शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान नव्हे चीन भारताचा मोठा शत्रू - मुलायम सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 14:36 IST

डोकलाम प्रकरणामुळे भारत आणि चीनमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद आज संसदेतही उमटले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 -  डोकलाम प्रकरणामुळे भारत आणि चीनमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद आज संसदेतही उमटले. समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांनी लोकसभेत चीनसोबतच्या तणावाचा प्रश्न आक्रमकतेने मांडला. भारताचा सर्वात मोठा शत्रू हा पाकिस्तान नसून चीन आहे, हे मुलायम सिंह यांनी  ठळकपणे लोकसभेसमोर मांडले. 
चीनच्या कुरापतींबाबत मुलायम सिंह यादव म्हणाले, "चीन सिक्किम आणि भूतानवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या देशाने भारतावर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली आहे." यावेळी तिबेटबाबत बोटचेपी भूमिका घेण्याच्या तत्कालीन सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. कोणत्याही परिस्थिती तिबेट चीनच्या ताब्यात देता कामा नये होते. तीबेच चीनच्या ताब्यात देऊन मोठी चूक केली गेली. आता भारताने तिबेटच्या स्वातंत्र्याचे आक्रमकपणे समर्थन केले पाहिजे. तसेच त्यासाठी दलाई लामा यांची सर्वतोपरी मदतही केली पाहिजे."अधिक वाचा
( धर्म सोडा किंवा शिक्षा भोगा! चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा सदस्यांना इशारा )(भारत बनू शकतो मोठी महासत्ता, चीनी प्रसारमाध्यमांचे भाकीत )(चीन, पाकिस्तानसोबत लढण्यासाठी लागतील तब्बल 27 लाख कोटी : लष्कर )आता चीन पाकिस्तानला मदत करत आहे. तसेच तिबेटच्या सीमेवर युद्धसराव करण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे. चीनने सीमेवर सुरू केलेल्या कारवाया पाहता भूतान आणि सिक्कीमचे संरक्षण करणे ही भारताची जबाबदारी असल्याचेही मुलायम यांनी सांगितले.  
दरम्यान, काश्मीरमधील अशांततेस पाकिस्तानबरोबरच चीनही कारणीभूत आहे, असा आरोप काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी नुकताच केला होता. मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर  पत्रकारांशी बोलताना त्यांनी चीनही काश्मीरमध्ये गडबड करीत असल्याचे सांगितले.