शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

मोदींच्या 'डीएनए' वक्तव्यावर नीतिश कुमारांचा 'शब्द वापसी'ने पलटवार

By admin | Updated: August 10, 2015 11:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांना उद्देशून केलेले डीएनएच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी बिहारमध्ये 'शब्द वापसी' अभियान राबवण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
पाणटा, दि. १० - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांना उद्देशून केलेले डीएनएचे वक्तव्यावर पलटवार करण्यासाठी नीतिश कुमार सिद्ध झाले आहेत. नीतिश कुमार हे लालू प्रसाद यादव यांच्यासह 'शब्द वापसी' अभियान सुरू करणार असून त्याअंतर्गत राज्यातील नागरिकांची स्वाक्षरी मोहिम राबवण्यात येणार आहे. 
गेल्या बिहार भेटीत मोदींनी 'डीएनए'वरून नीतिश कुमार यांना डिवचले होते तर काल गया येथील सभेत त्यांनी बिहारला 'बिमारू राज्य' संबोधल्यामुळे नीतिश कुमार व लालू प्रसाद त्यांच्यावर तुटून पडले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मोदींवर पलटवार करण्यासाठी राज्यात हे 'शब्द वापसी' अभियान राबवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी ही माहिती दिली असून
या अभियानाअंतर्गत स्वाक्षरी मोहिम घेण्यात येणार असून राज्यातील ५० लाख नागरिक सह्या करून 'पंतप्रधानांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे' अशी मागणी करणार आहेत. तसेच या शब्दवापसी मोहिमेत सह्या करणारे नागरिक मोदींना आपले डीएनए सँपल्सही पाठवणार असून त्याची तपासणी करण्याचीही मागणी करण्यात येणार आहे, असे नीतिश कुमार यांनी सांगितले. 
या अभियानासंदर्भात नीतिश कुमार व लालू प्रसाद यादव हे दोघे उद्या संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. येत्या २९ ऑगस्ट रोजी पाटण्यातील गांधी मैदानात 'स्वाभिमान रॅलीसह' 'शब्द वापसी अभियाना'चा पहिला टप्पा पार पडेल, असेही नीतिश कुमार यांनी सांगितले.