शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

नितीशकुमारांचा आसामात महाआघाडीचा घाट

By admin | Updated: December 10, 2015 23:11 IST

बिहारात महाआघाडीच्या अभूतपूर्व यशस्वी प्रयोगामुळे हुरूप मिळालेले मुख्यमंत्री नितीशकुमार आता आसामात भाजपला धोबीपछाड देण्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधायला निघाले आहेत

हरीश गुप्ता, नवी दिल्लीबिहारात महाआघाडीच्या अभूतपूर्व यशस्वी प्रयोगामुळे हुरूप मिळालेले मुख्यमंत्री नितीशकुमार आता आसामात भाजपला धोबीपछाड देण्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधायला निघाले आहेत. नितीशकुमार यांनी गुरुवारी एआययुडीएफचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांच्याशी विस्तृत चर्चा करीत चाचपणी सुरू केली आहे.आसाम गण परिषदेच्या प्रफुल्ल महंत गटाशीही संपर्क साधण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही या राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांशी निवडणूक युती करण्यात स्वारस्य दाखविले आहे. नितीशकुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांच्या स्वतंत्ररीत्या भेटीगाठी घेत भाजपविरुद्ध प्रत्येक राज्यात आघाडी उभारण्याबाबत शक्यता पडताळण्याला गती दिली आहे. आम्ही आजवर काँग्रेसशी लढत आलो आहे. आता काळ बदलला आहे. भाजपला रोखण्याची वेळ आली आहे. ते कसे करता येईल ते बघू या अशी प्रतिक्रिया अजमल यांनी लोकमतने संपर्क साधला असता दिली.अजमल यांच्या पक्षाला आसामात वाढता पाठिंबा मिळत असून २०११ च्या विधानसभा निवडणुकीत १२६ पैकी १८ जागा जिंकत या पक्षाने ताकद दाखवून दिली आहे. आगपला दहा तर तृणमूल काँग्रेसला अवघी एक जागा जिंकता आली. हे पक्ष एकत्र आल्यास काँग्रेसला ठोस पर्याय देता येईल मात्र त्याचा लाभ भाजपला उचलता येऊ शकेल. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ ५ जागा जिंकणाऱ्या भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत ७ जागा पटकावल्या होत्या.