शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारताला असहिष्णू म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही - अनुपम खेर

By admin | Updated: November 7, 2015 12:41 IST

प्रत्येक देशाला कोणत्या ना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, पण म्हणून कोणालाही आपल्या देशाला असहिष्णू म्हणण्याचा अधिकार नाही, असे अभिनेता अनुपम खेर यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ -  प्रत्येक देशाला कोणत्या ना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, पण म्हणून कोणालाही आपल्या देशाला असहिष्णू म्हणण्याचा अधिकार नाही, असे अभिनेता अनुपम खेर यांनी स्पष्ट केले. देशातील असहिष्णू वातावरणाच्या विरोधात अनेक साहित्यिक, लेखक, दिग्दर्शकांनी चालवलेल्या 'पुरस्कार वापसी' मोहिमेचा तीव्र शब्दात निषेध करणारे अनुपम खेर यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या समर्थनार्थ आज राजधानी दिल्लीत  'मार्च फॉर इंडिया'चे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय संग्रहालयापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात दिग्दर्शक मुधर भांडरकर, तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांसह सुमारे दोन हजार जण सहभागी झाले होते. शंखनाद करत  भारत माता की जय,  मार्च फॉर इंडिया, इंडिया इज टॉलरन्ट अशा घोषणांनी या मार्चला सुरूवात झाली. मात्र अशा घोषणा न देण्याचे आवाहन खेर यांनी उपस्थितांना केले. 
मोर्चाला सुरूवात करण्यापूर्व खेर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपण सर्व धर्मनिरपेक्ष आहोत, आपला दांभिक निधर्मीपणावर विश्वास नाही. जे लोक पुरस्कार परत करत आहेत, त्यांना १९८४ साली झालेल्या शीखविरोधी दंगलीत असहिष्णूता दिसली नव्हती का असा सवाल खेर यांनी विचारला. आपण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन देशात सहिष्णुता असल्याचे सांगणार असल्याचेही खेर म्हणाले. 
पुरस्कार वापसी ही राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याची जाहीर टीका करणारे अभिनेता अनुपम खेर यांनी ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये मोर्चा काढण्याचे घोषित केले होते. पुरस्कार वापसी ही भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन करण्यासाठी केलेले षडयंत्र असल्याची टीका खेर यांनी केली होती.