शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

पर्यावरण मंजुरीविना महाराष्ट्रात एकही महामार्ग प्रलंबित नाही

By admin | Updated: July 8, 2014 01:41 IST

पर्यावरण मंजुरीअभावी महाराष्ट्रात कोणताही महामार्ग प्रकल्प प्रलंबित नाही, अशी ग्वाही केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

नवी दिल्ली : पर्यावरण मंजुरीअभावी महाराष्ट्रात कोणताही महामार्ग प्रकल्प प्रलंबित नाही, अशी ग्वाही केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
खासदार विजय दर्डा यांनी तारांकित प्रश्न विचारताना महामार्गासंबंधी कोणते प्रकल्प प्रलंबित आहेत आणि असतील तर कधीपासून याविषयी विस्तृत माहिती मागितली होती. पर्यावरणाच्या मंजुरीसाठी किती प्रकल्प रखडले आहेत, त्यामुळे त्यांच्या खर्चात किती वाढ होणार आहे आणि महाराष्ट्रात पर्यावरणाची मंजुरी न मिळालेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.
 त्यावर लेखी उत्तरात गडकरी यांनी नमूद केले की, पर्यावरणाची मंजुरी न मिळाल्याच्या आधारावर कोणताही प्रकल्प प्रलंबित नाही. राष्ट्रीय महामार्गाचा विकास पर्यावरण मंजुरीविना रखडण्याचा महत्त्वाचा घटक 22 ऑगस्ट 13 रोजी वन आणि पर्यावरण मंत्रलयाने अधिसूचना काढल्यानंतर उरलेला नाही. हा प्रश्न सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासाला चर्चेला घेतला जाणार होता. महागाईच्या मुद्दय़ावरील चर्चेसाठी हा तास बाजूला ठेवण्यात आल्यामुळे त्यावर चर्चा होऊ शकली नाही. गडकरी यांनी लेखी उत्तर सभागृहाला दिले.
लवकरच नवे शैक्षणिक धोरण
शिक्षण संस्थांमधील संशोधन आणि नूतनीकरणाची प्रक्रिया सुधारण्यासाठी लवकरच नवे शैक्षणिक धोरण आणण्याची सरकारची योजना असल्याची माहिती केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी लेखी उत्तरात दिली.
नवे शैक्षणिक धोरण आणण्याचा सरकारचा विचार आहे काय? असल्यास त्याबाबत विस्तृत माहिती द्यावी. 1986 मध्ये आखण्यात आलेले शैक्षणिक धोरण राबविताना कोणते प्रश्न उद्भवले आहेत. नवे धोरण राबविताना सरकार दज्रेदार शिक्षण कसे देणार? असा खा. दर्डा यांनी विचारला होता. या अतारांकित प्रश्नाचा क्रमांक 33 वा होता. 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 1992 मध्ये सुधारणा करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रतील केंद्र सरकारच्या धोरणांसाठी तो मार्गदर्शक दस्तऐवज ठरला आहे.
गेल्या 2क् वर्षामध्ये शैक्षणिक चित्र बदलले आहे. त्यात अनेक लक्षणीय बदल झाले आहेत. प्राथमिक शिक्षणाचा हक्क यासारखे कायदे आले. उच्च शिक्षणाला नवा आकार द्यावा लागणार आहे. व्यावसायिक शिक्षण संस्थांमधून कौशल्य विकासाला गती द्यावी लागेल. 
जागतिकीकरणामुळे नवनवे तंत्रज्ञान येत असून अर्थव्यवस्थेचा विस्तार होत आहे, या बदलत्या परिस्थितीत गुणवत्तेच्या अभावामुळे निर्माण झालेले प्रश्न, संशोधन आणि नूतनीकरणाच्या आघाडीवरील आव्हाने पेलण्यासाठी सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा प्रस्ताव ठेवला आहे, असे स्मृती इराणी यांनी लेखी उत्तरात म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)