शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

नोटाबंदीचा निर्णय फसला - विरोधकांचे टीकास्त्र

By admin | Updated: December 27, 2016 19:16 IST

नियोजन आणि पैसा पांढरा करण्यासाठी विविध पळवाटा काढल्याने नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून, मोदींनी मागितलेली 50 दिवसांची मुदत संपत आली तरी देशातील परिस्थिती सुधरलेली नाही.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 27 - ढिसाळ नियोजन आणि भ्रष्टाचाऱ्यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी विविध पळवाटा काढल्याने नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून, मोदींनी मागितलेली 50 दिवसांची मुदत संपत आली तरी देशातील परिस्थिती सुधरलेली नाही, असे टीकास्त्र विरोधी पक्षांनी आज मोदी सरकारवर सोडले. आज दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि तृणमूलसह अन्य विरोधी पक्षांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. सरकारच्या या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचे काहीच नुकसान झाले नाही. देशातील गोरगरीब आणि शेतकऱ्यांना मात्र या हेकोखोर निर्णयामुळे त्रास होत आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी आज केला. तसेच हा निर्णय फसल्याने त्याची जबाबदारी स्वीकारून मोदींनी आता पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही विरोधकांनी केली. 
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह राजद आणि डीएमकेचे नेते उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह ममता बॅनर्जी तसेच अन्य विरोधी पक्षातील नेत्यांनी नोटाबंदीचा निर्णय आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडले. यावेळी राहुल गांधींनी मोदीविरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला, ते म्हणाले,  "नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या या निर्णयानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांनी अनेक पळवाटा काढून काळ्याचे पांढरे करून घेतले. मात्र नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली, गरीब शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे" यावेळी सहारा आणि बिर्लांकडून मिळालेल्या पैशांवरून मोदींविरोधात पुन्हा निशाणा साधत राहुल यांनी पंतप्रधानांनी या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. 
यावेळी नोटाबंदीवरुन सरकारविरोधात सुरुवातीपासूनच आघाडी उघडणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींवर कठोर शब्दात टीका केली. मोदी आणि नोटाबंदी विरोधात विरोधी पक्ष एकत्र येऊन लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, 'नोटाबंदीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत, मोदींनी अच्छे दिन आणण्याचे वचन दिले होते. ते हेच अच्छे दिन का?' नोटाबंदीमुळे देश 20 वर्षे मागे गेला असून,  गोरगरीब जनता उपाशीपोटी राहिली तरी नोटाबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला नाही, असा घणाघातही त्यांनी केला. मोदी सरकार कॅशलेसवरून बेसलेस झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
नोटाबंदीसारखा मोठा निर्णय घेताना सरकारने संसदेला विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही त्यांनी केला."नोटाबंदीबाबत सरकारने संसदेत काहीही माहिती दिली नाही, संसदेला विश्वासात घेतले नाही. संसदेला विश्वासात न घेता नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याने हा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे, " असे त्या म्हणाल्या. यावेळी राजद तसेच इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही नोटाबंदीविरोधात टीका केली. मात्र डावे आणि संयुक्त जनता दलाची अनुपस्थिती  या पत्रकार परिषदेत प्रकर्षाने जाणवली.