शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

चोख बंदोबस्तात ‘नीट’-१ सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2016 02:29 IST

सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामाईक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश दिल्यानंतर संभ्रमावस्था निर्माण झाली असतानाच १ मे रोजी पहिल्या टप्प्याची

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामाईक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश दिल्यानंतर संभ्रमावस्था निर्माण झाली असतानाच १ मे रोजी पहिल्या टप्प्याची परीक्षा पार पडली. सीबीएसईने परीक्षार्थींना घालून दिलेली वेशसंहिता आणि अन्य निर्बंधानुसार ही परीक्षा घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.४२ शहरांतील १,०४० केंद्रांवर ६.६७ लाख परीक्षार्थींनी ही परिक्षा दिली. गेल्या वर्षी हिच परीक्षा प्री मेडिकल एन्ट्रन्स टेस्ट म्हणून घेण्यात आली होती. त्यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ व गैरप्रकार झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने ती रद्द केली होती. या पार्श्वभूमीवर आजच्या परीक्षेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षार्थींना टोपी, अंगठी, ब्रेसलेट, मनगटी घड्याळ, पादत्राणे यासह परीक्षाकेंद्रात जाण्यास मनाई होती. पेन-पेन्सिलही आत नेऊ दिली गेली नाही. ज्यांनी अर्ज केला नाही अशा विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी दुसऱ्या टप्प्यात ही परीक्षा देता येईल. दरम्यान सीबीएसईने १ मे रोजी विद्यार्थ्यांनी दिलेला पेपर आॅनलाईन केला आहे. विद्यार्थ्यांना स्वत:चा कोड टाकून अ‍ॅन्सर की आणि सोडविलेली प्रश्नपत्रिका डाऊनलोड करता येईल. या परीक्षेचे कटआॅफ गुण सीबीएसई एआयपीएमटी साईटच्या मुख्य पोर्टलवर घोषित केले जातील, असे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)राज्य सरकार आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारकडून घेतली जाणारी एमएचसीईटी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा ५ मे रोजी होणार असल्यामुळे राज्य सरकारने ‘नीट’ या वर्षी घेण्याला विरोध चालविला असून, आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. १२ जण परीक्षेस मुकलेनवी मुंबईतील ऐरोलीमधील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये ‘नीट’ परीक्षेसाठी गेलेल्या १२ विद्यार्थ्यांना उशिरा पोहोचल्याच्या कारणास्तव परीक्षेला मुकावे लागले. मात्र शाळा प्रशासनाने परीक्षा सुरू होण्याच्या तीन मिनिटांआधीच गेट बंद केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेला मुकलेल्या या मुलांना पुढील दुसऱ्या सत्रात होणाऱ्या २४ जुलैची संधीही मिळणे अशक्य होणार आहे.परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांत डहाणू तालुक्यातील पहाड गावची तेजल राऊत, श्रीवर्धन येथील निशिगंधा केळकर, बोरीवलीमधील निखिल मिश्रा, औरंगाबादचा वैभव फड, वांदे्र येथील मंथाशा यांचा समावेश होता. यासंदर्भात शाळा प्रशासनाची बाजू ऐकून घेण्यासाठी अनेकवेळा संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.