शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गुजरातमधला कुणीच का शहीद होत नाही? अखिलेश यादव यांचा अजब सवाल

By admin | Updated: May 10, 2017 17:52 IST

देशातील बहुतेक सर्व राज्यांमधील जवान लष्करात जाऊन शहिद होतात. मग गुजरातमधील जवान का शहीद होत नाहीत? असा अजब

ऑनलाइन लोकमत 
लखनौ, दि. 10 -  देशातील बहुतेक सर्व राज्यांमधील जवान लष्करात जाऊन शहिद होतात. मग गुजरातमधील जवान  का शहीद होत नाहीत? असा अजब सवाल उपस्थित करत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.  अखिलेश यादव यांनी हे विधान केल्यापासून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. 
 
बुधवार अखिलेश यादव म्हणाले, "उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दक्षिण भारतासह देशातील प्रत्येक भागातील जवान शहीत झाले आहेत, पण गुजरातमधील कुठल्या जवानाला वीरमरण आले असल्यास सांगा." अखिलेश यादव यांनी हे वक्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्य करून केल्याचे बोलले जात आहे. 
 
गेल्या काही काळापासून  हिंसाचाराच्या घटनांमुळे जम्मू आणि काश्मीमध्ये अशांतता माजली आहे. तेथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सातत्याने चकमकी होत आहेत. त्याबरोबरच सीमेपलीकडून पाकिस्तान सातत्याने गोळीबारच्या घटनाही घडत आहेत. त्यात जवानांना वीरमरण येत आहे, त्या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी हे वक्तव्य केले आहे. 
एकीकडे आपले जवान देशासाठी शहीद होत असतानाच राजकारणी मात्र या मुद्यावर राजकारण करण्याचे सोडत नाहीत. दुसरीकडे आजच दहशतवाद्यांनी   लष्काराचे एक अधिकारी उमर फैय्याज यांची अपहरण करून हत्या केली आहे.