शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

पाकिस्तान नव्हे चीन भारताचा मोठा शत्रू - मुलायम सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 14:36 IST

डोकलाम प्रकरणामुळे भारत आणि चीनमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद आज संसदेतही उमटले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 -  डोकलाम प्रकरणामुळे भारत आणि चीनमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद आज संसदेतही उमटले. समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांनी लोकसभेत चीनसोबतच्या तणावाचा प्रश्न आक्रमकतेने मांडला. भारताचा सर्वात मोठा शत्रू हा पाकिस्तान नसून चीन आहे, हे मुलायम सिंह यांनी  ठळकपणे लोकसभेसमोर मांडले. 
चीनच्या कुरापतींबाबत मुलायम सिंह यादव म्हणाले, "चीन सिक्किम आणि भूतानवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या देशाने भारतावर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली आहे." यावेळी तिबेटबाबत बोटचेपी भूमिका घेण्याच्या तत्कालीन सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. कोणत्याही परिस्थिती तिबेट चीनच्या ताब्यात देता कामा नये होते. तीबेच चीनच्या ताब्यात देऊन मोठी चूक केली गेली. आता भारताने तिबेटच्या स्वातंत्र्याचे आक्रमकपणे समर्थन केले पाहिजे. तसेच त्यासाठी दलाई लामा यांची सर्वतोपरी मदतही केली पाहिजे."अधिक वाचा
( धर्म सोडा किंवा शिक्षा भोगा! चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा सदस्यांना इशारा )(भारत बनू शकतो मोठी महासत्ता, चीनी प्रसारमाध्यमांचे भाकीत )(चीन, पाकिस्तानसोबत लढण्यासाठी लागतील तब्बल 27 लाख कोटी : लष्कर )आता चीन पाकिस्तानला मदत करत आहे. तसेच तिबेटच्या सीमेवर युद्धसराव करण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे. चीनने सीमेवर सुरू केलेल्या कारवाया पाहता भूतान आणि सिक्कीमचे संरक्षण करणे ही भारताची जबाबदारी असल्याचेही मुलायम यांनी सांगितले.  
दरम्यान, काश्मीरमधील अशांततेस पाकिस्तानबरोबरच चीनही कारणीभूत आहे, असा आरोप काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी नुकताच केला होता. मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर  पत्रकारांशी बोलताना त्यांनी चीनही काश्मीरमध्ये गडबड करीत असल्याचे सांगितले.