शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारत होरपळला; यूपीत उष्माघाताचे १0 बळी

By admin | Updated: June 7, 2017 00:22 IST

संपूर्ण उत्तर भारतातील लोक मात्र उष्णतेची लाट कधी ओसरते, याच्या प्रतिक्षेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्र आणि मुंबईत लोक पावसाची वाट पाहत असताना संपूर्ण उत्तर भारतातील लोक मात्र उष्णतेची लाट कधी ओसरते, याच्या प्रतिक्षेत आहेत. उत्तर प्रदेशात उष्माघाताने १0 जणांचा बळी घेतला आहे. बिहार, पंजाब, राजस्थान, दिल्ली तसेच ओडिशामध्येही तापमानाचा पारा ४४ अंशांच्या वर गेला असून, काही ठिकाणी तर तो ४८ अंशांवर जाऊ न पोहोचला आहे.उष्णतेच्या लाटेमुळे लोक अक्षरश: होरपळून निघत असून, दुपारी घराबाहेर पडू नका, सोबत पाण्याची बाटली ठेवा, सतत पाणी पीत राहा, मुलांना घराबाहेर पाठवू नका, अशा सूचनाच प्रशासनाने दिल्या आहेत. अर्थात घरी बसले तरी अंगाची लाहीलाही होत असून, उष्णतेमुळे आजारांची शक्यता बळावली आहे. दिल्लीत अधूनमधून पाऊस पडत असला तरी त्यानंतर लगेचच तापमान वाढत असल्याने तिथे आजारांची शक्यता अधिक आहे.उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड भागातील बहराईच जिल्ह्यामध्ये उष्माघाताने ६ मुले मरण पावली अनेक लहान मुले उष्माघातामुळे आजारी पडली आहेत. अवध भागात उष्माघाताने चार बालके मरण पावली आहेत. अनेक मुलांवर उपचार सुरू आहेत. जवळपास संपूर्ण उत्तर प्रदेश कडाक्याच्या उन्हामुळे होरपळून निघाला आहे. उत्तर प्रदेशच्या लखनौ, अलाहाबाद व बांदामध्ये तापमान ४८ अंश नोंदले गेले असून, आग्रा. सुलतानपूर, वाराणसी, झाशी येथे तापमान ४६ अंश आहे. नवी दिल्लीत पालम विमानतळ येथे ४७ व तर आया नगरमध्ये ते ४६.६ इतके होते. पंजाबातील अमृतसर व भटिंडामध्ये ४८ अंश तापमानाची नोंद झाली, तर अन्यत्र ते ४६ अंशांच्या आसपास होते. बिहारमध्ये गया येथे ४६.१ तर हरयाणामध्ये हिसार येथे ४६.६ तर अंबालात ४५ च्या वर तापमान होते. राजस्थानात श्रीगंगानगर, चुरू, कोटा, बिकानेर येथेही ४६ ते ४७ तापमानामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. ओडिशामध्येही उष्णतेची लाट आहे.पंजाब48 नवी दिल्ली47बिहार46.1हरयाणा46.6