शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

भारत सोडणार नव्हतो, भविष्यातही सोडणार नाही - आमीर खान

By admin | Updated: November 25, 2015 16:54 IST

माझा किंवा माझी पत्नी किरण हिचा भारत सोडून कुठेही जाण्याचा विचार नसल्याचे आमीर खानने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - माझा किंवा माझी पत्नी किरण हिचा भारत सोडून कुठेही जाण्याचा विचार नसल्याचे आमीर खानने स्पष्ट केले आहे. याआधीही भारत सोडण्याचा विचार आम्ही केला नव्हता आणि भविष्यातदेखील कधी करणार नाही असे आमीरने स्पष्ट केले आहे.
जे कोणी माझ्या विरोधात आहेत, त्यांनी माझी मुलाखत नीट पाहिलेली नसावी किंवा ते माझी वाक्यं चुकीच्या पद्धतीने सादर करत आहेत असंही आमीर म्हणाला आहे. भारत माझा देश आहे आणि इथे जन्माला आल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो असं सांगणा-या आमीरने मी मनापासून जे बोललो त्याच्यावर वाईट प्रतिक्रिया देणारे माझं म्हणणं योग्य असल्याचा दाखला असल्याचं म्हटलं आहे. जे कोणी मला देशद्रोही म्हणत आहेत, त्यांना मी भारताचा अभिमानी असल्याचंच सांगेन आणि त्यासाठी मला इतरांच्या प्रशस्तीपत्राची गरज नसल्याचंही आमीरने म्हटलं आहे.
आमीरने त्याचं म्हणणं चित्तो जेथे भोयशून्यो या मन हे भयमुक्त असावं या रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेनं पूर्ण केलं आहे.
दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना गेल्या सहा ते आठ महिन्यांत घडलेल्या घटनांचा दाखला देताना किरणने भारत सोडण्याचा विषय काढल्याचे आमीरने म्हटले आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रियांचा पूर लोटला.
काँग्रेसने मोदीसरकारच्या काळात असहिष्णूता वाढत असल्याचा दाखला म्हणून हे विधान वापरलं तर आमीर असं विधान जाहीरपणे ते ही भाजपाचे मंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत करू शकतो हे सहिष्णू वातावरणाचे लक्षण असल्याचे सांगितले. तर अनेक आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांची मजल आमीरने खुशाल भारत सोडावा ते घरवापसी करावी असे सांगण्यापर्यंत गेली. आमीरच्या या खुलाशानंतर हे वादळ चहाच्या पेल्यातलं ठरावं अशी अपेक्षा आहे.