शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही - जितनराम मांझींचे टीकास्त्र

By admin | Updated: February 8, 2015 19:41 IST

नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी घणाघाती टीका करतानाच जितनराम मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्याने मांझींच्या बंडाला भाजपाची फूस असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ८ - बिहारमधील राजकीय संघर्षाचे केंद्र आता दिल्लीत हलले असून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांझी यांनी नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी घणाघाती टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

रविवारी बिहारमधील राजकीय संघर्ष दिल्लीत भाजपाच्या दरबारी पोहोचला. नीती आयोगाच्या बैठकीनिमित्त दिल्लीत आलेले बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर जितनराम मांझी यांनी पत्रकार परिषद घेत नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे असे टीकास्त्र जितनराम मांझी यांनी सोडले. विधानसभेत विश्वासदर्शक आणावा असे आव्हानच मांझी यांनी नितीशकुमार यांना दिले. विश्वासदर्शक ठरावात आम्हीच जिंकणार असून ठरावात पराभव झाल्यास मी स्वतःच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन असे त्यांनी सांगितले. विश्वासदर्शक ठरावात भाजपाचा पाठिंबा घेणार का असा प्रश्न मांझी यांना विचारला असता आम्हाला विधानसभेत जे समर्थन देतील त्यांचे स्वागतच असेल असे सूचक विधानही त्यांनी केले. लालूप्रसाद यादव यांच्या राजदनेही मला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. तर पंतप्रधानांशी बिहारच्या विकासाबाबत चर्चा केली. मोदींनी बिहारसाठी केलेल्या सहकार्यासाठी त्यांचे आभार असे त्यांनी म्हटले आहे.

एकीकडे मांझी यांनी भाजपा दरबारी हजेरी लावली असतानाच बिहारमध्ये नितीशकुमार यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आज दुपारी नितीशकुमार आणि त्यांना पाठिंबा देणा-या अन्य पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल कार्यालयाला पत्र दिले. यामध्ये नितीशकुमार यांना १३० आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. राजद, काँग्रेसच्या आमदारांनीही नितीशकुमार यांना पाठिंबा दिला आहे. उद्या सकाळी सर्व आमदार राज्यपालांची भेटही घेतील असे समजते. दरम्यान, जदयूमधील अंतर्गत संघर्षाला भाजपा जबाबदार असल्याचा आरोप जदयू नेते करत आहेत.