शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

१० महिन्यांत भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Updated: April 1, 2015 13:32 IST

गेल्या १० महिन्यांमध्ये केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत

राउलकेला (ओदिशा), दि. १ - लोकशाहीत सत्ताधा-यांनी त्यांच्या कामाचा हिशोब देणे आवश्यक असते. गेल्या १० महिन्यांमध्ये केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जो कोळसा अनेकांसाठी ओझ झाला होता त्याच कोळश्याला आम्ही 'हीरा' बनवले असे मोदींनी नमूद केले. 

ओदिशातील राउलकेला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुतनीकरण झालेल्या स्टील प्लॅंटचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या कामकाजाचा हिशोब दिला. मागील सरकारच्या काळात कोळसा घोटाळा झाल्याने देशाचे मोठे नुकसान झाले होते. पण आम्ही सत्तेवर आल्यान अवघ्या २० कोळसा खाणींच्या लिलावातून २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिले असे सांगत नरेंद्र मोदींनी कोळसा खाण लिलाव प्रक्रियेची यशोगाथा मांडली. राउलकेलामधील स्टील प्लँटमध्ये भीषण उष्णतेत काम करणा-या कामगारांमुळेच आज देशात शस्त्रास्त्रांची निर्मिती शक्य होते. या कर्मचा-यांमुळेच आज भारत सुरक्षित आहे असे नमूद करत मोदींनी प्लँटमधील कर्मचा-यांचे कौतुक केले. १० महिन्यांमध्ये भारतावर आलेले निराशाचे ढग दूर करत आशेचा नवा किरण उदयास आला आहे. आता जगभराचे लक्ष भारताकडे लागले आहे असा दावाही केला. भारताच्या पश्चिमेतील राज्यांप्रमाणेच पूर्वेतील ओदिशापासून ते गुवाहाटीपर्यंतच्या भागाचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे मोदींनी सांगितले. राज्याचा विकास झाला तर देशाचा विकास होईल या संकल्पनेवर आम्ही चालत असून कोळसा खाणींच्या लिलावातून मिळणा-या पैशांमधील काही वाटा राज्य सरकारला देत आहोत असे मोदींनी स्पष्ट केले