शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमारांचा आसामात महाआघाडीचा घाट

By admin | Updated: December 10, 2015 23:11 IST

बिहारात महाआघाडीच्या अभूतपूर्व यशस्वी प्रयोगामुळे हुरूप मिळालेले मुख्यमंत्री नितीशकुमार आता आसामात भाजपला धोबीपछाड देण्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधायला निघाले आहेत

हरीश गुप्ता, नवी दिल्लीबिहारात महाआघाडीच्या अभूतपूर्व यशस्वी प्रयोगामुळे हुरूप मिळालेले मुख्यमंत्री नितीशकुमार आता आसामात भाजपला धोबीपछाड देण्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधायला निघाले आहेत. नितीशकुमार यांनी गुरुवारी एआययुडीएफचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांच्याशी विस्तृत चर्चा करीत चाचपणी सुरू केली आहे.आसाम गण परिषदेच्या प्रफुल्ल महंत गटाशीही संपर्क साधण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही या राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांशी निवडणूक युती करण्यात स्वारस्य दाखविले आहे. नितीशकुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांच्या स्वतंत्ररीत्या भेटीगाठी घेत भाजपविरुद्ध प्रत्येक राज्यात आघाडी उभारण्याबाबत शक्यता पडताळण्याला गती दिली आहे. आम्ही आजवर काँग्रेसशी लढत आलो आहे. आता काळ बदलला आहे. भाजपला रोखण्याची वेळ आली आहे. ते कसे करता येईल ते बघू या अशी प्रतिक्रिया अजमल यांनी लोकमतने संपर्क साधला असता दिली.अजमल यांच्या पक्षाला आसामात वाढता पाठिंबा मिळत असून २०११ च्या विधानसभा निवडणुकीत १२६ पैकी १८ जागा जिंकत या पक्षाने ताकद दाखवून दिली आहे. आगपला दहा तर तृणमूल काँग्रेसला अवघी एक जागा जिंकता आली. हे पक्ष एकत्र आल्यास काँग्रेसला ठोस पर्याय देता येईल मात्र त्याचा लाभ भाजपला उचलता येऊ शकेल. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ ५ जागा जिंकणाऱ्या भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत ७ जागा पटकावल्या होत्या.