शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

१० महिन्यांत भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By admin | Updated: April 1, 2015 13:32 IST

गेल्या १० महिन्यांमध्ये केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत

राउलकेला (ओदिशा), दि. १ - लोकशाहीत सत्ताधा-यांनी त्यांच्या कामाचा हिशोब देणे आवश्यक असते. गेल्या १० महिन्यांमध्ये केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जो कोळसा अनेकांसाठी ओझ झाला होता त्याच कोळश्याला आम्ही 'हीरा' बनवले असे मोदींनी नमूद केले. 

ओदिशातील राउलकेला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुतनीकरण झालेल्या स्टील प्लॅंटचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या कामकाजाचा हिशोब दिला. मागील सरकारच्या काळात कोळसा घोटाळा झाल्याने देशाचे मोठे नुकसान झाले होते. पण आम्ही सत्तेवर आल्यान अवघ्या २० कोळसा खाणींच्या लिलावातून २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून दिले असे सांगत नरेंद्र मोदींनी कोळसा खाण लिलाव प्रक्रियेची यशोगाथा मांडली. राउलकेलामधील स्टील प्लँटमध्ये भीषण उष्णतेत काम करणा-या कामगारांमुळेच आज देशात शस्त्रास्त्रांची निर्मिती शक्य होते. या कर्मचा-यांमुळेच आज भारत सुरक्षित आहे असे नमूद करत मोदींनी प्लँटमधील कर्मचा-यांचे कौतुक केले. १० महिन्यांमध्ये भारतावर आलेले निराशाचे ढग दूर करत आशेचा नवा किरण उदयास आला आहे. आता जगभराचे लक्ष भारताकडे लागले आहे असा दावाही केला. भारताच्या पश्चिमेतील राज्यांप्रमाणेच पूर्वेतील ओदिशापासून ते गुवाहाटीपर्यंतच्या भागाचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे मोदींनी सांगितले. राज्याचा विकास झाला तर देशाचा विकास होईल या संकल्पनेवर आम्ही चालत असून कोळसा खाणींच्या लिलावातून मिळणा-या पैशांमधील काही वाटा राज्य सरकारला देत आहोत असे मोदींनी स्पष्ट केले