शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

२0१९ मध्ये भाजपाविरोधी पक्षांची आघाडी होईलच, याची खात्री नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 05:21 IST

कर्नाटकातील जनता दल व काँग्रेस यांच्या सरकारमध्ये कुरबुरी सुरू झाल्यानंतर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी विरोधी ऐक्याबाबतच साशंकता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकातील जनता दल व काँग्रेस यांच्या सरकारमध्ये कुरबुरी सुरू झाल्यानंतर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी विरोधी ऐक्याबाबतच साशंकता व्यक्त केली आहे. आपले पुत्र कुमारस्वामी यांच्या शपथविधीला सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले, याचा अर्थ ते एकत्रित निवडणुका लढवतीलच, असे नाही, असे देवेगौडा यांनी म्हटले आहे.कुमारस्वामी यांच्या सरकारपुढे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आव्हान उभे करीत असून, संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्याच्या कुमारस्वामी यांचा निर्णयही सिद्धरामय्या यांना अमान्य आहे. त्यामुळे धर्मशाळामध्ये त्यांनी आपल्या काही समर्थकांना बोलावूनही घेतले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या पक्षाला गृहित धरू नये, असा इशाराही माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी दिला आहे.आमचे काँग्रेसशी मतभेद आहेतच. तरीही आम्ही एकत्र येऊ न लोकसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांत अजिबातच चर्चा झालेली नाही. मात्र, कुमारस्वामी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी एकत्र बसून, त्याबाबत निर्णय घेतली, असे सांगून, त्यांनी २0१९ मध्ये दोन पक्षांची आघाडी कायम राहतील, असे संकेत दिले, तसेच भाजपाप्रणित सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेल्या पक्षांच्या नेत्यांनी आपण भेटणार आहोत, असेही देवेगौडा यांनी स्पष्ट केले.सर्वत्र आघाडी अशक्यचमे महिन्यात बंगळुरूमध्ये झालेल्या कुमारस्वामी यांच्या शपथविधीला काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, तेलुगू देसम, भाकप अशा अनेक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यातून विरोधी ऐक्याचे दर्शन घडले होते. पण त्यानंतर निवडणुकांबाबत चर्चा झालेली नाही.पश्चिम बंगालमध्ये तृणमूल व डावे पक्ष एकत्र येणे अशक्य आहे, केरळमध्ये डावे पक्ष व काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढणार, हे निश्चित आहे.पंजाब, दिल्लीतही आप व काँग्रेस परस्परांविरोधातच लढतील. युपीत सपा व बसपा हे पक्ष एकत्र आले तरी ते काँग्रेसला फार जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे २0१९ मध्ये भाजपाच्या विरोधात सर्वत्र आघाडी होणे अशक्यच दिसते.उत्तर प्रदेश : लोकसभेसाठी सपा व बसपा यांच्यात प्रत्येकी ४0 जागा लढविण्यावरून चर्चा सुरू आहे.पश्चिम बंगाल : तृणमूल व काँग्रेस एकत्रितपणे लोकसभा निवडणुका लढतील, असे दिसत आहे.महाराष्ट्र : काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र यायच्यातयारीत असले तरी त्यांचा निर्णय व्हायचा आहे.आंध्र प्रदेश : तेलगू देसम व तेलंगणातील तेलंगणा राष्ट्रीय समिती यांनी आपली भूमिकाच स्पष्ट केलेली नाही.