शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा निर्णय फसला - विरोधकांचे टीकास्त्र

By admin | Updated: December 27, 2016 19:16 IST

नियोजन आणि पैसा पांढरा करण्यासाठी विविध पळवाटा काढल्याने नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून, मोदींनी मागितलेली 50 दिवसांची मुदत संपत आली तरी देशातील परिस्थिती सुधरलेली नाही.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 27 - ढिसाळ नियोजन आणि भ्रष्टाचाऱ्यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी विविध पळवाटा काढल्याने नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून, मोदींनी मागितलेली 50 दिवसांची मुदत संपत आली तरी देशातील परिस्थिती सुधरलेली नाही, असे टीकास्त्र विरोधी पक्षांनी आज मोदी सरकारवर सोडले. आज दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि तृणमूलसह अन्य विरोधी पक्षांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. सरकारच्या या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचे काहीच नुकसान झाले नाही. देशातील गोरगरीब आणि शेतकऱ्यांना मात्र या हेकोखोर निर्णयामुळे त्रास होत आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी आज केला. तसेच हा निर्णय फसल्याने त्याची जबाबदारी स्वीकारून मोदींनी आता पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही विरोधकांनी केली. 
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह राजद आणि डीएमकेचे नेते उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह ममता बॅनर्जी तसेच अन्य विरोधी पक्षातील नेत्यांनी नोटाबंदीचा निर्णय आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडले. यावेळी राहुल गांधींनी मोदीविरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला, ते म्हणाले,  "नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या या निर्णयानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांनी अनेक पळवाटा काढून काळ्याचे पांढरे करून घेतले. मात्र नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली, गरीब शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे" यावेळी सहारा आणि बिर्लांकडून मिळालेल्या पैशांवरून मोदींविरोधात पुन्हा निशाणा साधत राहुल यांनी पंतप्रधानांनी या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. 
यावेळी नोटाबंदीवरुन सरकारविरोधात सुरुवातीपासूनच आघाडी उघडणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींवर कठोर शब्दात टीका केली. मोदी आणि नोटाबंदी विरोधात विरोधी पक्ष एकत्र येऊन लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, 'नोटाबंदीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत, मोदींनी अच्छे दिन आणण्याचे वचन दिले होते. ते हेच अच्छे दिन का?' नोटाबंदीमुळे देश 20 वर्षे मागे गेला असून,  गोरगरीब जनता उपाशीपोटी राहिली तरी नोटाबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला नाही, असा घणाघातही त्यांनी केला. मोदी सरकार कॅशलेसवरून बेसलेस झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
नोटाबंदीसारखा मोठा निर्णय घेताना सरकारने संसदेला विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही त्यांनी केला."नोटाबंदीबाबत सरकारने संसदेत काहीही माहिती दिली नाही, संसदेला विश्वासात घेतले नाही. संसदेला विश्वासात न घेता नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याने हा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे, " असे त्या म्हणाल्या. यावेळी राजद तसेच इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही नोटाबंदीविरोधात टीका केली. मात्र डावे आणि संयुक्त जनता दलाची अनुपस्थिती  या पत्रकार परिषदेत प्रकर्षाने जाणवली.