शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

संतांचा व्यवहारवाद न पटल्याने ते देव्हाऱ्यात

By admin | Updated: April 4, 2015 23:28 IST

संत साहित्याची उच्चतम मूल्ये धारण करण्याचे साहस न झाल्यामुळेच आणि त्यांचा व्यवहारवाद सोयीचा न वाटल्यामुळेच ते देव्हाऱ्यापुरते मर्यादित राहिले असल्याचा सूर शनिवारी परिसंवादात उमटला.

प्रतिनिधी- घुमान (संत नामदेवनगरी) संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे बंडखोर होते. ईश्वराचे लोकशाहीकरण करण्यासाठीच त्यांनी ‘संत साहित्य’ लिहिले. मात्र, संत साहित्याची उच्चतम मूल्ये धारण करण्याचे साहस न झाल्यामुळेच आणि त्यांचा व्यवहारवाद सोयीचा न वाटल्यामुळेच ते देव्हाऱ्यापुरते मर्यादित राहिले असल्याचा सूर शनिवारी परिसंवादात उमटला. संमेलनात ‘संत साहित्य देव्हाऱ्यातच, व्यवहारात का नाही?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रा. ललित अधाने, बाळ कुळकर्णी आणि डॉ. संजयकुमार करंदीकर सहभागी झाले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील होते. ४अधाने म्हणाले, संत साहित्य देव्हाऱ्यातच आहे, असे मुळीच नाही. केवळ त्याकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून आजवर पाहिले गेलेले नाही. संत साहित्याची पुनर्मांडणी होणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये उपनिषदात्मक साहित्य शिकविले गेले पाहिजे. विद्यापीठांमध्ये संत साहित्याचे तत्त्वज्ञान या विषयाचा समावेश झाला पाहिजे. बाळ कुळकर्णी यांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांतून सोदाहरण साहित्य आणि व्यवहारवाद याची व्याख्या विषद केली. ते म्हणाले, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर हे बंडखोर कवी होते. त्यांनी ईश्वराचे लोकशाहीकरण केले. मात्र, संतांनी जो व्यवहारवाद सांगितला तो सोयीचा न वाटल्यामुळे त्यांना देव्हाऱ्यात बसविण्यात आले. संत साहित्याचा गाभा स्वार्थी बुद्धिवंतांनी लपवून ठेवला. ४करंदीकर म्हणाले, संत साहित्य सामाजिक चळवळ होऊ शकली नाही. त्यातील उच्चतम मूल्यांचा विचार आत्मसात न केल्यामुळेच ते व्यवहारात येऊ शकलेले नाही. संतांचे विचार पुढे नेण्याची जवाबदारी अनुयायांची आहे. अध्यक्षीय भाषणात पाटील म्हणाले, सामान्य माणसाला देव्हारा कळतो. जे मिळते ते घेणे याला उच्चतम व्यवहार म्हणतात. संत साहित्य हे देव्हाऱ्यात राहू नये असे वाटत असले तर त्याचा जास्तीत जास्त प्रसार झाला पाहिजे.