शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण मंजुरीविना महाराष्ट्रात एकही महामार्ग प्रलंबित नाही

By admin | Updated: July 8, 2014 01:41 IST

पर्यावरण मंजुरीअभावी महाराष्ट्रात कोणताही महामार्ग प्रकल्प प्रलंबित नाही, अशी ग्वाही केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

नवी दिल्ली : पर्यावरण मंजुरीअभावी महाराष्ट्रात कोणताही महामार्ग प्रकल्प प्रलंबित नाही, अशी ग्वाही केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
खासदार विजय दर्डा यांनी तारांकित प्रश्न विचारताना महामार्गासंबंधी कोणते प्रकल्प प्रलंबित आहेत आणि असतील तर कधीपासून याविषयी विस्तृत माहिती मागितली होती. पर्यावरणाच्या मंजुरीसाठी किती प्रकल्प रखडले आहेत, त्यामुळे त्यांच्या खर्चात किती वाढ होणार आहे आणि महाराष्ट्रात पर्यावरणाची मंजुरी न मिळालेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.
 त्यावर लेखी उत्तरात गडकरी यांनी नमूद केले की, पर्यावरणाची मंजुरी न मिळाल्याच्या आधारावर कोणताही प्रकल्प प्रलंबित नाही. राष्ट्रीय महामार्गाचा विकास पर्यावरण मंजुरीविना रखडण्याचा महत्त्वाचा घटक 22 ऑगस्ट 13 रोजी वन आणि पर्यावरण मंत्रलयाने अधिसूचना काढल्यानंतर उरलेला नाही. हा प्रश्न सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासाला चर्चेला घेतला जाणार होता. महागाईच्या मुद्दय़ावरील चर्चेसाठी हा तास बाजूला ठेवण्यात आल्यामुळे त्यावर चर्चा होऊ शकली नाही. गडकरी यांनी लेखी उत्तर सभागृहाला दिले.
लवकरच नवे शैक्षणिक धोरण
शिक्षण संस्थांमधील संशोधन आणि नूतनीकरणाची प्रक्रिया सुधारण्यासाठी लवकरच नवे शैक्षणिक धोरण आणण्याची सरकारची योजना असल्याची माहिती केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी लेखी उत्तरात दिली.
नवे शैक्षणिक धोरण आणण्याचा सरकारचा विचार आहे काय? असल्यास त्याबाबत विस्तृत माहिती द्यावी. 1986 मध्ये आखण्यात आलेले शैक्षणिक धोरण राबविताना कोणते प्रश्न उद्भवले आहेत. नवे धोरण राबविताना सरकार दज्रेदार शिक्षण कसे देणार? असा खा. दर्डा यांनी विचारला होता. या अतारांकित प्रश्नाचा क्रमांक 33 वा होता. 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 1992 मध्ये सुधारणा करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रतील केंद्र सरकारच्या धोरणांसाठी तो मार्गदर्शक दस्तऐवज ठरला आहे.
गेल्या 2क् वर्षामध्ये शैक्षणिक चित्र बदलले आहे. त्यात अनेक लक्षणीय बदल झाले आहेत. प्राथमिक शिक्षणाचा हक्क यासारखे कायदे आले. उच्च शिक्षणाला नवा आकार द्यावा लागणार आहे. व्यावसायिक शिक्षण संस्थांमधून कौशल्य विकासाला गती द्यावी लागेल. 
जागतिकीकरणामुळे नवनवे तंत्रज्ञान येत असून अर्थव्यवस्थेचा विस्तार होत आहे, या बदलत्या परिस्थितीत गुणवत्तेच्या अभावामुळे निर्माण झालेले प्रश्न, संशोधन आणि नूतनीकरणाच्या आघाडीवरील आव्हाने पेलण्यासाठी सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा प्रस्ताव ठेवला आहे, असे स्मृती इराणी यांनी लेखी उत्तरात म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)