शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही - जितनराम मांझींचे टीकास्त्र

By admin | Updated: February 8, 2015 19:41 IST

नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी घणाघाती टीका करतानाच जितनराम मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्याने मांझींच्या बंडाला भाजपाची फूस असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ८ - बिहारमधील राजकीय संघर्षाचे केंद्र आता दिल्लीत हलले असून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांझी यांनी नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी घणाघाती टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

रविवारी बिहारमधील राजकीय संघर्ष दिल्लीत भाजपाच्या दरबारी पोहोचला. नीती आयोगाच्या बैठकीनिमित्त दिल्लीत आलेले बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर जितनराम मांझी यांनी पत्रकार परिषद घेत नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे असे टीकास्त्र जितनराम मांझी यांनी सोडले. विधानसभेत विश्वासदर्शक आणावा असे आव्हानच मांझी यांनी नितीशकुमार यांना दिले. विश्वासदर्शक ठरावात आम्हीच जिंकणार असून ठरावात पराभव झाल्यास मी स्वतःच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन असे त्यांनी सांगितले. विश्वासदर्शक ठरावात भाजपाचा पाठिंबा घेणार का असा प्रश्न मांझी यांना विचारला असता आम्हाला विधानसभेत जे समर्थन देतील त्यांचे स्वागतच असेल असे सूचक विधानही त्यांनी केले. लालूप्रसाद यादव यांच्या राजदनेही मला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. तर पंतप्रधानांशी बिहारच्या विकासाबाबत चर्चा केली. मोदींनी बिहारसाठी केलेल्या सहकार्यासाठी त्यांचे आभार असे त्यांनी म्हटले आहे.

एकीकडे मांझी यांनी भाजपा दरबारी हजेरी लावली असतानाच बिहारमध्ये नितीशकुमार यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आज दुपारी नितीशकुमार आणि त्यांना पाठिंबा देणा-या अन्य पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल कार्यालयाला पत्र दिले. यामध्ये नितीशकुमार यांना १३० आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. राजद, काँग्रेसच्या आमदारांनीही नितीशकुमार यांना पाठिंबा दिला आहे. उद्या सकाळी सर्व आमदार राज्यपालांची भेटही घेतील असे समजते. दरम्यान, जदयूमधील अंतर्गत संघर्षाला भाजपा जबाबदार असल्याचा आरोप जदयू नेते करत आहेत.