शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

बिहार निवडणुकीपर्यंत 'मन की बात' नकोच - महाआघाडीची मागणी

By admin | Updated: September 16, 2015 11:54 IST

बिहारमधील निवडणूक संपेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी महाआघाडीच्या नेत्यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

पाटणा, दि. १६ -  बिहारमधील निवडणूक संपेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी महाआघाडीच्या नेत्यांनी केली आहे. यासंदर्भात महाआघाडीचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. मात्र मोदींच्या मन की बातवर बंदी घालणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिले आहे. 

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर आकाशवाणीवर मन की बात हा कार्यक्रम सुरु केला असून याव्दारे मोदी देशवासियांशी संवाद साधतात. मोदींच्या या कार्यक्रमावर काँग्रेस व बिहारच्या महाआघाडीतील जदयू, राष्ट्रीय जनता दलाच्या पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बिहारच्या मतदारांवर प्रभाव टाकू शकतात असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होते व म्हणूनच मन की बातवर बंदी टाकावी अशी काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसच्या या मताशी जदयू व राजदच्या नेत्यांनीही सहमती दर्शवली आहे.  महाराष्ट्र व दिल्ली निवडणुकीच्या वेळीही विरोधकांनी मोदींच्या मन की बात कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता.