शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

काळा पैशावर मोदींसारखी कारवाई कोणीच केली नाही- जेटली

By admin | Updated: January 8, 2017 16:53 IST

मोदी सरकारनं हे सर्व करून दाखवलं आहे, असं वक्तव्य अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 - आतापर्यंतच्या कोणत्याच सरकारनं देशाच्या सुरक्षेसाठी नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नव्हती, मात्र मोदी सरकारनं हे सर्व करून दाखवलं आहे, असं वक्तव्य अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. पंजाबमधल्या अमृतसर येथील विजय संकल्प यात्रा रॅलीमध्ये ते बोलत होते. केंद्र सरकार समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करत आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. काँग्रेसनं पंजाबमध्ये 2002-07दरम्यान स्वतःचे सरकार असताना राज्यासाठी कोणतंही काम केलं नाही. काँग्रेसवाले फक्त आरोप-प्रत्यारोप आणि बदल्यांचं राजकारण करत आले आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार असताना शिक्षणासह कोणत्याही क्षेत्रात काँग्रेसनं चांगली कामगिरी केली नाही. मात्र अकाली दल-भाजपा सरकारनं गेल्या 10 वर्षांत राज्याचा अभूतपूर्व असा विकास केला आहे. राज्यात हल्लीच केंद्रीय शैक्षणिक संघटनांनी शिक्षणासाठी चांगला प्रचार केला आहे. अकाली दल आणि भाजपा आता तिस-यांदा पंजाबमध्ये सत्तेवर येईल, असंही जेटली म्हणाले आहेत. (नोटा बंदीमुळे ८६ टक्के चलन बदलणार - अरुण जेटली)(500 रुपयांच्या जास्त नोटा वितरणात येणार - अरुण जेटली)

दरम्यान, जेटलींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींच्या कार्यकाळात देश प्रामाणिक, स्वच्छ आणि प्रगतिपथावर असल्याचं म्हटलं आहे. पंजाबमध्ये भाजपाची ही यात्रा 29 डिसेंबर 2016पासून प्रदेशाध्यक्ष विजय सांपला यांच्या नेतृत्वात सुरू झाली असून, पंजाब निवडणुकीत विजय मिळवण्याच्या उद्देशानं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाला बहुमत असलेल्या 23 ठिकाणांहून ही यात्रा काढण्यात आली आहे.