शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

संघ प्रचारक नव्हे, पंतप्रधानांसारखे वागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2015 00:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या कारभारावर चालविलेल्या टीकेमुळे काँग्रेस चांगलीच संतापली आहे.

काँग्रेसचा मोदींना सल्ला : जिथे जाल, तिथे प्रतिवाद करण्याचा इशाराशीलेश शर्मा - नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या कारभारावर चालविलेल्या टीकेमुळे काँग्रेस चांगलीच संतापली आहे. याच नाराजीतून, विदेशी भूमीवर संघ प्रचारक म्हणून नव्हे, तर पंतप्रधानांसारखे वागा, असा सल्ला काँग्रेसने मोदींना दिला आहे. यापुढे परदेशात जिथे कुठे जाल, तिथे आम्ही तुमच्या खोटेपणाचा पर्दाफाश करू, असा इशाराही यानिमित्ताने काँगे्रसने मोदींना दिला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी शुक्रवारी मोदींना जोरदार लक्ष्य केले. विदेश दौऱ्यात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून खोटे बोलून मोदींनी पंतप्रधानपदाची व भारताची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. काँग्रेस याची निंदा करते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून आधीचे सरकार आणि विद्यमान विरोधकांना लक्ष्य करणे, त्यांच्यावर टीका करणे, हे पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही, असे शर्मा म्हणाले. यापुढे मोदी जगाच्या पाठीवर जिथे कुठे जातील, तिथे काँग्रेस नेत्यांना पाठवण्यात येईल. मोदींनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून काँग्रेस व संपुआ सरकारच्या कारभारावर केलेल्या टीकेला हे नेते त्याक्षणीच पत्रपरिषद घेऊन उत्तर देतील, असे शर्मा यांनी यावेळी जाहीर केले. मोदींनी गुरुवारी टोरंटो येथे भारतीय समुदायासमोर केलेल्या भाषणात काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले होते. काही लोक घाण करून गेलेत, मी ती साफ करणार आहे. घोटाळ्यांचा देश ही भारताची प्रतिमा बदलून कौशल्यपूर्ण देश अशी देशाची नवी प्रतिमा घडवणार, असे मोदी म्हणाले होते. भारताला कॅनडाकडून यावर्षीच्या उत्तरार्धात मिळणार युरेनियमओटावा : भारताशी युरेनियम पुरवठ्याचा करार करणारी कॅनेडियन कंपनी ‘कॅमिको’ यावर्षीच्या उत्तरार्धात त्याचा पुरवठा सुरू करणार असून त्याच्या वापरावर कडक निगराणी ठेवण्यात येणार आहे. कंपनी या कराराबाबत उत्साहित असून ही दोन्ही देशादरम्यानच्या नव्या संबंधांची सुरुवात असल्याचे कंपनीने म्हटले.४कॅनडाच्या दौऱ्यावर येणारे गत ४२ वर्षांतील आपण पहिले भारतीय पंतप्रधान असल्याचा दावा मोदींनी केला. हे धादांत खोटे आहे. जून २०१० मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग कॅनडाच्या दौऱ्यावर गेले होते आणि उभय देशांनी संयुक्त निवेदनही जारी केले होते. कदाचित हे मोदींना ठाऊक नसेल, असा चिमटाही आनंद शर्मा यांनी काढला.