शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मन की बात नव्हे, झूठी बात!

By admin | Updated: December 1, 2014 23:49 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसची धोरणे आणि कामगिरीबद्दल दिशाभूल करणारी गरळ ओकणाऱ्या नरेंद्र मोदी आणि भाजपाने सहा महिन्यांत किती आश्वासनांवर कसे घूमजाव केले

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसची धोरणे आणि कामगिरीबद्दल दिशाभूल करणारी गरळ ओकणाऱ्या नरेंद्र मोदी आणि भाजपाने सहा महिन्यांत किती आश्वासनांवर कसे घूमजाव केले आहे, याची यादीच देशातील जनतेला देताना काँग्रेसने सोशल मीडियाचे शस्त्रही प्रभावीपणे वापरले आहे. काळा पैसाभाजपाने विरोधी पक्षात असताना काळ्या पैशावरून संपुआ सरकारवर हल्लाबोल केला. देशभरात आंदोलनही झाले. १७ एप्रिल २०१४ रोजी राजनाथसिंग यांनी, भाजपाचे सरकार आले तर शंभर दिवसांच्या आत विदेशात जमा असलेला काळा पैसा भारतात परत आणू, असे वचन देशाला दिले होते. तर विदेशातील काळा पैसा परत आणून भारतातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, अशी गर्जना नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचार सभांमध्ये केली होती.काँग्रेसने हा आरोप करताना यू ट्यूबची लिंकही जारी केली, जेणेकरून लोकांना मोदींनी दिलेले ते आश्वासन प्रत्यक्ष बघता येऊ शकेल. आता तेच मोदी विदेशात नेमका किती काळा पैसा जमा आहे, हे आपल्याला ठाऊक नाही, असे रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगतात.विदेशात जमा असलेला काळा पैसा हुडकून काढण्यासाठी मनी लाँडरिंग कायद्याचा वापर का केला जात नाही, असा सवाल मोदी यांनी १ फेब्रुवारी २०११ रोजी तत्कालीन संपुआ सरकारला केला होता. मोदी आता सत्तेत आहेत. त्यांना कोण रोखत आहे? काळा पैसा परत आणण्यासाठी कायकाय केले हे त्यांनी सांगितले पाहिजे, अशी मागणी या पुस्तिकेत केली आहे. काँग्रेस सरकार खातेधारकांची नावे सर्वोच्च न्यायालयाला सांगू शकते पण जनतेला का नाही, असा सवाल करून रविशंकर प्रसाद यांनी १८ जानेवारी २०११ रोजी डबल टॅक्सेशनला ‘काँग्रेसने दिलेला टाकावू तर्क’ असे संबोधले होते. तो तर्क टाकावू होता तर मग मोदी सरकार आज तोच तर्क का देत आहे? वस्तुस्थिती ही आहे की, सत्ता प्राप्त करण्यासाठी मोदींसह भाजपा नेते दिशाभूल करण्याच्या हेतूने खोटे बोलत आले आहेत.नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांनीही निवडणूककाळात अशाचप्रकारचा तर्क दिला होता. १७ आॅक्टोबर २०१४ रोजी मोदी सरकारने घूमजाव केले. काळा पैसा असलेल्या खातेधारकांची नावे जाहीर केली जाऊ शकत नाही. कारण त्यामुळे कराराचा भंग होईल, असे मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले. मोदी सरकार सहा महिन्यात काळ्या पैशाचा एक पैदेखील परत आणू शकले आणि एकाही नव्या खातेधारकाचे नाव जाहीर करू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. न्यायालयाला जी नाही देण्यात आली, ती संपुआ सरकारने आधीच शोधून काढली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)