शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

नितीश यांची आज परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 05:26 IST

भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार उद्या, शुक्रवारी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करून ती परीक्षा सहजपणे उत्तीर्ण होतीलही; पण यानिमित्ताने त्यांच्या संयुक्त जनता दलातील फुटीची पटकथाही तयार होताना दिसत आहे.

शीलेश शर्मा/एस.पी. सिन्हा नवी दिल्ली/पाटणा : भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार उद्या, शुक्रवारी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करून ती परीक्षा सहजपणे उत्तीर्ण होतीलही; पण यानिमित्ताने त्यांच्या संयुक्त जनता दलातील फुटीची पटकथाही तयार होताना दिसत आहे. पक्ष टिकविणे हीच खरी नितीश कुमार यांची परीक्षा असणार आहे. सहा वेळा मुख्यमंत्री होण्यासाठी, दरवेळी संगत बदलत जाण्यामुळे विरोधकांनी त्यांच्या विश्वासार्हतेबद्दलच शंका व्यक्त केली आहे.नितीश सरकार टिकण्यासाठी संयुक्त जनता दलात फूट होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर जदयूच्या नाराज नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे पक्ष टिकविण्यासाठी ते काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ अध्यक्ष व माजी अध्यक्ष शरद यादव यांना नितीशकुमार यांचा भाजपासमवेत जाण्याचा निर्णय अमान्य आहे. खा. अली अन्वर अन्सारी व खा. वीरेंद्र कुमार यांनीही नितीश कुमार यांच्या निर्णयाला उघडपणे विरोध दर्शविला आहे.आम्ही भाजपासोबत जाणार नाही, असे दोघा खासदारांनी जाहीर केले आहे. याखेरीज संयुक्त जनता दलाच्या बिहारमधील मुस्लीम आमदारांनाही भाजपाशी संगत करणे आवडलेले दिसत नाही.त्या पक्षाच्या केरळ शाखेनेही नितीश कुमार यांचा निर्णय आम्हाला अमान्य असल्याचे जाहीर केले आहे. या साºयाचा परिणाम बिहार सरकारवर होऊ नये, यासाठी भाजपातर्फेच जोरात प्रयत्न सुरू आहेत.नितीश कुमार यांनी भाजपासमवेत सरकार स्थापन करण्याचे ठरविल्यानंतर शरद यादव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर राहुल गांधी आणि शरद यादव यांच्यात चर्चा झाली. नितीशकुमार यांनी विरोधकांच्या एकजुटीला तडा दिला असला तरी आम्ही विरोधकांसोबत राहू, असे यादव यांनी त्यांना सांगितले. नितीशकुमार यांच्या निर्णयाशी सहमत नसलेल्या खासदार, आमदार तसेच अन्य नेत्यांना आता एकत्र आणले जाणार आहे.शरद यादव यांनी आपल्या निवासस्थानी काही नेत्यांशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविली आहे. तिथे अली अनवर अन्सारी, वीरेंद्र कुमार यांच्यासह पक्षाचे अन्य नेतेही हजर होते.विरोधी नेत्यांची टीकाकाँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी यांनीही नितीश कुमार यांच्या नव्या भूमिकेवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी तर नितीश कुमार यांच्यावर धोका दिल्याचा आरोप केला, तर सपाचे अखिलेश यादव यांनी आम्ही उगीचच तुमच्यासोबत राहिलो, असे बोलून दाखवले. मायावती यांनीही नितीशकुमार यांच्यावर टीका केली आहे, त्या म्हणाल्या की, नागरिकांनी जो कौल दिला होता त्याविरुद्ध नितीशकुमार यांनी भूमिका घेतली आहे. भाजप आणि मोदी हे निवडणूक हरल्यानंतर तोडफोड करून सरकार स्थापन करत आहेत. गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि बिहारमध्ये असे झाले आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे.संयुक्त जनता दलाची मते फुटणार?विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी संयुक्त जनता दलाची मते फुटू शकतील, हे गृहीत धरून काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांना सोबत घेण्याचे प्रयत्न नितीश कुमार व भाजपा यांनी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात जदयूची मते उद्या फुटतात की नंतर पक्षातच फूट पडते, हे सांगणे अवघड आहे.काँग्रेसचा फुटीर भाजपातर्फे राज्यसभेवर?नवी दिल्ली : काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते शंकरसिंह वाघेला यांच्या तीन समर्थक आमदारांनी गुरुवारी पक्ष व आमदारकी सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे प्रमुख प्रतोद बलवंतसिंह रजपूत यांचा त्यात समावेश असून, त्यांनी पक्ष सोडताच, ते भाजपातर्फे राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. येत्या ८ आॅगस्ट रोजी गुजरातमधून राज्यसभेवर तिघांना निवडून पाठवण्यात येणार असून, त्यासाठी भाजपाने याआधीच पक्षाध्यक्ष अमित शहा आणि माहिती व प्रसारणमंत्रीस्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे. - सविस्तर वृत्त/१२