शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

संतांचा व्यवहारवाद न पटल्याने ते देव्हाऱ्यात

By admin | Updated: April 4, 2015 23:28 IST

संत साहित्याची उच्चतम मूल्ये धारण करण्याचे साहस न झाल्यामुळेच आणि त्यांचा व्यवहारवाद सोयीचा न वाटल्यामुळेच ते देव्हाऱ्यापुरते मर्यादित राहिले असल्याचा सूर शनिवारी परिसंवादात उमटला.

प्रतिनिधी- घुमान (संत नामदेवनगरी) संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे बंडखोर होते. ईश्वराचे लोकशाहीकरण करण्यासाठीच त्यांनी ‘संत साहित्य’ लिहिले. मात्र, संत साहित्याची उच्चतम मूल्ये धारण करण्याचे साहस न झाल्यामुळेच आणि त्यांचा व्यवहारवाद सोयीचा न वाटल्यामुळेच ते देव्हाऱ्यापुरते मर्यादित राहिले असल्याचा सूर शनिवारी परिसंवादात उमटला. संमेलनात ‘संत साहित्य देव्हाऱ्यातच, व्यवहारात का नाही?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रा. ललित अधाने, बाळ कुळकर्णी आणि डॉ. संजयकुमार करंदीकर सहभागी झाले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील होते. ४अधाने म्हणाले, संत साहित्य देव्हाऱ्यातच आहे, असे मुळीच नाही. केवळ त्याकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून आजवर पाहिले गेलेले नाही. संत साहित्याची पुनर्मांडणी होणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये उपनिषदात्मक साहित्य शिकविले गेले पाहिजे. विद्यापीठांमध्ये संत साहित्याचे तत्त्वज्ञान या विषयाचा समावेश झाला पाहिजे. बाळ कुळकर्णी यांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांतून सोदाहरण साहित्य आणि व्यवहारवाद याची व्याख्या विषद केली. ते म्हणाले, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर हे बंडखोर कवी होते. त्यांनी ईश्वराचे लोकशाहीकरण केले. मात्र, संतांनी जो व्यवहारवाद सांगितला तो सोयीचा न वाटल्यामुळे त्यांना देव्हाऱ्यात बसविण्यात आले. संत साहित्याचा गाभा स्वार्थी बुद्धिवंतांनी लपवून ठेवला. ४करंदीकर म्हणाले, संत साहित्य सामाजिक चळवळ होऊ शकली नाही. त्यातील उच्चतम मूल्यांचा विचार आत्मसात न केल्यामुळेच ते व्यवहारात येऊ शकलेले नाही. संतांचे विचार पुढे नेण्याची जवाबदारी अनुयायांची आहे. अध्यक्षीय भाषणात पाटील म्हणाले, सामान्य माणसाला देव्हारा कळतो. जे मिळते ते घेणे याला उच्चतम व्यवहार म्हणतात. संत साहित्य हे देव्हाऱ्यात राहू नये असे वाटत असले तर त्याचा जास्तीत जास्त प्रसार झाला पाहिजे.