पेक्षा जास्त उलाढाल असलेले २५ व्यावसायिक शहरात आहेत. त्यांच्याकडून मनपाला दरमहा ८५ लाख रुपये कर स्वरूपात मिळत आहे. पूर्वी २८ व्यावसायिकांकडून मनपाला १ कोटीहून अधिक कर मिळत होता. त्यामुळे मनपाच्या आर्थिक उत्पन्नात घट झाली आहे.