शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

दिल्लीतील रणात नोकरशहांची उडी

By admin | Updated: May 21, 2015 23:44 IST

आम आदमी पार्टीचे (आप)सरकार आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यादरम्यान रण पेटले असतानाच या संघर्षात होरपळल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नोकरशहांनी यात उडी घेतली आहे.

नवी दिल्ली : राजधानीत अधिकार क्षेत्रावरून आम आदमी पार्टीचे (आप)सरकार आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यादरम्यान रण पेटले असतानाच या संघर्षात होरपळल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नोकरशहांनी यात उडी घेतली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रधान सचिव (सेवा) पदावरून हटविलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी अरिंदो मजुमदार यांनी आप सरकारवर लक्ष्य साधत आम्ही असंवैधानिक आदेशांचे पालन करणार नाही असे खडसावून सांगितले.दरम्यान आयएएस आॅफिसर्स असोसिएशनने या वादात उडी घेतल्यामुळे सत्तारूढ आम आदमी पार्टी संतापली आहे. ‘केंद्राकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पदोपदी अवमान होत असताना आणि त्यांना हटविले जात असताना आयएएस आॅफिसर्स असोसिएशन मात्र कुंभकर्णासारखी झोपली होती का?’ अशा शब्दात ‘आप’चे नेते आशुतोष यांनी असोसिएशनवर हल्लाबोल केला.अधिकाऱ्यांची बैठकअरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम, केंद्रशासित प्रदेशांच्या तुकडींमधील शंभरावर आजी आणि माजी सनदी अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी रात्री येथे पार पडली. या बैठकीत मजुमदार यांनी आप सरकारवर कडाडून हल्ला चढविला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नायब राज्यापालांच्या निर्देशानुसार शकुंतला गामलीन यांची हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्तीसंबंधी आदेश काढल्यामुळे केजरीवाल यांनी गेल्या शनिवारी मजुमदार यांना पदावरून हटविले होते. नंतर नायब राज्यपालांनी त्यांना हटविण्याचा निर्णय अमान्य केला. यावर आप सरकारने सोमवारी त्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकून त्यांना काम करण्यापासून रोखले होते.ट्रान्सफर/पोस्टिंग उद्योग बंद करण्याचा ‘आप’ सरकारचा प्रयत्न-सिसोदियादिल्लीतील अधिकारी ट्रान्सफर/पोस्टिंग उद्योग चालवित आहेत आणि ‘आप’ सरकारला हा उद्योग बंद करायचा आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीबद्दल अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर सिसोदिया यांनी हे वक्तव्य केले. ते पत्रकारांशी बोलत होते.सिसोदिया म्हणाले, ‘याआधीच्या सरकारमध्ये ट्रान्सफर/पोस्टिंग उद्योग चालविणारे अधिकारी निवृत्तीनंतर आता आयएएस अधिकाऱ्यांना प्रेरणा देत आहेत. हे मोठे रोचक आहे. दिल्लीत ट्रान्सफर/पोस्टिंग हा मोठा उद्योग आहे आणि गेल्या तीन महिन्यात आम्ही हा उद्योग बंद केला आहे. सर्व बदल्या ह्या पात्रतेच्या आधारावर आणि प्रामाणिकपणे करण्यात आल्या आहेत आणि याच कारणामुळे लोक आमचा विरोध करीत आहेत. दिल्लीत ट्रान्सफर/पोस्टिंग उद्योगातून कोट्यवधी रुपये जमविण्यात आले आहेत.’