शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

चोख बंदोबस्तात ‘नीट’-१ सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2016 02:29 IST

सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामाईक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश दिल्यानंतर संभ्रमावस्था निर्माण झाली असतानाच १ मे रोजी पहिल्या टप्प्याची

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामाईक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश दिल्यानंतर संभ्रमावस्था निर्माण झाली असतानाच १ मे रोजी पहिल्या टप्प्याची परीक्षा पार पडली. सीबीएसईने परीक्षार्थींना घालून दिलेली वेशसंहिता आणि अन्य निर्बंधानुसार ही परीक्षा घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.४२ शहरांतील १,०४० केंद्रांवर ६.६७ लाख परीक्षार्थींनी ही परिक्षा दिली. गेल्या वर्षी हिच परीक्षा प्री मेडिकल एन्ट्रन्स टेस्ट म्हणून घेण्यात आली होती. त्यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ व गैरप्रकार झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने ती रद्द केली होती. या पार्श्वभूमीवर आजच्या परीक्षेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षार्थींना टोपी, अंगठी, ब्रेसलेट, मनगटी घड्याळ, पादत्राणे यासह परीक्षाकेंद्रात जाण्यास मनाई होती. पेन-पेन्सिलही आत नेऊ दिली गेली नाही. ज्यांनी अर्ज केला नाही अशा विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी दुसऱ्या टप्प्यात ही परीक्षा देता येईल. दरम्यान सीबीएसईने १ मे रोजी विद्यार्थ्यांनी दिलेला पेपर आॅनलाईन केला आहे. विद्यार्थ्यांना स्वत:चा कोड टाकून अ‍ॅन्सर की आणि सोडविलेली प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता येईल. या परीक्षेचे कटआॅफ गुण सीबीएसई एआयपीएमटी साईटच्या मुख्य पोर्टलवर घोषित केले जातील, असे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)राज्य सरकार आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारकडून घेतली जाणारी एमएचसीईटी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा ५ मे रोजी होणार असल्यामुळे राज्य सरकारने ‘नीट’ या वर्षी घेण्याला विरोध चालविला असून, आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. १२ जण परीक्षेस मुकलेनवी मुंबईतील ऐरोलीमधील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये ‘नीट’ परीक्षेसाठी गेलेल्या १२ विद्यार्थ्यांना उशिरा पोहोचल्याच्या कारणास्तव परीक्षेला मुकावे लागले. मात्र शाळा प्रशासनाने परीक्षा सुरू होण्याच्या तीन मिनिटांआधीच गेट बंद केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेला मुकलेल्या या मुलांना पुढील दुसऱ्या सत्रात होणाऱ्या २४ जुलैची संधीही मिळणे अशक्य होणार आहे.परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांत डहाणू तालुक्यातील पहाड गावची तेजल राऊत, श्रीवर्धन येथील निशिगंधा केळकर, बोरीवलीमधील निखिल मिश्रा, औरंगाबादचा वैभव फड, वांदे्र येथील मंथाशा यांचा समावेश होता. यासंदर्भात शाळा प्रशासनाची बाजू ऐकून घेण्यासाठी अनेकवेळा संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.