शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
8
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
9
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
10
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
11
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
12
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
13
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
14
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
15
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
16
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
17
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
18
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
19
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
20
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये

गोरक्षक नव्हे, समाजकंटक!

By admin | Updated: August 7, 2016 05:02 IST

गोरक्षणाच्या नावाखाली अनेकांनी स्वत:ची दुकानदारी थाटली आहे. या गोरक्षकांपैकी ७० ते ८० टक्के लोक रात्री भलतेच गोरखधंदे (काळे धंदे) करणारे असून, सर्व राज्य सरकारांनी त्यांची माहिती

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

गोरक्षणाच्या नावाखाली अनेकांनी स्वत:ची दुकानदारी थाटली आहे. या गोरक्षकांपैकी ७० ते ८० टक्के लोक रात्री भलतेच गोरखधंदे (काळे धंदे) करणारे असून, सर्व राज्य सरकारांनी त्यांची माहिती गोळा करावी आणि त्यांचे उद्योग जनतेसमोर आणावेत, असा सणसणीत टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लगावला.प्लास्टीक खाऊन मरणाऱ्या गायी वाचविल्या तरी ती फार मोठी गोसेवा होईल, असे सांगून मोदी म्हणाले की, जेवढ्या गायी कत्तल केल्याने मरत नाहीत, त्याहून अधिक गायी कचराकुंड्यांमधील प्लास्टीक खाऊन मरतात. गाईच्या पोटातून दोन बादल्या भरून प्लास्टीक शस्त्रक्रियेद्वारे डॉक्टरनी काढलेले स्वत: पाहिले आहे, असे मोदी म्हणाले. या गायींना प्लास्टीक खावे लागणार नाही, यासाठी काम करणे ही खरी गोसेवा ठरेल, असे त्यांनी सुनावले. गुजरातमध्ये उना येथे मेलेल्या गायीचे कातडे सोलणाऱ्या दलितांना मारहाण व गोरक्षणाच्या नावाने दलित व मुस्लिमांना मारहाण करून प्रसंगी त्यांचे खून अशा घटना घडत आहेत. हिंदुत्ववाद्यांच्या आशीर्वादाने गोरक्षकांनी उच्छाद मांडला असूनही मोदी चकार शब्द काढत नाहीत, अशी टीका होत होती. मोदींनी टीकाकारांची तोंडे बंद करतानाच मोकाट गोरक्षकांनाही चपराक लगावली.सुप्रशासनाद्वारेच सामान्यांच्या समस्या सुटतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. ते म्हणाले, भारत जगातील सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून, पुढील ३0 वर्षांत ८ टक्क्यांच्या गतीने ती वाढल्यास जगातील प्रत्येक उत्कृष्ट गोष्ट भारतीयांच्या पायाशी असेल. ‘खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन’चा अवलंब करून आपण ५ टक्के खादी वापरली तरी गरिबांचे आयुष्य बदलेल. कमालीचा संताप होतो- गोरक्षणाच्या नावे दुकानदारी थाटल्याचे पाहून आपल्याला कमालीचा संताप होतो, असे सांगून मोदी म्हणाले की, गोभक्त आणि गोरक्षक यांच्यात फरक आहे. मोदी म्हणाले, पूर्वी (मुस्लीम) बादशहा व (हिंदू) राजे यांच्यात लढाया होत. - बादशहा चलाखीने आपल्या सैन्याच्या अघाडीवर गायी ठेवत. त्यामुळे समोरच्या राजाच्या सैन्याची पंचाईत होई. शस्त्रे-अस्त्रे चालवली तर गायी मरतील, याची त्यांना चिंता असे. या बादशहांप्रमाणे हल्लीचे कथित गोरक्षक गोरक्षणाचा अंगरखा घालून वावरत आहेत.टाउन हॉल पद्धतीच्या कार्यक्रमात जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या या पहिल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी पीएमओ मोबाइल अ‍ॅप लाँच केले. मोदींच्या भाषणातील मुद्दे : लहान मुलांचे लसीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्याची गरज, पर्यटन व्यवसायाला चालना, आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरण, सुप्रशासन, स्वच्छता अभियान अशा अनेक मुद्द्यांचा पंतप्रधानांच्या भाषणात समावेश होता.