शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

..तर बंदुकीतल्या गोळया मोजत बसणार नाही - राजनाथ सिंह

By admin | Updated: June 26, 2016 21:06 IST

भारत पहिली गोळी चालवणार नाही, पण पाकिस्तानने गोळीबार केला तर, आम्ही आमच्या बंदुकीतल्या गोळया मोजत बसणार नाही.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २६ - भारत पहिली गोळी चालवणार नाही, पण पाकिस्तानने गोळीबार केला तर, आम्ही आमच्या बंदुकीतल्या गोळया मोजत बसणार नाही असा सणसणीत इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी पाकिस्तानला दिला. जम्मू-काश्मीर पांम्पोरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शनिवारी सीआरपीएफचे आठ जवान शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर बोलताना सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. 
 
दहशतवादी आणि शेजा-यांकडून भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे सिंह म्हणाले. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तय्यबा या अतिरेकी संघटनेने शनिवारी पांम्पोरमध्ये सीआरपीएफच्या बसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली. कुठल्या त्रुटी राहिल्यामुळे हा हल्ला झाला त्याची माहिती घेण्यासाठी दोन सदस्यीय पथक काश्मिरला पाठवत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 
 
आपले जवान शौर्य गाजवताना प्रभावीपणे अतिरेक्यांना कंठस्नान घालत आहेत असे राजनाथ सिंह म्हणाले. शनिवारी झालेला हल्ला हा जम्मू-काश्मिरमध्ये सुरक्षा पथकांवर झालेला या महिन्यातील चौथा हल्ला आहे. मागच्या तीन मोठया हल्ल्यात १७ जवान शहीद झाले आहेत.