शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आता 8 तासांपुरतीच नाही राहणार सरकारी नोकरी; कामाची वेळ वाढविण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 16:02 IST

सध्या सरकारी कर्मचारी आठ तासांच्या कामाच्या नियमानुसार 26 दिवसांच्या कामानंतर वेतन घेतात.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. त्यांचे कामाचे तास वाढविण्याचा विचार सरकार करत आहे. एकीकडे सातवा वेतन आयोग लागू करताना वाढलेल्या वेतनात दुसरीकडे वेळही वाढविण्यात येणार आहे. सरकार लवकरच नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने वेतन सुधारणा नियमाचा मसुदाही तयार केला आहे. 

यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या तासामध्ये एका तासाची वाढ करण्याचे सुचविण्यात आले आहे. सध्या सरकारी कर्मचारी आठ तासांच्या कामाच्या नियमानुसार 26 दिवसांच्या कामानंतर वेतन घेतात. या मसुद्यामध्ये राष्ट्रीय कमाल वेतन मर्यादेची घोषणा सहभागी नाहीय. 

मसुद्यामध्ये सांगितले की, भविष्यात एक विशेषज्ञांची समिती कमाल वेतन मर्यादेवर सरकारला प्रस्ताव देईल. श्रम मंत्रालयाने सर्व पक्षकारांना या मसुद्यावर एका महिन्याच्या अवधीत सूचना देण्याचे सांगितले आहे. डिसेंबरमध्ये नियमांना अंतिम रुप दिले जाईल. 

मजुरी ठरविम्यासाठी देशाला तीन भौगोलिक भागांमध्ये विभागण्यात आले आहे. पहिला 40 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येचे शहर, दुसरे 10 ते 40 लाख लोकसंख्या आणि तिसरा ग्रामीण भाग करण्यात आला आहे. इकॉनॉमिक टाईम्सने हे वृत्त दिले आहे. जुलै 2018 पर्यंत दिवसाचे उत्पन्न, मजुरी 375 रुपये निर्धारित करण्यात आले होते. तसेच 9750 रुपये किमान मासिक वेतन असावे. सात सदस्यांच्या या समितीने हे सुचविले होते. तसेच शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1430 रुपये निवासी भत्ता देण्याचेही म्हटले होते. 

टॅग्स :GovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकार