शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

दिल्लीतील रणात नोकरशहांची उडी

By admin | Updated: May 21, 2015 23:44 IST

आम आदमी पार्टीचे (आप)सरकार आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यादरम्यान रण पेटले असतानाच या संघर्षात होरपळल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नोकरशहांनी यात उडी घेतली आहे.

नवी दिल्ली : राजधानीत अधिकार क्षेत्रावरून आम आदमी पार्टीचे (आप)सरकार आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यादरम्यान रण पेटले असतानाच या संघर्षात होरपळल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नोकरशहांनी यात उडी घेतली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रधान सचिव (सेवा) पदावरून हटविलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी अरिंदो मजुमदार यांनी आप सरकारवर लक्ष्य साधत आम्ही असंवैधानिक आदेशांचे पालन करणार नाही असे खडसावून सांगितले.दरम्यान आयएएस आॅफिसर्स असोसिएशनने या वादात उडी घेतल्यामुळे सत्तारूढ आम आदमी पार्टी संतापली आहे. ‘केंद्राकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पदोपदी अवमान होत असताना आणि त्यांना हटविले जात असताना आयएएस आॅफिसर्स असोसिएशन मात्र कुंभकर्णासारखी झोपली होती का?’ अशा शब्दात ‘आप’चे नेते आशुतोष यांनी असोसिएशनवर हल्लाबोल केला.अधिकाऱ्यांची बैठकअरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम, केंद्रशासित प्रदेशांच्या तुकडींमधील शंभरावर आजी आणि माजी सनदी अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी रात्री येथे पार पडली. या बैठकीत मजुमदार यांनी आप सरकारवर कडाडून हल्ला चढविला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नायब राज्यापालांच्या निर्देशानुसार शकुंतला गामलीन यांची हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्तीसंबंधी आदेश काढल्यामुळे केजरीवाल यांनी गेल्या शनिवारी मजुमदार यांना पदावरून हटविले होते. नंतर नायब राज्यपालांनी त्यांना हटविण्याचा निर्णय अमान्य केला. यावर आप सरकारने सोमवारी त्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकून त्यांना काम करण्यापासून रोखले होते.ट्रान्सफर/पोस्टिंग उद्योग बंद करण्याचा ‘आप’ सरकारचा प्रयत्न-सिसोदियादिल्लीतील अधिकारी ट्रान्सफर/पोस्टिंग उद्योग चालवित आहेत आणि ‘आप’ सरकारला हा उद्योग बंद करायचा आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीबद्दल अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर सिसोदिया यांनी हे वक्तव्य केले. ते पत्रकारांशी बोलत होते.सिसोदिया म्हणाले, ‘याआधीच्या सरकारमध्ये ट्रान्सफर/पोस्टिंग उद्योग चालविणारे अधिकारी निवृत्तीनंतर आता आयएएस अधिकाऱ्यांना प्रेरणा देत आहेत. हे मोठे रोचक आहे. दिल्लीत ट्रान्सफर/पोस्टिंग हा मोठा उद्योग आहे आणि गेल्या तीन महिन्यात आम्ही हा उद्योग बंद केला आहे. सर्व बदल्या ह्या पात्रतेच्या आधारावर आणि प्रामाणिकपणे करण्यात आल्या आहेत आणि याच कारणामुळे लोक आमचा विरोध करीत आहेत. दिल्लीत ट्रान्सफर/पोस्टिंग उद्योगातून कोट्यवधी रुपये जमविण्यात आले आहेत.’