शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारत होरपळला; यूपीत उष्माघाताचे १0 बळी

By admin | Updated: June 7, 2017 00:22 IST

संपूर्ण उत्तर भारतातील लोक मात्र उष्णतेची लाट कधी ओसरते, याच्या प्रतिक्षेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्र आणि मुंबईत लोक पावसाची वाट पाहत असताना संपूर्ण उत्तर भारतातील लोक मात्र उष्णतेची लाट कधी ओसरते, याच्या प्रतिक्षेत आहेत. उत्तर प्रदेशात उष्माघाताने १0 जणांचा बळी घेतला आहे. बिहार, पंजाब, राजस्थान, दिल्ली तसेच ओडिशामध्येही तापमानाचा पारा ४४ अंशांच्या वर गेला असून, काही ठिकाणी तर तो ४८ अंशांवर जाऊ न पोहोचला आहे.उष्णतेच्या लाटेमुळे लोक अक्षरश: होरपळून निघत असून, दुपारी घराबाहेर पडू नका, सोबत पाण्याची बाटली ठेवा, सतत पाणी पीत राहा, मुलांना घराबाहेर पाठवू नका, अशा सूचनाच प्रशासनाने दिल्या आहेत. अर्थात घरी बसले तरी अंगाची लाहीलाही होत असून, उष्णतेमुळे आजारांची शक्यता बळावली आहे. दिल्लीत अधूनमधून पाऊस पडत असला तरी त्यानंतर लगेचच तापमान वाढत असल्याने तिथे आजारांची शक्यता अधिक आहे.उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड भागातील बहराईच जिल्ह्यामध्ये उष्माघाताने ६ मुले मरण पावली अनेक लहान मुले उष्माघातामुळे आजारी पडली आहेत. अवध भागात उष्माघाताने चार बालके मरण पावली आहेत. अनेक मुलांवर उपचार सुरू आहेत. जवळपास संपूर्ण उत्तर प्रदेश कडाक्याच्या उन्हामुळे होरपळून निघाला आहे. उत्तर प्रदेशच्या लखनौ, अलाहाबाद व बांदामध्ये तापमान ४८ अंश नोंदले गेले असून, आग्रा. सुलतानपूर, वाराणसी, झाशी येथे तापमान ४६ अंश आहे. नवी दिल्लीत पालम विमानतळ येथे ४७ व तर आया नगरमध्ये ते ४६.६ इतके होते. पंजाबातील अमृतसर व भटिंडामध्ये ४८ अंश तापमानाची नोंद झाली, तर अन्यत्र ते ४६ अंशांच्या आसपास होते. बिहारमध्ये गया येथे ४६.१ तर हरयाणामध्ये हिसार येथे ४६.६ तर अंबालात ४५ च्या वर तापमान होते. राजस्थानात श्रीगंगानगर, चुरू, कोटा, बिकानेर येथेही ४६ ते ४७ तापमानामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. ओडिशामध्येही उष्णतेची लाट आहे.पंजाब48 नवी दिल्ली47बिहार46.1हरयाणा46.6