शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

संतांचा व्यवहारवाद न पटल्याने ते देव्हाऱ्यात

By admin | Updated: April 4, 2015 23:28 IST

संत साहित्याची उच्चतम मूल्ये धारण करण्याचे साहस न झाल्यामुळेच आणि त्यांचा व्यवहारवाद सोयीचा न वाटल्यामुळेच ते देव्हाऱ्यापुरते मर्यादित राहिले असल्याचा सूर शनिवारी परिसंवादात उमटला.

प्रतिनिधी- घुमान (संत नामदेवनगरी) संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे बंडखोर होते. ईश्वराचे लोकशाहीकरण करण्यासाठीच त्यांनी ‘संत साहित्य’ लिहिले. मात्र, संत साहित्याची उच्चतम मूल्ये धारण करण्याचे साहस न झाल्यामुळेच आणि त्यांचा व्यवहारवाद सोयीचा न वाटल्यामुळेच ते देव्हाऱ्यापुरते मर्यादित राहिले असल्याचा सूर शनिवारी परिसंवादात उमटला. संमेलनात ‘संत साहित्य देव्हाऱ्यातच, व्यवहारात का नाही?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रा. ललित अधाने, बाळ कुळकर्णी आणि डॉ. संजयकुमार करंदीकर सहभागी झाले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील होते. ४अधाने म्हणाले, संत साहित्य देव्हाऱ्यातच आहे, असे मुळीच नाही. केवळ त्याकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून आजवर पाहिले गेलेले नाही. संत साहित्याची पुनर्मांडणी होणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये उपनिषदात्मक साहित्य शिकविले गेले पाहिजे. विद्यापीठांमध्ये संत साहित्याचे तत्त्वज्ञान या विषयाचा समावेश झाला पाहिजे. बाळ कुळकर्णी यांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांतून सोदाहरण साहित्य आणि व्यवहारवाद याची व्याख्या विषद केली. ते म्हणाले, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर हे बंडखोर कवी होते. त्यांनी ईश्वराचे लोकशाहीकरण केले. मात्र, संतांनी जो व्यवहारवाद सांगितला तो सोयीचा न वाटल्यामुळे त्यांना देव्हाऱ्यात बसविण्यात आले. संत साहित्याचा गाभा स्वार्थी बुद्धिवंतांनी लपवून ठेवला. ४करंदीकर म्हणाले, संत साहित्य सामाजिक चळवळ होऊ शकली नाही. त्यातील उच्चतम मूल्यांचा विचार आत्मसात न केल्यामुळेच ते व्यवहारात येऊ शकलेले नाही. संतांचे विचार पुढे नेण्याची जवाबदारी अनुयायांची आहे. अध्यक्षीय भाषणात पाटील म्हणाले, सामान्य माणसाला देव्हारा कळतो. जे मिळते ते घेणे याला उच्चतम व्यवहार म्हणतात. संत साहित्य हे देव्हाऱ्यात राहू नये असे वाटत असले तर त्याचा जास्तीत जास्त प्रसार झाला पाहिजे.