शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नितीश यांची आज परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 05:26 IST

भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार उद्या, शुक्रवारी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करून ती परीक्षा सहजपणे उत्तीर्ण होतीलही; पण यानिमित्ताने त्यांच्या संयुक्त जनता दलातील फुटीची पटकथाही तयार होताना दिसत आहे.

शीलेश शर्मा/एस.पी. सिन्हा नवी दिल्ली/पाटणा : भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार उद्या, शुक्रवारी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करून ती परीक्षा सहजपणे उत्तीर्ण होतीलही; पण यानिमित्ताने त्यांच्या संयुक्त जनता दलातील फुटीची पटकथाही तयार होताना दिसत आहे. पक्ष टिकविणे हीच खरी नितीश कुमार यांची परीक्षा असणार आहे. सहा वेळा मुख्यमंत्री होण्यासाठी, दरवेळी संगत बदलत जाण्यामुळे विरोधकांनी त्यांच्या विश्वासार्हतेबद्दलच शंका व्यक्त केली आहे.नितीश सरकार टिकण्यासाठी संयुक्त जनता दलात फूट होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर जदयूच्या नाराज नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे पक्ष टिकविण्यासाठी ते काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ अध्यक्ष व माजी अध्यक्ष शरद यादव यांना नितीशकुमार यांचा भाजपासमवेत जाण्याचा निर्णय अमान्य आहे. खा. अली अन्वर अन्सारी व खा. वीरेंद्र कुमार यांनीही नितीश कुमार यांच्या निर्णयाला उघडपणे विरोध दर्शविला आहे.आम्ही भाजपासोबत जाणार नाही, असे दोघा खासदारांनी जाहीर केले आहे. याखेरीज संयुक्त जनता दलाच्या बिहारमधील मुस्लीम आमदारांनाही भाजपाशी संगत करणे आवडलेले दिसत नाही.त्या पक्षाच्या केरळ शाखेनेही नितीश कुमार यांचा निर्णय आम्हाला अमान्य असल्याचे जाहीर केले आहे. या साºयाचा परिणाम बिहार सरकारवर होऊ नये, यासाठी भाजपातर्फेच जोरात प्रयत्न सुरू आहेत.नितीश कुमार यांनी भाजपासमवेत सरकार स्थापन करण्याचे ठरविल्यानंतर शरद यादव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर राहुल गांधी आणि शरद यादव यांच्यात चर्चा झाली. नितीशकुमार यांनी विरोधकांच्या एकजुटीला तडा दिला असला तरी आम्ही विरोधकांसोबत राहू, असे यादव यांनी त्यांना सांगितले. नितीशकुमार यांच्या निर्णयाशी सहमत नसलेल्या खासदार, आमदार तसेच अन्य नेत्यांना आता एकत्र आणले जाणार आहे.शरद यादव यांनी आपल्या निवासस्थानी काही नेत्यांशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविली आहे. तिथे अली अनवर अन्सारी, वीरेंद्र कुमार यांच्यासह पक्षाचे अन्य नेतेही हजर होते.विरोधी नेत्यांची टीकाकाँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी यांनीही नितीश कुमार यांच्या नव्या भूमिकेवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी तर नितीश कुमार यांच्यावर धोका दिल्याचा आरोप केला, तर सपाचे अखिलेश यादव यांनी आम्ही उगीचच तुमच्यासोबत राहिलो, असे बोलून दाखवले. मायावती यांनीही नितीशकुमार यांच्यावर टीका केली आहे, त्या म्हणाल्या की, नागरिकांनी जो कौल दिला होता त्याविरुद्ध नितीशकुमार यांनी भूमिका घेतली आहे. भाजप आणि मोदी हे निवडणूक हरल्यानंतर तोडफोड करून सरकार स्थापन करत आहेत. गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि बिहारमध्ये असे झाले आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे.संयुक्त जनता दलाची मते फुटणार?विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी संयुक्त जनता दलाची मते फुटू शकतील, हे गृहीत धरून काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांना सोबत घेण्याचे प्रयत्न नितीश कुमार व भाजपा यांनी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात जदयूची मते उद्या फुटतात की नंतर पक्षातच फूट पडते, हे सांगणे अवघड आहे.काँग्रेसचा फुटीर भाजपातर्फे राज्यसभेवर?नवी दिल्ली : काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते शंकरसिंह वाघेला यांच्या तीन समर्थक आमदारांनी गुरुवारी पक्ष व आमदारकी सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे प्रमुख प्रतोद बलवंतसिंह रजपूत यांचा त्यात समावेश असून, त्यांनी पक्ष सोडताच, ते भाजपातर्फे राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. येत्या ८ आॅगस्ट रोजी गुजरातमधून राज्यसभेवर तिघांना निवडून पाठवण्यात येणार असून, त्यासाठी भाजपाने याआधीच पक्षाध्यक्ष अमित शहा आणि माहिती व प्रसारणमंत्रीस्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे. - सविस्तर वृत्त/१२