शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बिहारमध्ये पुन्हा नितीशराज

By admin | Updated: February 21, 2015 04:12 IST

शेवटपर्यंत जमिनीला पाठ लागू देणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या जितनराम मांझी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

पाटणा : कसलेल्या पैलवानाप्रमाणे मीही शेवटपर्यंत जमिनीला पाठ लागू देणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या जितनराम मांझी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही तासांतच राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी नितीशकुमार यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिल्याने बिहारमध्ये गेले काही दिवस रंगलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला. लोकसभा निवडणुकीतील जदयूच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून सत्ता सोडल्याने पश्चात्ताप झालेले नितीशकुमार रविवारी २२ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. राज्यपालांनी नितीशकुमार यांना तीन आठवड्यांत म्हणजे १६ मार्चपूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. नव्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलवण्यासह राज्यपालांच्या अभिभाषणाची तारीख निश्चित करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.समर्थक आमदारांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यामुळेच मी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे, कारण मला त्यांची आमदारकी गमवायची नाही, असे सांगत मांझी यांनी पायउतार होण्याचे समर्थन केले.विधानसभाध्यक्ष उदयनारायण चौधरी हे कुणाच्या तरी इशाऱ्यावर चालत असून ते कधीही गुप्त मतदान होऊ देणार नव्हते. त्यामुळेच मी समर्थक आमदारांना धोक्यात न टाकता राजीनामा देणे पसंत केले, असे मांझी यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांना सांगितले. राजभवनात जाऊन राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सभागृहात न जाता घरीच पत्रपरिषद बोलावत भूमिका स्पष्ट केली. भाजपाने घाबरविलेभाजपाने घाबरविल्याने मांझी यांनी राजीनामा दिल्याचा आरोप काँग्रेसने केला. नितीशकुमार यांनी महादलित नेत्याचा ‘बळी’ दिल्याची टिका रालोआने केली. कटकर्त्यांना चूक कळली आहे. अशा पद्धतीने मांझींना समर्थन दिले तर लोक आपल्याला शिक्षा देतील ही जाणीव झालेल्या भाजपने मांझींना घाबरविले व या जाळ्यात ते अलगद अडकले असा दावा काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी केला.नितीशकुमार यांनी यापूर्वी महादलितांना जवळ करीत दलितांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण खेळले आहे. त्यांनी सर्वात आधी पासवानांना धक्का दिला. आता त्यांनी सत्तेसाठी महादलित जितनराम मांझी यांना सुळावर चढविले आहे. - रामविलास पासवान, केंद्रीय मंत्रीमांझी हे महादलित आहेत. त्यांना हादरा बसू नये म्हणून भाजपा त्यांच्या पाठीशी उभा आहे. -शाहनवाज हुसेन, भाजपा नेते. नितीशकुमार म्हणाले... मी जनतेची माफी मागतोगेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वत:हून राजीनामा दिल्याबद्दल नितीशकुमार यांनी बिहारच्या जनतेची माफी मागितली आहे. मला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्यास मी साडेआठ वर्षे ज्याप्रमाणे चांगले सरकार दिले त्याच निष्ठेने सेवा करेन, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. मी भावनेच्या भरात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याबद्दल माफी मागतो. आता पुन्हा नेतृत्व करण्याची माझी तयारी आहे, असेही ते म्हणाले.