शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

पर्यावरण मंजुरीविना महाराष्ट्रात एकही महामार्ग प्रलंबित नाही

By admin | Updated: July 8, 2014 01:41 IST

पर्यावरण मंजुरीअभावी महाराष्ट्रात कोणताही महामार्ग प्रकल्प प्रलंबित नाही, अशी ग्वाही केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

नवी दिल्ली : पर्यावरण मंजुरीअभावी महाराष्ट्रात कोणताही महामार्ग प्रकल्प प्रलंबित नाही, अशी ग्वाही केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
खासदार विजय दर्डा यांनी तारांकित प्रश्न विचारताना महामार्गासंबंधी कोणते प्रकल्प प्रलंबित आहेत आणि असतील तर कधीपासून याविषयी विस्तृत माहिती मागितली होती. पर्यावरणाच्या मंजुरीसाठी किती प्रकल्प रखडले आहेत, त्यामुळे त्यांच्या खर्चात किती वाढ होणार आहे आणि महाराष्ट्रात पर्यावरणाची मंजुरी न मिळालेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.
 त्यावर लेखी उत्तरात गडकरी यांनी नमूद केले की, पर्यावरणाची मंजुरी न मिळाल्याच्या आधारावर कोणताही प्रकल्प प्रलंबित नाही. राष्ट्रीय महामार्गाचा विकास पर्यावरण मंजुरीविना रखडण्याचा महत्त्वाचा घटक 22 ऑगस्ट 13 रोजी वन आणि पर्यावरण मंत्रलयाने अधिसूचना काढल्यानंतर उरलेला नाही. हा प्रश्न सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासाला चर्चेला घेतला जाणार होता. महागाईच्या मुद्दय़ावरील चर्चेसाठी हा तास बाजूला ठेवण्यात आल्यामुळे त्यावर चर्चा होऊ शकली नाही. गडकरी यांनी लेखी उत्तर सभागृहाला दिले.
लवकरच नवे शैक्षणिक धोरण
शिक्षण संस्थांमधील संशोधन आणि नूतनीकरणाची प्रक्रिया सुधारण्यासाठी लवकरच नवे शैक्षणिक धोरण आणण्याची सरकारची योजना असल्याची माहिती केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी लेखी उत्तरात दिली.
नवे शैक्षणिक धोरण आणण्याचा सरकारचा विचार आहे काय? असल्यास त्याबाबत विस्तृत माहिती द्यावी. 1986 मध्ये आखण्यात आलेले शैक्षणिक धोरण राबविताना कोणते प्रश्न उद्भवले आहेत. नवे धोरण राबविताना सरकार दज्रेदार शिक्षण कसे देणार? असा खा. दर्डा यांनी विचारला होता. या अतारांकित प्रश्नाचा क्रमांक 33 वा होता. 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 1992 मध्ये सुधारणा करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रतील केंद्र सरकारच्या धोरणांसाठी तो मार्गदर्शक दस्तऐवज ठरला आहे.
गेल्या 2क् वर्षामध्ये शैक्षणिक चित्र बदलले आहे. त्यात अनेक लक्षणीय बदल झाले आहेत. प्राथमिक शिक्षणाचा हक्क यासारखे कायदे आले. उच्च शिक्षणाला नवा आकार द्यावा लागणार आहे. व्यावसायिक शिक्षण संस्थांमधून कौशल्य विकासाला गती द्यावी लागेल. 
जागतिकीकरणामुळे नवनवे तंत्रज्ञान येत असून अर्थव्यवस्थेचा विस्तार होत आहे, या बदलत्या परिस्थितीत गुणवत्तेच्या अभावामुळे निर्माण झालेले प्रश्न, संशोधन आणि नूतनीकरणाच्या आघाडीवरील आव्हाने पेलण्यासाठी सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा प्रस्ताव ठेवला आहे, असे स्मृती इराणी यांनी लेखी उत्तरात म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)